Editor

कष्टकऱ्यांच्या कुटुंबाला ७५०० रूपये, विम्याचे संरक्षण द्या कामगार कृती समितीकडून मागणी दिवस

नाशिक-मुंबई: प्रतिनिधी लॉकडावून काळामध्ये कामगार कष्टकऱ्यांची उपासमार होत आहे. त्यांना मोफत रेशन, आयकर लागू नसलेल्या कुटुंबांना ७५०० रुपये आर्थिक सहाय्य, स्थलांतरित कामगारांसाठी पुरेशा ट्रेन व बसेसची मोफत सुविधा ,बंद उद्योग, पॉवर लूम उद्योग व अन्य व्यवसाय सुरू करा ,१२ तासाचा कामाचा दिवस करणारा अध्यादेश रद्द करा, उत्तर प्रदेश , मध्य …

Read More »

विदर्भातील ग्रीन झोनमधल्या जिल्ह्यात पहिला कोरोनाग्रस्त मृत्यूनंतर उघडकीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस

वर्धा: प्रतिनिधी आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एक ३५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह. महिलेला शासकीय रुग्णालयात भरती होण्यासाठी नेत असताना मृत्यू. विनोबा भावे सावंगी रुग्णालयात आणण्यात आले. तिथे ८ तारखेला त्यांचा स्त्राव घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज पॉझीटिव्ह आला. हिवरा तांडा गाव सील. आर्वीतील खाजगी रुग्णालय सुद्धा सील. तसेच …

Read More »

बंगलोर, नाशिक, नगरच्या रस्त्याने जाणाऱ्या मजूरांसाठी आता विश्रांतीगृह आणि सुविधा पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ग्रामपंचायचींना आदेश

पुणे: प्रतिनिधी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर इतर राज्यातील, जिल्ह्यातील मजुरांचे पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरुन मोठ्या प्रमाणावर पायी स्थलांतर होत आहे. सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस असून पायी अथवा अन्य साधनाने प्रवास करताना त्यांना विश्रांती त्याचप्रमाणे नाष्टा, जेवण, शौचालय तसेच अनुषंगीक सर्व सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून पुणे …

Read More »

दोन महिन्यात २० हजार रूग्ण तर २४ तासात सर्वाधिक ४८ जणांचे मृत्यू मुंबई-ठाणे मंडळ १५ हजार ५९५ : दिवसभरात ३३० बरे होवून घराकडे

मुंबई: विशेष प्रतिनिधी साधारणत: दोन महिन्यापूर्वी अर्थात ९ मार्चला राज्यात पहिल्यांदा कोरोनाचे ४ रूग्ण आढळून आले होते. तेव्हापासून सातत्याने या संकेत वाढ असून आज दोन महिने पूर्ण होण्याच्या अर्थात ९ मे या दिवशी राज्याने २० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार पाडत २०,२२८ वर संख्या पोहोचली आहे. तसेच राज्यातील सर्वाधिक मृत्यूही …

Read More »

सोलापूरने केला २०० चा टप्पा पार २१६ वर संख्या पोहोचली, मृतकांची संख्या १४ वर

सोलापूर: प्रतिनिधी शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज २०० चा टप्पा पार केला असून २१६ वर ही संख्या पोहोचली. आज २० रूग्णांची भर पाडली. आतापर्यंत मृतकांच्या संख्येतही वाढ झाली असून ही संख्या १४ वर पोहोचली. शहरातील शास्त्री नगरमध्ये ६, कुमठा नाका २, नई जिंदगी १, अशोक चौक १, एकता नगर २, निलम …

Read More »

अडकलेले नागरिक, विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी मोफत एसटी पाठवतोय : मात्र या गोष्टी करा अर्ज भरून सादर करा: सोमवारपासून मिळणार सेवा: सतेज बंटी पाटील

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या विविध भागात लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना त्यांच्या मुळ घरी सोडण्याटसाठी एसटी महामंडळाकडून सोमवारपासून मोफत बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. या बससेवेतून स्थानिक नागरिकांना प्रवास करता येणार नाही. तसेच या खालील अटींची पूर्तता करणाऱ्यांना बस सेवेचा लाभ मिळणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री …

Read More »

मजूरांच्या प्रश्नी रेल्वेमंत्री गोयल आणि मुख्यमंत्री ठाकरेंचे पवारांना आश्वासन शरद पवारांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना दूरध्वनी

मुंबई: प्रतिनिधी मजुरांच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावेळी मजूरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी रेल्वे प्रवासाची सोय करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मजूरांच्या प्रवासासाठी एसटी बसेसची सोय करणार असल्याचे सांगितल्याने मजूरांना दिलासा मिळणार …

Read More »

मजुरांच्या दैन्यावस्थेबद्दल आयोगाने राज्याला नव्हे तर केंद्राला नोटीस बजावावी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी औरंगाबादजवळ रेल्वे दुर्घटनेत १६ स्थलांतरीत मजुरांचे झालेले मृत्यू हे वेदनादायी आहेत. अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे लाखोंच्या संख्येने स्थलांतरीत मजूर विविध राज्यात अडकून पडले. हातावर पोट असलेल्या कामगारांना काम नसल्यामुळे आपल्या मूळ गावी जाण्याची ओढ लागलेली यातूनच ही दुर्दैवी घटना घटना घडली. स्थलांतरीत मजुरांच्या दैन्यावस्थेला केंद्र सरकारचा लहरी, मनमानी …

Read More »

महाराष्ट्रातून किती स्थलांतरीत कामगार जाणार आहेत? जाणून घ्या स्थलांतरीत कामगारांपर्यत पोहचण्यात नोडल- कामगार अधिकारी कमी पडतायत

मुंबई: विशेष प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या कामगारांनी पायीच आपले घर गाठण्यासाठी रेल्वे रूळाच्या सोबत निघाले. मात्र पहाटेच्या अंधारात रेल्वे मालवाहतूक गाडीने त्यांच्या जीवाचा ठाव घेतला. या घटनेमुळे राज्यातील प्रशासकिय व्यवस्था, कामगार विभाग आणि नोडल अधिकाऱ्यांची यंत्रणा नेमके काय काम करते असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. राज्य सरकारने स्थलांतरीत कामगारांना …

Read More »

शेलारांच्या तक्रारीनंतर तब्बल १० व्या दिवशी शिक्षण विभागाला जाग फि वाढ न करण्याचे सर्व शाळांना आदेश

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे सर्वच आर्थिक व्यवहार बंद आहेत. त्यामुळे अनेक शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. तरीही मुंबईसह राज्यातील अनेक शाळांनी परस्पर फि वाढविण्यास सुरुवात केल्याची तक्रार माजी शिक्षण मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी विद्यमान शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे २९ एप्रिल २०२० रोजी करत निदर्शनास आणून …

Read More »