Editor

विद्यार्थ्यांना खुषखबर ? अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द होण्याची शक्यता विद्यापीठ अनुदान समितीला पत्र पाठविल्याची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी विद्यापीठ अनुदान समितीने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान घ्याव्यात अशा सूचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे राज्य शासनाने निर्णय घेतला होता. पण, सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ज्या प्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रापर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. त्याच प्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा …

Read More »

शेतकऱ्यांसाठी खुषखबर, सौर कृषिपंप नादुरुस्त झालाय नविन मिळणार ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी महावितरणकडून राज्यभरात कार्यान्वित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील तीन किंवा पाच एचपी क्षमतेचे सौर कृषिपंप तांत्रिक बिघाडासह वादळी पाऊस, गारपिट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नादुरुस्त झाल्यास ते पूर्णपणे मोफत दुरुस्त करून किंवा बदलून देण्याची घोषणा महावितरणने केली असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सध्या राज्यात वादळी पाऊस …

Read More »

भायखळ्यात तापाची साथ, अधिकारी म्हणतात- नगरसेवकाने सांगितले तरच येवू वैद्यकीय शिबिरे घेण्याची स्थानिक नागरिकांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी मुंबईत भायखळातील बालाजी हॉस्पिटल परिसर या ठिकाणी ३ कोरोना बाधीत रुग्न आढळले असुन ४ आठवड्या पासुन येथे तापाची साथ चालु आहे. नागरीक भयभीत झाले असुन वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्याची मागणी करण्यात येत आहे. संपुर्ण जगात कोरोना या विषाणूने थैमान घातले असुन आपला भारत देश देखील कोरोनाच्या कचाट्यातुन …

Read More »

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती वरील बंदी वर्षासाठी शिथिल करा आमदार अॅड. आशिष शेलारांचे केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती ऐवजी शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीचा आग्रह धरणे निसर्गाच्या दृष्टीने कधीही योग्यच आहे. मात्र यावेळी आलेले कोरोनाचे संकट, त्यामुळे मूर्तिकारांना मिळालेला अपुरा वेळ व अडचणीत आलेली अर्थव्यवस्था या सगळ्याचा विचार करता केवळ या वर्षभरासाठी केंद्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती वर घातलेली बंदी शिथिल करावी, …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे आदेश, मागेल त्याला काम द्या ४६ हजाराहून अधिक कामांवर ५ लाख ९२ हजार मजूरांची उपस्थिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर राज्यात लॉकडाऊन सुरु असतांना कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्याप्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेची ४६ हजार ५३९ कामे सुरु असून त्यावर ५ लाख ९२ हजार ५२५ मजुर उपस्थिती आहे. कोरोनाचा प्रसार मजुरांमध्ये होणार नाही याची दक्षता …

Read More »

आता रेड झोनमध्येही मिळणार या सवलती राज्य सरकारकडून सुधारीत मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र या कालावधीत सुरुवातीला रेड झोनमधील व्यवहाराला बंदी घालण्यात आली होती. मात्र आता काही प्रमाणात सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या सवलतींची अंमलबजावणी २२ मे पासून ३१ मे पर्यंत करण्यात येणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात …

Read More »

कोरोनाकाळासाठी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला ८ कलमी कार्यक्रम कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थितीबाबत शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थिती, आव्हाने, प्रतिबंधात्मक उपाय, विविध वर्गांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज चर्चा केली. यामध्ये वाहतूक, शिक्षण, शेती, उद्योग अशा विविध विषयांवर शरद पवार यांनी सूचना मांडल्या. १) कोविड-१९ व लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे …

Read More »

राज्यातल्या कोणत्या भागातून किती कर मिळतोय माहितेय? मराठवाडा आणि विदर्भातून एकूण उत्पन्नाच्या ४० टक्के

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील ग्रीन झोनमधील जिल्हे वगळता रेड झोनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनची कालावधीही वाढत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याबरोबरच नागरिकांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले असून यापूर्वी कोणत्या महसूली विभागातून किती उत्पन्न राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होत होते याची आकडेवारी पाहू या. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी …

Read More »

कोरोनाचे आज २०३३ नवीन रुग्ण; राज्याची संख्या ३५ हजार ५८ वर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ५८ झाली आहे. आज २०३३ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ७४९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४३७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २५ हजार ३९२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज …

Read More »

जनजीवन हळुहळु पूर्वपदावर आणायचंय, घाईगर्दी करू नका भूमिपुत्रांनो संधी आहे घ्या : उद्योगाचे नवे पर्व सुरु होणार - मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची ग्वाही

मुंबई: प्रतिनिधी सद्या परवानगी देण्यात आलेल्या ५० हजार उद्योंगामधून ५ लाख कामगार काम करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे जास्तकाळ आपल्याला घरात बसून राहता येणार नाही. मात्र लॉकडाऊन उठवला तर ब्राझील, अमेरिका, इंग्लड आदी देशात जी परिस्थिती निर्माण झालीय. तशी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे आपण हळूहळू आपले जनजीवन पूर्व …

Read More »