Editor

राज्यातील सत्तास्थापनेचा घोळ संध्याकाळी सुटणार भाजपा, शिवसेनेचे डोळे लागले शरद पवार-सोनिया गांधींच्या भेटीकडे

मुंबईः विषेश प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेचा घोळ आता दिल्ली दरबारी पोहोचला असून हा घोळ सोडविण्यासाठी भाजपाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांना सकाळी भेटले, तर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे पवार आणि गांधींच्या भेटीनंतरच राज्यातील सत्तेचा …

Read More »

राज्याच्या राजकारणात पुन्हा प(ॉ)वार पॅटर्नच केंद्रस्थानी शरद पवारांच्या भूमिकेकडे भाजपासह शिवसेनेचे लक्ष

मुंबईः खंडूराज गायकवाड विधानसभा निवडणूकीचे निकाल लागून दहा दिवस होत आहेत. मात्र राज्यात सत्ता स्थापनेवरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पदावरून सत्ता संघर्षाचा तिढा कायम आहे. मात्र शिवसेनेच्या ताणाताणीला आणि भाजप-सेनेतील कलगीतुऱ्याच्या राजकीय घडामोडी मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व्हेसर्वा शरद पवार हेच केंद्रस्थानी आल्याचे पुढे आल्याने राज्यातील राजकारणात शरद पवारच पॉवरफुल …

Read More »

युतीच्या चर्चेचा पत्ता नसताना भाजपासाठी मित्रपक्षांकडून राज्यपालांना गळ केंद्रीय राज्यमंत्री आठवले, खोत, जानकर, पाटील यांनी घेतली राज्यपालाची भेट

मुंबईः प्रतिनिधी राज्यात महायुतीला जनादेश मिळालेला असतानाही भाजपा-शिवसेनेकडून राजकिय कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे युतीच्या चर्चेचे गाडे अडले असतानाच भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या रिपाई, रासप, रयत संघटना आणि शिवसंग्राम पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत सत्ता स्थापनेसाठी भाजपालाच बोलवा अशी गळ घातल्याची माहिती मित्रपक्षांनी केल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले …

Read More »

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा आणि नुकसानीची भरपाई मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर माहिती

मुंबईः प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत पुढील २ ते ३ दिवसात नुकसान भरपाई देण्याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. …

Read More »

शेतकर्‍यांना उभे करण्यासाठी हातभार लावा अन्यथा …. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा इशारा

नाशिक: प्रतिनिधी शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सरकारने हातभार लावला पाहिजे. सरकारने तशी भूमिका घेतली नाहीतर आम्ही याविरोधात ठोस भूमिका घेऊ असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज नाशिकमध्ये शेतकर्‍यांच्या शेताच्या बांधावर जात त्यांच्या पिकाची पाहणी केली. शेतकर्‍यांच्या झालेल्या …

Read More »

नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी परतीच्या पावसाने राज्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान केले असून सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली. अहमदनगरच्या शेतकर्‍याने सोयाबीनचे उभं पीक पेटवून दिले. याचा अर्थ सरकारला शेतकर्‍यांच्या अडचणी कळत नसल्यानेच शेतकरी इतक्या टोकाची भूमिका घेत असल्याचे …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी घेतला अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा आढावा मंत्रिमंडळ उपसमितीची शनिवारी होणार बैठक

मुंबई: प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, त्यांना जास्तीत जास्त दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत. क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनाच्यावतीने करण्यात …

Read More »

शपथविधी नाही झाला तरी नवी विधानसभा अस्तित्वात येणार राज्यपाल कोश्यारी यांचे घडामोडींवर बारीक लक्ष

मुंबईः विशेष प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून जवळपास आठवडा झाला तरी राज्यात सरकार स्थापन करण्यावरून भाजपा-शिवसेनेत कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. मात्र विद्यमान विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तत्पूर्वी नव्या सरकारचा शपथविधी नाही झाला तरीही १० नोव्हेंबरपासून नव्या सदस्यांची विधानसभा अस्तित्वात येणार असल्याची माहिती विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. या …

Read More »

जगावं की मरावं ? शेतक-यांनी मांडली शरद पवारांसमोर व्यथा पावसामुळे शेतकरी हवालदिल

नाशिकः प्रतिनिधी आमच्या हातचं पीक गेलंय… खूप नुकसान झालंय… जगावं की मरावं असा प्रश्न आमच्यासमोर आहे असे सांगतानाच सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही अशी माहिती नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी शेताच्या बांधावर गेलेल्या शरद पवार यांना शेतकऱ्यांनी कथन केली. परतीच्या पावसामुळे राज्यात शेतीचे खूप नुकसान झाले आहे. आज इगतपुरीजवळील टाके-घोटी गावांना राष्ट्रवादी …

Read More »

बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनी विकून कामगारांची देणी द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील अनेक भागात लहान-मोठ्या कंपन्या बंद पडत आहेत. मात्र या कंपन्यांमध्ये काम करत असलेल्या कामगारांना त्यांच्या पगारी व अन्य देणी अद्याप मिळात नाहीत. त्यामुळे अशा बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनी विकून कामगारांची थकीत देणी देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपसरचिटणीस अमर देशमुख यांनी राज्य सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली. आर्थिक …

Read More »