Editor

मराठीतील या दिग्गज कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम

मुंबई : प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष …

Read More »

कोरोना : एक दिवसाच्या अंतराने पुन्हा बाधितांच्या संख्येत वाढ २० हजार १३१ नवे बाधित, १३ हजार २३४ तर ३८० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल एक दिवसानंतर आज पुन्हा २० हजार १३१ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यात २३ हजारहून अधिक रूग्ण आणि तीन दिवसापूर्वी २० हजार रूग्ण आढळून आले होते. फक्त सोमवारी अर्थात काल राज्यात १६ हजार रूग्ण आढळून आले होते. आज निदान झालेल्या बाधित रूग्णांमुळे एकूण …

Read More »

मुख्यमंत्र्याकडून विरोधी पक्षनेते फडणवीसांना प्रतित्तुर : हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून शेवटचे निवेदन करताना सव्याज परत

मुंबई: प्रतिनिधी विधानसभा कामकाजाच्या समारोपाच्यावेळी राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियांनाची माहिती देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी केलेल्या टीकेचे प्रतित्तुर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देत फडणवीसांच्या टीकेची परतफेड केली. दुपारच्या सत्रात कोरोना आणि मेट्रो कारशेडसह इतर प्रश्नावरील चर्चेच्यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून सर्वच प्रश्न प्रतिष्ठेचे …

Read More »

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे भाजपाच्या भाई गिरकर यांची माघार

मुंबई : प्रतिनिधी विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. उपसभापती पदासाठी भाजपाचे विजय भाई गिरकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु त्यांनी माघार घेतल्याने गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली. महिलांचे प्रश्न सोडविण्यास नीलमताई यांचे कायम …

Read More »

गोस्वामीच्या अडचणीत वाढ: वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी चौकशी होणार गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणाची चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषी आढळलेल्या संबंधितांवर नियमान्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. मागील अनेक महिन्यापासून अन्वय नाईक याच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या पत्नीने रिपब्लिक टिव्ही चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी हे कारणीभूत असल्याचा आरोप करत रिपब्लिक वृत्त …

Read More »

मुंबईत कोरोनाचे ७५०० नव्हे तर १५ हजार मृत्यू : कारशेड हलविल्यास आर्थिक फटका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

मुंबई: प्रतिनिधी कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर काम करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र सरकारचे काम हे फक्त कागदावरच दिसून येत असून प्रत्यक्षात जमिनीवरची परिस्थिती वेगळी आहे. राज्य सरकारने आतापर्यत एकट्या मुंबईत ७५०० मृत्यू मुंबईत झाल्याचे सांगितले आहे. परंतु मुंबईत ७५०० नव्हे तर १५ हजार …

Read More »

शिवसेनेने अर्णब गोस्वामी विरोधात हक्कभंग ठराव आणल्याने भाजपा आक्रमक सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब

मुंबई: प्रतिनिधी हिंग्लीश भाषेतील रिपब्लिक वृत्तवाहिनेचे संपादक-अॅकर असलेले अर्णब गोस्वामी हे सातत्याने राज्यातील नेते, मुख्यमंत्री यांच्याबाबत एकेरी शब्दात उल्लेख करत असून चुकीच्या पध्दतीचे वृत नेहमी प्रसारीत करत आहेत. त्यांच्याकडून सुपारी घेतल्यासारखे वृत्तांकन करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदारांनी करत गोस्वामी विरोधात विधानसभेत हक्कभंगाचा ठराव आणण्यात आला. हा ठराव आणताच भाजपाचे …

Read More »

वैद्यकिय शिक्षण प्रवेशासाठी आता एक महाराष्ट्र एक मेरिट मंत्री अमित देशमुख यांच्याकडून विधानसभेत घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आरोग्य विज्ञान विभागातंर्गत अर्थात वैद्यकिय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राज्यात ७०:३० ची प्रवेश पध्दत कार्यान्वित होती. त्यामुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी वंचित रहात होते. त्यामुळे ही पध्दत रद्द करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्यामुळे ही पध्दत रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आता एक महाराष्ट्र एक मेरिट …

Read More »

कोरोना: सततच्या वाढीनंतर रूग्णसंख्या ४ दिवसापूर्वीच्या संख्येवर नवे बाधित १६ हजार ४२९, १४ हजार ९२२ बरे होवून घरी तर ४२३ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील चार दिवसापासून दर दिवसांगणिक बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. त्यामुळे राज्यात दुसरी लाट तर आली नाही ना? अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली. मात्र आज पाचव्या दिवशी चार दिवसापूर्वीच्या संख्येइतकी अर्थात १६हजार ४२२ इतक्या नव्या रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्ण संख्या २ लाख ५९ …

Read More »

कोरोना चाचणी दरात ५०० ते ७०० रूपयाने कपात आरोग्य विभागाकडून निर्णय जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाशी निगडीत वैद्यकिय साहित्याच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात झाल्याने कोविड चाचणीसाठी आकरण्यात येणाऱ्या दरात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार ५०० ते ७०० रूपयांपर्यत कपात करण्यात आली. यासंबधीचा शासन निर्णय आज राज्य सरकारकडून जारी करण्यात आला. नव्या निर्णयानुसार पूर्वी १९०० रूपये लागणाऱ्या कोरोना चाचणी दरात …

Read More »