मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी व संलग्न अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क-फि भरण्यासाठी सवलत देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिली. यासंदर्भात राज्यातील कृषी विद्यापीठांच्या शिक्षण संचालक समितीमध्ये तसा ठराव करण्यात आला असून विद्यार्थ्यांना शैक्षणीक वर्ष २०२०-२१ मधील तिसऱ्या, पाचव्या व सातव्या सत्राचे शैक्षणिक शुल्क एक रकमी न …
Read More »शिक्षणाचे इथे.. कसले “फेअर काय लवली?” भाजपा नेते आमदार अँड.आशिष शेलारांकडून सरकारवर प्रश्नांची सरबती
मुंबई : प्रतिनिधी “सरासरी” सरकार आणि निर्णय चवली-पावली…शिक्षणाचे इथे.. कसले “फेअर काय लवली?” अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी टीका केली. त्यांनी म्हटले आहे की, CBSC च्या मुलांना “बेस्ट आँफ थ्री” नुसार गुण मिळणार आणि SSC बोर्डाच्या मुलांना “बेस्ट आँफ फाईव्ह” नुसार गुण? मग SSC बोर्डाचे विद्यार्थी …
Read More »या कॉर्पोरेट कंपन्या आणि देणगीदारांनी दिली ५२ कोटींहून अधिकची मदत कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने सीएसआर देणगी समन्वयाचे उत्कृष्ट काम करुन लाखो आपत्तीग्रस्तांना मोठी मदत मिळवून दिली. यासाठी सोसायटीमार्फत धैर्य मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत विविध कॉर्पोरेट्स आणि खाजगी देणगीदारांकडून ५२ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकारच्या मदत साहित्याची उभारणी आणि त्याचे गरजुंना …
Read More »सरकारच्या नियमापेक्षा विपरीत नियम गृहनिर्माण संस्थांनो करू नका घरकाम करणाऱ्यांना प्रवेश नाकारू नका सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी कोविड-19 या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने अनेक उपाय योजना केल्या आहेत. मात्र गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घर कामगार व वाहन चालकांना शासनाने प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या आवारात काम करणाऱ्यांना कामगारांना गृहनिर्माण संस्थांनी प्रवेश नाकारू नये, असे आवाहन करत शासनाच्या नियमापेक्षा विपरीत नियम करू नये असा इशाराही …
Read More »साठ वर्षात पहिल्यांदाच राज्याच्या गृहमंत्र्यांची फॉरेन्सिक लँबला भेट गुन्हे सिद्ध होण्यास लँबचे कार्य महत्त्वपूर्ण व कौतुकास्पद-गृहमंत्री देशमुख
मुंबई: प्रतिनिधी पुणे येथील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेला (फॉरेन्सिक लँबला) गेल्या साठ वर्षांत प्रथमच राज्याच्या गृहमंत्र्यांनी भेट दिली असून गुन्हे सिद्ध होण्याच्या संदर्भात या लँबचे काम खूप महत्त्वपूर्ण व कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेटीदरम्यान काढले. गृहमंत्र्यांनी काल २६ रोजी या प्रयोगशाळेस भेट देऊन तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत चर्चा …
Read More »थर्मल मीटर-पल्स ऑक्सीमीटर तपासणी झाल्यावरच कार्यालयात प्रवेश उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडून नवी नियमावली जारी
मुंबई: प्रतिनिधी मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून त्यापासून मंत्रालयातील अनेक विभागाचे कर्मचारी-अधिकारी अपवाद ठरले नाहीत. त्यामुळे या आजाराची वेळीच लागण लक्षात यावी या उद्देशाने मंत्रालयातील आपल्या कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी अधिकारी-कर्मचाऱ्यांची थर्मल मीटर आणि पल्स ऑक्सीमीटरची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या चाचणीत कर्मचारी-अधिकारी नॉर्मल निघाला …
Read More »पंतप्रधान मोदीजी, आता सर्वच अभ्याक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मोदींना पत्र
मुंबई: प्रतिनिधी राज्यात अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्थांना व विद्यापीठांना सूचित करावे अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात …
Read More »कोरोना : २ दिवसात विक्रमी घरी गेले तर २४ तासात सर्वाधिक संख्येने वाढले ४८४१ रूग्णांचे निदान, १९२ जणांचा मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी काल ४१६१ आणि आज ३६६१ रूग्ण बरे होवून गेल्याने बरे होणाऱ्यांची संख्या ७७ हजाराच्या घरात पोहोचली. मात्र दुसऱ्याबाजूला काल ३८०० रूग्ण तर आज थेट राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ४ हजारापार जात ४८४१ इतकी नोंदवली गेली. ही संख्या आतापर्यतची सर्वाधिक संख्या आहे. तर १९२ जणांच्या मृत्यूची संख्या नोंदविली …
Read More »राज्यात सलग दुसऱ्या दिवशीही विक्रमी कोरोनाग्रस्त बरे होवून घरी आज ३६६१ जणांना घरी सोडले
मुंबई: प्रतिनिधी राज्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी संख्येत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज एकाच दिवशी ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत ७७ हजार ४५३ रुग्ण बरे झाले आहेत. आजही मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक २८४४ रुग्ण घरी सोडले. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश …
Read More »खुशखबर: कोरोनावरील औषधांचा मुबलक साठा लवकरच प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी कोरोना हा आजार बरा होत आहे. सध्या १० लाख लोकांमागे ६० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत असल्याचे सांगत मृत्यूदारमध्ये थोडीशी वाढ झालेली आहे. हि वाढही कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना कोरोनावरील रेमडेसिवीर, फ्लीकवीर यासह उपलब्ध असलेली पाच औषधे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध करून …
Read More »
Marathi e-Batmya