नागपूरः प्रतिनिधी महाराष्ट्रात एखादी घटना घडली की, अन्य राज्यांकडे बोट दाखविणे किंवा विपरित प्रतिक्रिया देणे, ही पूर्णपणे असंवेदनशीलता आहे. डोंबिवलीतील आजची घटनेमुळे तर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच राज्यसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर …
Read More »नगरविकास मंत्र्यांना म्हणे फाईली वेगळ्या करायला वेळच मिळेना सातारा प्रादेशिक कर्न्झव्हेशनचे धोरण फाईलीवर ८ महिने झाले तरी लाल फितीतच
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महानगर पालिका आणि जिल्ह्यांच्या अनुषंगाने महत्वाचे खाते असलेल्या नगर विकास विभागाकडे सातत्याने विकासात्मक धोरणाला मंजूरी मिळावी यासाठी अनेक फाईली येत असतात. मात्र या विभागाचे मंत्री असलेले आणि शिवसेनेचे वजनदार म्हणून ओळखले जाणारे मंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच फाईली हातावेगळ्या करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची धक्कादायक माहिती …
Read More »केंद्राचे न्यायालयात अजब तर्कट, “ओबीसींचा डेटा देण्याची कायदेशीर तरतूद नाही” महाविकास आघाडी सरकारच्या याचिकेवर केंद्राचे प्रतिज्ञा पत्र
नवी दिल्लीः प्रतिनिधी महाराष्ट्रातील ओबीसींचे राजकिय आरक्षण टिकविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत केंद्राने त्यांच्याकडील असलेली ओबीसींचा डेटा राज्याला द्यावा या मागणी केली. मात्र अशी कोणतीही कायदेशीर तरतूद घटनेत नसल्याचे प्रतिज्ञा पत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर करत या याचिकेवर कोणताही निर्णय देवू अशी विनंतीही केली. महाराष्ट्रातील ओबीसी …
Read More »आरोग्य विभागाच्या गट क आणि ड वर्गासाठी या तारखेला परिक्षा उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये- सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. या परीक्षेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पदासाठी २५ …
Read More »१ ऑक्टोबरपासून टाटाची वाहने महागणार टाटा कंपनीने केली घोषणा
मुंबईः प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी टाटा मोटर्सची वाहने आता महागणार आहेत. आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा टाटा मोटर्सने केली आहे. १ ऑक्टोबरपासून किमतीतील ही वाढ लागू होणार आहे. टाटा मोटर्स आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती २ टक्क्याने वाढवणार आहे. किंमतीतील वाढ मॉडल आणि वाहनाच्या व्हेरिअंटवर आधारीत असणार आहे. …
Read More »सर्व निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरताना जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक वेळीच प्राप्त करून घ्यावे- राज्य निवडणूक आयुक्त मदान यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात पुढीलवर्षी २०२२ मध्ये होणाऱ्या सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, ग्रामपंचायती, पंचायत समितीच्या निवडणूकांसाठी आता उमेदवारी अर्ज सादर करतानाच संबधित उमेदवारांने जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु पी एस मदान यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुका …
Read More »खात्यात किमान शिल्लक नसल्याने पीएनबीच्या खातेदारांना भुर्दंड माहिती अधिकार मधून मिळाली धक्कादायक माहिती
मुंबई: प्रतिनिधी आपल्या बँक खात्यात किमान शिल्लक ठेवणं बंधनकारक आहे. किमान शिल्लक न ठेवणाऱ्या खातेदारांना बँका दंड आकारतात. सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) खातेदारांना या दंडापोटी मोठा भुर्दंड बसला आहे. पीएनबीने खातेदारांकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला आहे. खात्यात किमान शिल्लक न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून बँकेने २०२०-२१ या आर्थिक वर्षात …
Read More »सहकारी संस्थांच्या बैठक मुदतवाढीसह हे प्रमुख निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले ओबीसींच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा पाठविणार
मुंबई: प्रतिनिधी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणासंबधी काढवयाच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा राज्य सरकारकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात येणार असून त्याविषयीच्या सुधारीत प्रस्तावास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेत सहकारी संस्थांच्या बैठकीस मुदतवाढ देण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात आला. याविषयीची सविस्तर निर्णयांची माहिती खालील प्रमाणे… नागरी स्थानिक संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीचे आरक्षण २७ टक्क्यांपर्यंत ठेवण्यासाठी …
Read More »अल्पसंख्याक उमेदवारांना मिळणार भरतीपूर्व निवासी पोलिस प्रशिक्षण राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी अल्पसंख्याक उमेदवारांना निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यासाठी योजनेत बदल करून प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. योजनेच्या निकष व स्वरुपात आणि अटी व शर्तीमध्ये बदल करुन तीन महिन्यांच्या कालावधीचे निवासी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याबाबतची योजना …
Read More »सरकारचा निर्णय मुंबई सोडून इतरत्र बहुसदस्यीय प्रभाग : मान्यता मात्र राज्यपालांच्या हाती महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासाठी अध्यादेश काढणार
मुंबई: प्रतिनिधी आगामी वर्षात मुंबईसह १३ शहरातील महापालिका, नगरपंचायती निवडणूका नजरेसमोर ठेवून राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेत मुंबई वगळता सर्वच महापालिका, नगर पंचायतींमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दत लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच यासंदर्भात अध्यादेश काढण्यात येणार असून …
Read More »
Marathi e-Batmya