मुंबईः प्रतिनिधी आगामी दोन महिन्यात आयपीओ (प्राथमिक समभाग विक्री) बाजारात तेजी असेल. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जवळपास ३० कंपन्या भांडवल उभारणीसाठी आयपीओ आणणार आहेत. यामधून या कंपन्या ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम उभारू शकतात. आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांमध्ये तंत्रज्ञानाशी संबंधित अधिक कंपन्या आहेत. पॉलिसीबाजार (६०१७ कोटी रुपये), एमक्योर फार्मास्युटिकल्स (४५०० कोटी रुपये), …
Read More »राज्यसभा निवडणूक: रजनी पाटील बिनविरोध, भाजपा उमेदवाराची माघार पटोले-मंत्री थोरात यांची शिष्टाई सफल
मुंबईः प्रतिनिधी काँग्रेस खासदार स्व. राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर झाली. त्यानंतर काँग्रेसच्या उमेदवाराबरोबरच भाजपाने आपला उमेदवार रिंगणात उतरविल्याने ही निवडणूक रंगतदार होणार होती. मात्र काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेत निवडणूक …
Read More »या चार राज्यांमध्ये डिझेल १०० पार, सलग दुसऱ्या दिवशी डिझेल महागले महाराष्ट्रात १०० च्या जवळ
मुंबईः प्रतिनिधी देशात सलग दुसऱ्या दिवशी डिझेलचे दर वाढले आहेत. सोमवारी डिझेलच्या दरात २५ पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किंमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. दरवाढीनंतर मुंबईत डिझेलचा दर प्रती लिटरला ९६.९४ रुपये झाला आहे. तर दिल्लीत डिझेल भाव ८९.३२ रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी रविवारीही डिझेलच्या किमतीत २५ पैशांनी वाढ …
Read More »शेतकऱ्यांसाठी खुषखबर : मागेल त्याला ठिबक सिंचन मिळणार कृषी मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा
सातारा : प्रतिनिधी कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत सुधारण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणावे. मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी विभागामार्फत ठिबक सिंचन यंत्रणा दिली जाईल, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले. किन्हई येथे भुसे यांच्या हस्ते पिक स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. …
Read More »गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून अलर्ट जारी
मुंबई : प्रतिनिधी काल गुलाब चक्रीवादळ तयार झाले असून ते पूर्व किनार पट्टीकडे सरकरत आहे. आज मध्यरात्री ते गोपाळपूर आणि कलिंगपट्टणम येथे धडकण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने आज दिला. गुलाब चक्रीवादळामुळे २७ तारखेला मराठवाडा …
Read More »तीन काळे कृषी- कामगार कायदे, महागाई, बेरोजगारी विरोधात विरोधी पक्षांचा एल्गार झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी सोमवारच्या ‘भारत बंद’ला सक्रीय पाठिंबा : नाना पटोले
अकोले: प्रतिनिधी केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कामगारविरोधी सरकार असून महागाई, बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यातही मोदी सरकार सपशेल फेल ठरले आहे. देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे, कामगारविरोधी कायदे, वाढती बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यावर जनतेत तीव्र असंतोष आहे. देशातील जनता समस्यांचा सामना करत असताना झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्रातील …
Read More »महाराष्ट्रातील राजकिय नेत्यांसाठी दिल्ली असुरक्षित बनतेय ? बैठकीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थेट मुंबईकडे रवाना
नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी स्वातंत्र्यपूर्व काळापासून दिल्ली राजकिय घडामोडींचे प्रमुख केंद्र राहिलेलं आहे. मात्र या दिल्लीत राजकिय अस्थिरता नेहमीच अनेक राजकिय पक्षांनी अनुभवली असली तरी मागील काही वर्षांपासून देशातील राजकिय नेत्यांनाच आता दिल्ली असुरक्षित वाटू लागल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून राजकिय वर्तुळात सातत्याने सुरु आहे. विशेषत: महाराष्ट्रातील भाजपेतर पक्षाच्या नेत्यांकडून दिल्लीत …
Read More »संजय राऊतांनी अजित पवारांना मिश्किल विनंती करत दिला इशारा अजित पवार मुख्यमंत्र्यांचं ऐकतात आपण त्यांना सांगू
पुणे : प्रतिनिधी राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी म्हणून निवडणूकांना सामोरे जायचं की स्वतंत्र जायचं याबाबत अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे एकमत झालेले नाही. त्यामुळे कधी राष्ट्रवादी तर कधी काँग्रेसकडून एकला चलो चा नारा देण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीबरोबरील …
Read More »कर भरत नसला तरी भरा आयटीआर, हे आहेत फायदे कर्ज, व्हिसा, पत्याचा पुरावा यासह अनेक गोष्टींसाठी फायदेशीर
मुंबई: प्रतिनिधी जर तुमचे उत्पन्न कर सूट मर्यादेत येत असेल तर तुम्हाला आयटीआर दाखल करणं आवश्यक नाही. मात्र, आयटीआर दाखल केल्यास आपल्याला बरेच फायदे मिळतात. तुम्हाला कर भरावा लागत नसेल तरी तुम्ही आयटीआर दाखल करणं फायदेशीर असेल. आयटीआर दाखल केल्याने कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊया. कर्ज सहज मिळते आयटीआर …
Read More »जयंत पाटील म्हणाले, भाजपाचा सुर्य मावळणार नाही या भ्रमात होते पण… शेतकऱ्यांना 'साले' बोलणार्या शेतकरीविरोधी भाजपचं धोरण घराघरात पोचवा - जयंत पाटील
जालना-भोकरदन: प्रतिनिधी मोदी सरकारने परदेशातून तेल आयात केल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळेनासा झाला आहे. मुळात भाजप नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात राहिला आहे असा आरोप करतानाच याच मतदारसंघातील भाजपनेते रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना ‘साले’ बोलले होते हे विधान घराघरात पोचवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. …
Read More »
Marathi e-Batmya