Editor

राहुल गांधी यांचा आरोप, ट्रम्प यांचा फोन आला, नरेंद्र मोदींनी आत्मसमर्पण केले युद्धबंदीवरून राहुल गांधी यांची खोचक टिका

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आणि असा दावा केला की ऑपरेशन सिंदूर दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोनवरून त्यांनी आत्मसमर्पण केले. काँग्रेसच्या संघटना सर्जन अभियानादरम्यान गांधी भोपाळमध्ये बोलत होते, जिथे त्यांनी काँग्रेससाठी खरोखर लढू इच्छिणाऱ्या परंतु त्यांचे ऐकले जात नसलेल्या पक्ष नेत्यांच्या निराशेची …

Read More »

एमएसआरडीसीला मुंबई प्रवेशासाठीची देणार टोलमाफीची नुकसान भरपाई राज्य सरकारचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

मुंबई शहरात प्रवेश करण्याच्या पाच पथकर नाक्यांवर हलकी वाहने, शालेय बसेस व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस यांना पथकरातून सवलत देण्यात आली आहे. या पथकराच्या सवलतीपोटी महामंडळास भरपाई देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच पथकर सवलतीचा कालावधी १७ सप्टेंबर २०२९ पर्यंत वाढविण्यास …

Read More »

अपात्र धारावीकरांचे पुर्नवसन कुर्ला येथील मदर डेअरीच्या जागेवर होणार धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला येथील मदर डेअरीची जमीन हस्तांतरणाच्या करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणा

मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला येथील ८.५ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या कुर्ला येथील मदर डेअरी अर्थात मातृदुग्धशाळेची जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी १४ जून २०२४ च्या …

Read More »

महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून रूपाली चाकणकर यांना हटवण्याची मागणी महिला नेत्यांमुळे राज्यातले राजकारण तापले

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्षाच्या महिला नेत्यांनी मोर्चा उघडला. महिला नेत्यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना आयोगाच्या पदावरून हटवण्याची मागणी केली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या त्यांच्या कार्य पद्धतीवरून नाराजी वाढली असून विरोधी पक्ष आणि …

Read More »

कोविडसंदर्भात नागरिकांनी घाबरू नये; काळजी घ्यावी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आवाहन

राज्यात सध्या काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. कोविड हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. सद्यस्थितीत कोविडसाठी राज्यात आयएलआय (इन्फ्लूएंझा सारखा आजार) …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृषी तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा 'क्लिन प्लांट’कार्यक्रमांतर्गत देशातील ९ पैकी ३ केंद्र महाराष्ट्रात उभारणार- केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्रासमोर अनेक समस्या असताना शेतकऱ्याला साहाय्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एकमात्र उपाय आहे. पुणे ॲग्री हॅकॅथॉनमधील उपयुक्त तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन करणे आणि हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पहिल्या ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’च्या पारितोषिक वितरण आणि समारोप सभारंभात ते बोलत होते. कृषी …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा, कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच

राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जून २०२५ पासून ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महामंडळातील कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय, एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याचा …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या १६ आश्वासनांचे काय झाले? यवतमाळच्या आर्णीतून सुरु झालेला शेतकरी संघर्षाचा आवाज मुंबईमार्गे दिल्लीपर्यंत पोहचवू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात २०१४ साली ‘चाय पे चर्चा’ करत शेतकऱ्यांसाठी भरमसाठ घोषणा केल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतकरी कर्जमाफी करणार, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी २ कोटी रोजगार देणार अशा घोषणा केल्या पण ११ वर्षात यातील एकही घोषणा पूर्ण केलेली …

Read More »

कामगार विमा महामंडळाच्या रूग्णालयासाठी छत्रपती संभाजीनगर करोडीतील ५ एकर जमीन महामंडळांच्या प्रस्तावित अन्य ९ रुग्णालयांना जमीन देण्यास मान्यता

छत्रपती संभाजीनगर येथे राज्य कामगार विमा योजनेच्या रूग्णालयासाठी १५ एकर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यासह बिबवेवाडी (पुणे), अहिल्यानगर, सांगली, अमरावती, बल्लारपूर (चंद्रपूर), सिन्नर (नाशिक), बारामती(पुणे), सातारा आणि पनवेल (रायगड) येथील प्रस्तावित रूग्णालयांसाठीही शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास तत्वतः मान्यता …

Read More »

राज्य सरकारचा निर्णय, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापन करण्यास तसेच आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्रीय स्तरावर देशात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरिता दोन स्वतंत्र आयोग आहेत. या दोन्ही आयोगांशी निगडीत विषय वेगेवगळे आहेत. त्यामुळे दोन स्वतंत्र …

Read More »