Editor

गृह मंत्री देशमुख म्हणाले, या ऑनलाईन चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला रझा अकादमीच्या तक्रारीवरून केंद्राला लिहिले पत्र

मुंबई : प्रतिनिधी सध्या काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून मुहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपट दाखविण्यात येणार आहे. मात्र या चित्रपटामुळे सामाजिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चित्रपट ऑनलाईन दाखविण्यावर बंदी घालावी अशी विनंती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्र लिहित केंद्रीय आयटी मंत्र्यांकडे केली. मुहम्मद द मेसेंजर ऑफ …

Read More »

पहिल्या महिला निवडणूक आयुक्त, साहित्यिक नीला सत्यनारायण यांचे निधन कोरोना विषाणूमुळे मृत्यू : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून शोक

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या पहिला महिला निवडणूक आयुक्त ठरलेल्या आणि आपल्या आगळ्यावेगळ्या कवितांमुळे साहित्य क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केलेल्या सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांचे आज पहाटे ४ निधन झाले. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर सेव्हन हिल्स रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात …

Read More »

Z.P च्या प्राथमिक शिक्षक आणि ३, ४ श्रेणीतील बदल्या १५ टक्क्यांच्या मर्यादेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ह्या राज्य शासनाच्या धोरणानुसार १५ टक्के मर्यादेपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पद्धतीने तर जिल्हांतर्गत बदल्या ह्या ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे या वर्षाच्या …

Read More »

आता मास्क, सॅनिटायजरची किंमत निश्चित होणार आरोग्य मंत्री टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायजरचा वापर वाढला असून त्यांच्या किमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत समिती गठीत करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. मास्क आणि सॅनिटायजरचा समावेश जीवनावश्यक वस्तु कायद्यांतर्गत करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. राज्यातील …

Read More »

कोरोना: ७९७५ सह रुग्ण संख्या पावणेतीन लाखावर तर मुक्त झाले दीड लाख ३६०६ बरे होवून घरी तर २३३ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज ३६०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५२ हजार ६१३ झाली आहे. तर ७९७५ नव्या बाधित रूग्णांमुळे राज्यातील एकूण रूग्णांची संख्या २ लाख ७५ हजार ६४० वर पोहोचली आहे. तर बाधित रूग्णांची संख्या …

Read More »

सर्व जात प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा : जात पडताळणीसाठी ६ महिन्याची मुदतवाढ मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यानाही जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात हे लक्षात घेऊन मराठा समाजासह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यांनाही …

Read More »

१२ वीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल केव्हा लागेल याकडे विद्यार्थ्यांसह सर्व पालकांची उत्सुकता लागू राहीली होती. अखेर १२ वीचा निकाल उद्या १६ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. १२ वीची परिक्षा संपल्यानंतर आणि १० …

Read More »

कोरोना कामासाठी अधिकाऱ्यांची गरज असल्यानेच योग्य व्यक्तीला प्रशासक नेमा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे सर्व जिल्ह्यांच्या पालक मंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी ग्रामपंचावतीवरील प्रशासकिय अधिकाऱ्यांऐवजी योग्य व्यक्तीला अर्थात राजकिय कार्यकर्त्यांना प्रशासक म्हणून नेमण्याचा आदेश नुकताच काढला. त्यास राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेताच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भात प्रसिध्दी पत्रक काढत कोरोनाच्या कामासाठी अधिकाऱ्यांची गरज असल्याने त्याच प्रवर्गातील व्यक्तीकडे ग्रामपंचायवर प्रशासक म्हणून नेमण्यासंदर्भात सर्व …

Read More »

ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून राजकीय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या नको विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र

मुंबई: प्रतिनिधी मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून थेट राजकीय कार्यकर्त्यांच्या नेमणुका करण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने जारी केलेला आदेश तत्काळ मागे घेण्यात यावा. हा आदेश लोकशाही परंपरांवर आघात करणारा आहे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली. या पत्रात देवेंद्र …

Read More »

राज्यात १८ ते २८ टक्के कराच्या वस्तुंची विक्री झाली तर आर्थिक स्थैर्य करवसुली यंत्रणेकडून माहिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमधून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मिशन बिगेन अगेनची घोषणा केली. मात्र पुन्हा विषाणूचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आल्याने आर्थिक उलाढालीची गती पुन्हा मंदावली. राज्यातील बाजारपेठा पुन्हा सुरु होवून १८ ते २८ टक्केवारीत असलेल्या वस्तुंची विक्री …

Read More »