Editor

सकाळी ७.३० वाजल्यापासून चौकशी, दुपारी ३ च्या सुमारास मंत्री मलिकांना ईडीकडून अटक पहाटे ४ वाजता ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहोचले

मागील काही दिवसांपासून भाजपा नेते सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री ईडीच्या कोठडीत जाण्याच्या रांगेत असल्याचे सांगत होते. तसेच ईडीची कारवाई लवकरच होणार असल्याचा इशाराही देत होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहचत मलिक यांना ईडी कार्यालयात येण्यास सांगितले. त्यानंतर …

Read More »

उपमुख्यमंत्री पवारांची यशस्वी मध्यस्थी: कर्मचारी संपाबाबत निर्णय उद्या जाहीर करणार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या रास्त, न्याय्य, व्यवहार्य मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करण्याची ग्वाही

कर्मचाऱ्यांच्या हक्काचा विचार करताना राज्यंही चालले पाहिजे, शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्याच्या हिताचा विचार करुन उद्यापासूनचा प्रस्तावित संप मागे घ्यावा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले असून उपमुख्यमंत्र्यांनी केलेली यशस्वी मध्यस्थी आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रस्तावित संप मागे घेण्याची तयारी असल्याचे, मात्र त्यापूर्वी कर्मचारी संघटनेतील सहकारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संप …

Read More »

संपामुळे झालेले नुकसान एसटी कामगारांकडून वसुल करणार नाही महामंडळाचा कोणताही निर्णय नाही- एसटी महामंडळाची स्पष्टोक्ती

एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत असले तरी हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसुल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्पष्टपणे सांगितले. एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांहून …

Read More »

न्यायालयाच्या दट्यानंतर नियम बदलला: बिगर लसवंतानाही लोकल प्रवासास मुभा कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मुंबईसह महानगरातील कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने ११ ऑगस्ट २०२१ रोजी ब्रेक द चेन अंतर्गत आदेश काढत मुंबई महानगरात लोकलने प्रवास करायचा असेल तर नागरीकांनी दोन लसमात्रा घेतलेल्या असणे बंधनकारक करत लसमात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झालेले असेल तर त्या नागरीकास लोकलने प्रवास करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या दट्यानंतर आज …

Read More »

शासकीय कर्मचाऱ्यांनाही लागू होणार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना शासन सकारात्मक- राज्य वित्त मंत्री शंभुराज देसाई

राज्य शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्या कर्मचा-यांच्या कुटूंबाला निवृत्ती वेतन आणि वैद्यकिय कारणास्तव कर्मचा-याने निवृत्ती घेतल्यास रुग्णता निवृत्ती वेतन लागू करणे. तसेच केंद्र शासनाच्या सेवानिवृत्ती योजनाप्रमाणे राज्य शासनाच्या कर्मचा-यांनाही योजना लागू करण्यासंदर्भात अभ्यासगटाद्वारे साकल्याने विचार करून शासनास शिफारस करण्यात येणार असल्याचे वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. राज्य …

Read More »

आमीर खान, मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सोयाबीन डिजीटल शेती पुस्तकाचे प्रकाशन सोयाबिन डिजिटल शेती शाळा पूर्व मशागत ते कापणीपर्यंत' या पुस्तकाचे लोकार्पण

 राज्यात सोयाबिनचे क्षेत्र ४१ लाख हेक्टर असून सध्या शेतीक्षेत्रात सोयाबीन प्रथम क्रमांकाचे पीक आहे. त्याची उत्पादकता वाढविण्यासाठी सोयाबिन डिजीटल शेती शाळा हे पुस्तक ज्या भागात सोयाबिन क्षेत्र आहे. त्या शेतकऱ्यापर्यंत पोहचवू. या  पुस्तकात शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चित होईल, असा विश्वास कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. ‘सोयाबिन …

Read More »

दिशा सालियानच्या कुटुंबियांच्या आवाहनानंतरही चंद्रकांत पाटील यांचे भाकित मृत्यूचे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेवून केलेल्या आरोपानंतर व्यथित झालेल्या दिशा सालियनच्या कुटुंबियानी आम्हाला शांतपणे जगू द्या, मुलगी गेल्याचे दु:ख काय असते ते तुम्हाला नाही कळणार, या सततच्या आरोपामुळे आम्हालाही काही करून घ्यायची इच्छा होत असून जर आमच्या जीवाला काही झाले तर त्यास जबाबदार हेच लोक राहतील असा …

Read More »

राज्य सरकारच्या उत्तरानंतरही उच्च न्यायालयाकडून २८ तारखेपर्यंत वानखेडेंना संरक्षण वानखेडेंचा आरोप-मलिकांच्या जावयांवरील कारवाईचा सूड म्हणून कारवाई

बनावट कागदपत्रांच्या आधारे परमीट रूमचा परवाना मिळविल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात समीर वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता पोलिसांकडून कधीही अटक होवू शकते या भीतीपोटी वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत संरक्षण देण्याची मागणी केली. याबाबत न्यायालयाने सरकारी वकीलांकडे याबाबतची विचारणा केली असता …

Read More »

एसटी संप: सरकारच्या उत्तरावर न्यायालय म्हणाले… शुक्रवारी होणार पुढील सुनावणी

मागील तीन महिन्याहून अधिक काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरु आहे. तसेच एसटीच्या विलनीकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुणावनीही सुरु आहे. विलनीकरणाबाबत समिती स्थापन करून तीचा अहवाल सादर करण्यास न्यायालयाने दिलेल्या १२ आठवड्यांची मुदत संपल्यानंतर राज्य सरकारने आणखी सात दिवसांची मुदत न्यायालयाकडे मागितली. त्यानुसार आज सुणावनीवेळी विलनीकरण सोडून जवळपास …

Read More »

बिगर लसधारकांना लोकल प्रवासाची परवानगी? सरकारने न्यायालयात दिले “हे” उत्तर निर्णयाचा फेरविचार करणार असल्याची उत्तर

कोरोनाचा मुंबईतील प्रादुर्भाव रोखण्यासाठी फक्त लसवंतानाच लोकल प्रवास करण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु आता परिस्थिती आटोक्यात आलेला असताना या अद्याप हा निर्णय मागे का नाही घेतला? असा सवाल न्यायालयाने उपस्थित करत तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी घेतलेला हा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणार होता नाही? याचा खुलासा …

Read More »