Tag Archives: varsha gaikwad

वर्षा गायकवाड यांची मागणी, कोस्टल रोड लगतची जागा विकास आराखड्यासाठी आरक्षित करा सार्वजनिक उद्यान व किनारी वन म्हणून विकास आराखड्यात आरक्षित करा

मुंबई कोस्टल रोडच्या निर्मितीसाठी अरबी समुद्रातून १११ हेक्टरपेक्षा जास्त जमीन समुद्र किनारी भरावाद्वारे विकसित करण्यात आली आहे. ही नव्याने विकसित झालेली जमीन मुंबईकरांच्या हक्काची आणि हिरवळीची जागा म्हणून जपली गेली पाहिजे, त्यासाठी या जमिनीला ‘सार्वजनिक उद्यान’ आणि ‘किनारी वन’ म्हणून मुंबईच्या विकास आराखड्यात राखीव करण्यात यावे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, कोळीवाडे व गावठाणांना झोपडपट्टी घोषीत करून मुंबईच्या भूमिपुत्रांवर अन्याय मुंबईतील सर्व गावठाणे आणि कोळीवाड्यांचे तातडीने मॅपिंग करा !

मुंबईतील गावठाणे आणि कोळीवाडे हे मुंबईच्या अस्तित्वाचे आणि सांस्कृतिक वारशाचे अविभाज्य भाग आहेत.मात्र, मुंबईचा तुकड्या-तुकड्याने लिलाव करण्याच्या कटात गुंतलेल्या या सरकारने भूमिपुत्रांवर घाला घातला आहे. गावठाणे आणि कोळीवाडे हे स्लम नाहीत असा स्पष्ट शासन निर्णय (GR) असूनही, त्यांना स्लम घोषित करून भूमिपुत्रांच्या हक्कांवर गदा आणण्याचे आणि या भागांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना लागू करण्याचे …

Read More »

महात्मा जोतीबा फुले व सावित्रीमाई फुलेंना ‘भारत रत्न’ द्या खासदार वर्षा गायकवाड यांची संसदेत मागणी

क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले या महान विभूतींना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्नने गौरवण्यात यावे, अशी शिफारस करणारा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाने एकमताने पारित केला, त्याचा आनंद आहे. काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनी २०१५ साली फुले दांपत्याला भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी लोकसभेत केली होती. आता केंद्र सरकारने सर्व …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, सरकारी शाळा सीबीएसई पॅटर्नवर आणण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा सीबीएसई पॅटर्न मराठी शाळांसाठी घातक, मराठी शाळा संपवण्याचा नियोजित डाव

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी शाळा सीबीएसई CBSE पॅटर्नवर पुढील शैक्षणिक वर्षापासून आणण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा युती सरकारचा हा निर्णय  राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व बालभारतीच्या अस्तित्वावर गदा आणणारा आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी माजी शालेय शिक्षण मंत्री खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. …

Read More »

वर्षा गायकवाड यांची संसदेत मागणी, महाबोधी महाविहार बौद्ध समुदायाकडे सोपवा आणि बोधगया मंदिर कायदा १९४९ रद्द करण्याची मागणी

बोधगया येथील महाबोधी महाविहार हे स्थळ बौद्ध समुदायासाठी अतिशय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. १९४९ च्या बोधगया मंदिर कायदा अंतर्गत या ऐतिहासिक स्थळाचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समुदायाच्या हातात नाही. मंदिर व्यवस्थापन समितीमधील नऊ सदस्यांपैकी पाच अन्य समाजाचे व केवळ चार बौद्ध समाजाचे असतात हे अन्यायकारक असून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समुदायाकडे …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, चामड्याच्या वस्तूंवरील अन्यायकारक जीएसटी तात्काळ कमी करा लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली मागणी

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेल्या महागाई व नोटबंदीने लघु, छोटे व मध्यम व्यवसायांचे कंबरडे मोडले आहे, त्यातच जीएसटीमुळे उरला सुरला उद्योगही शेवटच्या घटका मोजत आहे. सर्वच वस्तूवर जीएसटी लावून सरकार छोटे उद्योग देशोधडीला लावत आहे. चामड्याच्या वस्तूंवर जीएसटी वाढवून भाजपा सरकाने या उद्योगाला मोठ्या संकटात टाकले आहे. सरकारने हा वाढवलेला जीएसटी तात्काळ …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, ८० कोटी लोकांना मोफत धान्य, भाजपा सरकारने कोणाचा विकास केला? मागील ११ वर्षात देशात गरिब व श्रीमंत दरी वाढली; भाजपा सरकारचा विकास फक्त मुठभर श्रीमंतांसाठी

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देशात ८० कोटी तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ७६.३२% आणि शहरी भागात ४५.३४% लोकसंख्या लाभार्थी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गरिब लोक आहेत तर मग ११ वर्षात कोणाचा विकास झाला? असा प्रश्न उपस्थित करत भाजपा सरकारच्या काळात फक्त मुठभर लोकांचा विकास झाला असून बहुसंख्य जनता ही गरिबीचे जीवन जगत आहे, विकासाच्या फक्त …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी , फ्रेंच कंपनी सिस्ट्राने एमएमआरडीएवर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करा पारदर्शक चौकशीसाठी महानगर आयुक्तांसह वरिष्ठ एमएमआरडीए अधिकाऱ्यांची बदली करा

भाजपा युतीच्या काळातील भ्रष्टाचाराचे विक्रम दररोज उघड होत आहेत. आता फ्रेंच अभियांत्रिकी कंपनी सिस्ट्राने मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणातील (MMRDA) अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एमएमआरडीएवरील हे आरोप अत्यंत गंभीर असून यामुळे मुंबईची जगभरात नाच्चकी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारावर खुलासा करावा व  आरोपांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी …

Read More »

१० वीचा पेपर फुटला, पुणे मंडळ म्हणते, वृत्त चुकीचे बोर्डाच्या परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यात सरकार व शालेय शिक्षण विभाग अपयशी?

१० वी च्या परिक्षेला आज सुरुवात झाली,मात्र या १० वी परिक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची घटना घडली. पेपर सुरु झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर उत्तर पत्रिकेच्या छायाकिंग प्रत काढून विद्यार्थ्यांना पुरविल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. जालन्यात हा प्रकार घडल्यानंतर यवतमाळ येथेही असाच प्रकार घडला. त्यामुळे विद्यार्थी आणि …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, राहुल गांधी, सुनिल केदार आणि माणिकराव कोकाटेंना वेगवेगळा न्याय का? कोकाटेंची आमदारकी तात्काळ रद्द करा

भारतीय जनता पक्ष लोकशाही व संविधानाला डावलून काम करत आहे. स्वतःला एक न्याय व विरोधकांना दुसरा न्याय अशी भाजपाची लोकशाहीविरोधी भूमिका आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी व सुनील केदार यांच्या बाबतीत जो न्याय लागू केला गेला तोच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत लागू केला पाहिजे. न्यायालयाने दोषी ठरवल्याने माणिकराव कोकाटे …

Read More »