Editor

देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, काही लोकांनी बेईमानी केली… मोदींमुळे नवा टेंड्र सुरू त्यांनीच भूमिपूजन केलेल्या प्रकल्पांचे मोदींनीच केले उद्घाटन

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे, मुंबई आणि नागपूरातील प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची चौथी वेळ आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही लोकांनी बेईमानी केली असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर नाव न घेता करत त्यामुळेच राज्यात मागील अडीच वर्षात लोकांच्या मनातील …

Read More »

मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेबरोबर २५ वर्षे भाजपाच सत्तेत होता हे मोदी कसे विसरले? शिवसेनेवर टीका करताना पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या पक्षालाच दोष दिला !: नाना पटोले

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील विकास कामांचे उद्घाटन करताना विरोधी पक्षांवर टीका केली. विरोधी पक्षाचे सरकार मुंबईचा विकास होऊ देत नव्हते, भ्रष्टाचार होत होता असा आरोप मोदींनी केला. परंतु मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षे शिवसेनेबरोबर भाजपाच सत्तेत सहभागी होता हे मोदींना माहित नाही का? शिवसेनेने विकास केला नाही किंवा भ्रष्टाचार …

Read More »

कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटन आणि दहिसर कांदळवनाचा विकास आराखडा सादर करा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश

कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तेथील पर्यटन सुविधांच्या बळकटीकरणासाठी वन विभागाने निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करावा, अशा सूचना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. तसेच कांदळवनाची उपयुक्तता सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी त्यासोबतचं कांदळवनाचा अनुभव घेता यावा यासाठी दहिसर येथील कांदळवन परिसरात ‘कांदळवन …

Read More »

फोटो व्हायरल केला म्हणून राखी सावंतला अटक शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी केली कारवाई

आपल्या वादग्रस्त वागण्याने आणि बोलण्याने नेहमी चर्चेत असलेल्या अभिनेत्री राखी सावंतला मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली. एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर करण्यात आला आहे. या प्रकरणी त्या मॉडेलने केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी कारवाई केली. या सदर मॉडेल महिलेचा फोटो राखीनं व्हायरल केला होता. अभिनेत्री शर्लिन चोप्रानं …

Read More »

सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यावरून साधला निशाणा हैद्राबादच्या उद्योजकांना दावोसला भेटण्याची गरज नव्हती

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौर्‍यावर येत असून या मुंबई दौऱ्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरही निशाणा साधला. महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याने त्यांचे आम्ही स्वागतच करतो. या भाजपामध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, यशवंत सिन्हा, सुषमा स्वराज यांच्यासारखे मोठे नेते पाहिले …

Read More »

बनावट मेसेजना बळी पडू नका; महावितरणचे आवाहन ग्राहकांच्या रक्षणासाठी महावितरणची दक्षता

महावितरणच्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी कंपनी एसएमएस किंवा ऑनलाईन बिले भरण्याची सुविधा सुरक्षित असेल याची दक्षता घेत असते. ग्राहकांनी महावितरणची कार्यपद्धती समजून घ्यावी. ग्राहकांनी अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या बनावट मेसेजना बळी पडू नये व वीजग्राहकांना लुटणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी …

Read More »

नाना पटोलेंची घोषणा, सत्यजीत तांबेंवर कारवाई, तर मविआचा पाटील- अडबालेंना पाठिंबा सत्यजित तांबेवरही काँग्रेस पक्ष निलंबनाची कारवाई करणार

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील व नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. नाशिक मतदारसंघातील घटनांमुळे डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने आधीच निलंबित केले असून सत्यजित तांबेवरही कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना …

Read More »

नाना पटोलेंचे नरेंद्र मोदींना आव्हानः महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यांवर बोला पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून जनतेच्या पैशांची लुट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून सरकारी पैशांतून जाहिरातबाजी केली जात आहे, ही जनतेच्या पैशांची लूट आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन ६ वर्षे झाली, त्याचे काय झाले? यावर मोदींनी बोलावे तसेच महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या विषयांवरही …

Read More »

जी-२० च्या प्रतिनिधींची पुण्यातील वारसास्थळांना भेट शनिवार वाडा, आगाखान पॅलेस आदीसह अन्य ठिकाणांना भेटी दिल्या

जी – २० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली. शनिवार वाड्याची भव्यता पाहून पाहुण्यांनी आश्चर्य व्यक्त केले. लाल महल भेटीप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्सुकतेने जाणून घेतला. सकाळी शनिवार वाड्यापासून या भेटीला सुरूवात झाली. शनिवार वाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. येथील इतिहासाविषयी उत्सुकतेने …

Read More »

प्रविण दरेकर यांचा आरोप, ठाकरे कुटुंबाचा कट उद्योगविश्वाने उधळला जागतिक उद्योगांना महाराष्ट्राचे आकर्षण

उद्योगक्षेत्रात महाराष्ट्राची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा ठाकरे पितापुत्रांचा कट उद्योगक्षेत्रानेच उधळून लावल्याचे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रास मिळालेल्या उदंड प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे. परिषदेच्या पहिल्याच सत्रात महाराष्ट्रात १.३७ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार करून जागतिक उद्योगक्षेत्राने महाराष्ट्राला पसंतीची पावती दिली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »