Editor

केंद्राचा शेतकरी कायदा पहिल्यांदा महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने मंजूर केलेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी सध्या केंद्राने मंजूर केलेल्या शेतकरी कायद्याच्या (Farmers law) विरोधात आंदोलन सुरु आहे. मात्र हा कायदा सर्वात आधी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या (INCCongress-Ncp) आघाडी सरकारने मंजूर केला होता. तसेच केंद्रात कृषीमंत्री असताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत सर्व राज्य सरकारांना पत्र पाठविल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र …

Read More »

सिरम इस्टीट्युटची कोरोना लस लवकरच बाजारात अदार पुनावला यांची ट्विटरवरून माहिती

मुंबईः प्रतिनिधी कोरोनावरील (Corona/ Covid-19) तयार करण्यात आलेली लस (Vaccine) राज्यासह देशभरात अत्यावश्यक काळात वापरण्याची परवानगी मिळावी यासाठी सिरम इस्टीट्युटने (Serum Institute)  नुकतीच केंद्र सरकारकडे केल्याची माहिती इस्टीट्युटचे प्रमुख अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी ट्विटरद्वारे दिली. सध्या अमेरिकेची मॉर्डना आणि इंग्लडमध्ये फायझर या दोन कोरोनावरील लस आंतरराष्ट्रीय बाजारात आल्या आहेत. …

Read More »

भारत बंद आंदोलनात हे ११ राजकिय पक्ष होणार सहभागी संयुक्त निवेदन जाहीर

मुंबई : प्रतिनिधी चर्चेविना केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विधेयकांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबर २०२० रोजी भारत बंदची हाक दिली. त्या हाकेला प्रतिसाद देत देशभरातील ११ राजकिय पक्षांनी पाठिंबा देत त्यात सहभागी होणार असल्याचे संयुक्त पत्रकही काढण्यात आले. या भारत बंद आंदोलनात काँग्रेसने सक्रिय सहभाग घेणार असल्याचे …

Read More »

कोरोना : बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात टक्क्याने वाढ मात्र मृतकांची टक्केवारी कायम ४ हजार ७५७ नवे बाधित, ७ हजार ४८६ बरे झाले तर ४० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या बरे होण्याच्या प्रमाणात आज १ टक्क्याने वाढ झाली असून कालपर्यत ही टक्केवारी ९२ टक्के होती. आज त्यात टक्क्याने वाढ झाल्याने बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९३. ०४ टक्केवर पोहोचले आहे. मागील २४ तासात ७ हजार ४८६ इतके रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १७ लाख २३ हजार ३७० …

Read More »

डॉ. आबंडेकरांचे देशातील पायाभूत सुविधा आणि कामगार क्षेत्रातील योगदान मोठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे मुंबई विद्यापीठात कोनशिला अनावरण

मुंबई : प्रतिनिधी संविधान निर्मितीमधील बाबासाहेबांचे कार्य सर्वांना माहिती आहे. पण बाबासाहेबांनी याबरोबरच देशाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीतही महत्वपूर्ण योगदान दिले आहे. धरणांची उभारणी, पाण्याचा योग्य पद्धतीने वापर, विद्युत निर्मिती, कामगारांचे अधिकार अशा विविध क्षेत्रात बाबासाहेबांनी फार महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांची वैज्ञानिकदृष्टी देशाला आणि समाजाला महत्वपूर्ण दिशा देणारी ठरली. ज्या …

Read More »

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा सक्रीय पाठिंबा आरपारच्या लढाईत काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी- बाळासाहेब थोरात

मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशभरातून जनमत एकवटले आहे. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत लाखो शेतकरी ठाण मांडून आहेत. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त शेतकरी आघाडीने ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या …

Read More »

नर्सेसना असलेल्या समस्या आरोग्य मंत्री, उपसभापतीसमोर मांडण्याची संधी वेबिनारद्वारे मांडता येणार

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा व कोव्हिड परिस्थितीत आरोग्य कर्मचारी व परिचारिकांच्या समस्या व उपयोजनाबाबत डॉ नीलम गोऱ्हे व राजेश टोपे आरोग्य मंत्री यांच्याबरोबर वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषगांने काविड सेंटरमध्ये येत असलेले अनुभव आणि समस्यां मांडण्याची संधी नर्सेसना मिळणार आहे. साथी संस्था पुणे, महाराष्ट्र …

Read More »

शिवसेनेच्या नेते, मंत्र्यांबरोबर राज ठाकरेंवरील सर्व गुन्हे राज्य सरकार मागे घेणार राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर गृह आणि विधी व न्याय विभागाकडून कार्य पध्दती निश्चिती सुरु

मुंबई : विशेष प्रतिनिधी तब्बल २६ वर्षानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या शिवसेनेने पक्षातील नेते आणि मंत्र्यावर असलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला असून फक्त शिवसेनेच्याच नेत्यांवरील गुन्हे मागे घेतले जात असल्याचा आरोप होवू नये यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या गुन्हेही मागे घेण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य …

Read More »

नावं बदलण्यापरेक्सा, वस्त्या गांवकुसात घ्या की ! पँथर मिलिंद भवार यांची सरकारच्या निर्णयावर वास्तवादी भाष्य

शहर-ग्रामीण भागत असलेल्या जातीवाचक वस्त्यांची नावं बदलून त्या वस्त्यांना महापुरूषांची नावे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या अनुषंगाने वास्तवादी परिस्थिती आणि त्यावर उपरोधिक पध्दतीने दोन गावकऱ्यांमधला काल्पनिक संवाद… ग्यानबा : म्हादबा…ऐकलंस कारं आपल्या मायबाप सरकारचा क्रांतिकारी फैसला..? म्हादबा : कनचा रं बबा … ग्यानबा : अरं, आतापास्तोवर आपल्या वस्तीला ‘म्हार …

Read More »

कोरोना : चार दिवसानंतर बाधित आणि मृतकांची संख्येत घट ४ हजार ९२२ नवे बाधित, ५ हजार ८३४ बरे झाले तर ९५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील चार दिवसांपासून बाधितांची संख्या पाच हजारापेक्षा जास्त आढळून येत होती. तर मृतकांची नोंद तीन अंकी सातत्याने नोंदविली जात होती. मात्र त्यानंतर आज ५ व्या दिवशी बाधितांची संख्या ५ हजारापेक्षा कमी अर्थात ४ हजार ९२२ इतकी आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १८ लाख ४७ हजार ५०९ तर …

Read More »