भारत-यूके मुक्त व्यापार कराराच्या निष्कर्षामुळे दोन्ही देशांना लक्षणीय फायदा होईल आणि २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होईल. नजीकच्या काळात, याचा अर्थ असा की भारताकडून व्हिस्की, कार, सौंदर्यप्रसाधने आणि वैद्यकीय उपकरणे यासह अनेक यूके वस्तूंवर शुल्क कमी करणे, भारतीय वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणात निर्यात संधी, कुशल भारतीय कामगारांसाठी अधिक …
Read More »राज्यातील ९५% स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीच्या आसपास होतील
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी चार आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत राज्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवाळीच्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या …
Read More »महाराष्ट्रातील या १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल होणार मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरसह संवेदनशील ठिकाणांचा समावेश
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉकड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील १६ ठिकाणांचा यात समावेश असून, बुधवार ७ मे रोजी एकाचवेळी या मॉक ड्रिल्स केले जाणार आहे. देशातील २५९ शहरांमध्ये युद्धजन्य मॉकड्रिल घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले …
Read More »चौंडीतील मंत्री परिषदेच्या बैठकीत घेतले महत्वाचे हे निर्णय बहुतांश निर्णय पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधअयक्षतेखाली मंत्री परिषदेची बैठक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथे आज घेण्यात आली. यावेळी महिलांच्या सक्षमीकरणासाठी “आदिशक्ती अभियान” व “आदिशक्ती पुरस्कार”, राहुरी येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व त्यासाठीच्या पदांना मंजूरी, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२५ साठी प्राधिकरणाचा अध्यादेश, …
Read More »इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची माहिती
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहेत. यानुसार मुंबई विभागातील मार्च २०२५ मध्ये इयत्ता १० वीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे मुंबई विभागीय शिक्षण …
Read More »अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती चौंडीतील राज्य मंत्रिमंडळ परिषदेत निर्णय
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून, त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित मराठीसह बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट निर्मिती करण्यास मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्याची दृष्य स्वरुपात जागतिक स्तरावर ओळख निर्माण व्हावी, यासाठी मराठीसह विविध …
Read More »हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आता पळवाटा न शोधता निवडणुका घ्या चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, जुमला ठरू नये.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने आता कोणताही विलंब न करता व कोणतीही पळवाट न शोधता या निवडणुका घेऊन नगरसेवक, महापौर, सभापती पदांचे पूर्ववैभव आणावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे …
Read More »वैभवी देशमुख हिच्या परिक्षेतील यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिचे बारावी परिक्षेत मिळविले यश
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने अत्यंत कठीण, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात इयत्ता बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून ८५.३३ टक्के गूण मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे. वैभवीनं मिळविलेल्या यशानं तिच्या अंगभूत गुणांचं, हुशारीचं, धैर्याचं, संयमाचं, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडल्याचं सांगून तिच्या …
Read More »संगीतकार ए.आर.रेहमान वंडरमेंटच्या निमित्त्याने मुंबईने अनुभवले जादुई संगीत रामपूर डिस्टिलिरीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ए आर रेहमान यांच्या संगीताचा कार्यक्रम
३ मे रोजी डी.वाय पाटील स्टेडियममधल्या ए. आर. रेहमान वंडरमेंट टूरच्या ग्लोबल प्रीमियरच्या निमित्त्याने मुंबईने अविस्मरणीय अद्भूत संगीत रजनी अनुभवली. या कार्यक्रमाला ४०,००० हून जास्त लोकांच्या उपस्थितीने तिला सर्वात जास्त चर्चेत राहणारी संगीत रजनी बनवले. रेडिको खेतान लि. या आयएमएफएल क्षेत्रातील सर्वात ख्यातनाम संस्थेने रामपूर डिस्टिलरी या आपल्या नावाजलेल्या नेतृत्वाखाली …
Read More »जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मानले मनापासून आभार लोकशाही वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल आभार मानले
गेली ३ वर्षे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुका संपन्न झाल्या नव्हत्या. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेली ३ वर्षे प्रशासकीय अधिकारी चालवत आहेत, ही बाब लक्षात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांची घोषणा एक महिन्याच्या आत करण्याचा आणि निवडणुका प्रक्रिया चार महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचा अंतरिम आदेश दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र …
Read More »
Marathi e-Batmya