ठाणे आणि बोरिवलीदरम्यान दुहेरी भुयारी बोगद्याच्या बांधकामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) परदेशी बँकेचे बनावट हमीपत्र दिल्याचा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा असल्याचा दावा प्रकल्पाचे काम करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमईआयएल) या कंपनीने गुरुवारी उच्च न्यायालयात केला. याचिकाकर्त्यांने काही तथ्ये लपवल्याचा आरोप करून जनहित याचिका फेटाळण्याची मागणी केली. ठाणे …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा ई-रिक्षा प्रकरणी राज्य सरकारला दोन आठवड्यांचा दिला वेळ माथेरान येथे ई रिक्षा वाटप प्रकरणी प्रस्ताव नव्याने सादर करण्याचे दिले आदेश
माथेरान या पादचाऱ्यांसाठी असलेल्या टेकडीवरील शहरातील मूळ हातगाडी चालकांना २० ई-रिक्षा परवाने वाटप करण्याच्या प्रक्रियेचा पुनर्विचार करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र राज्याला २ आठवड्यांचा वेळ दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.आर. गवई आणि ए.जी. मसीह यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने डोंगराळ शहरातील पायलट ई-रिक्षा प्रकल्पाशी संबंधित मुद्द्यांवर सुनावणी केली. महाराष्ट्राच्या …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, मोदींना अमेरिका दौऱ्यात काय मिळवले, हद्दपारी शुल्क ! अमेरिका दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साधला निशाणा
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली. त्यानंतर या पदाची शपथ घेतल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी गेले. तसेच अमेरिकेने घोषणा केल्यानंतर भारतावर आकारण्यात येणाऱ्या टेरिफचा मुद्दा ही त्यावेळी चर्चेत होता. या अमेरिका दौऱ्यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका करत …
Read More »राष्ट्रवादीच्या महेश तपासे यांची मागणी, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा लाडकी बहिण योजना फक्त निवडणूक जिंकण्यासाठी होती
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे त्यामुळे अजित पवार यांनी कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. महेश तपासे बोलताना पुढे म्हणाले की, आता अजित पवार म्हणू शकणार नाही …
Read More »धनंजय मुंडे यांची माहिती, मला बेल पल्सी आजाराचे निदान वाढत्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी दिली माहिती
मागील काही महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या कथित संबधावरून आणि कृषी खात्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. तसेच सुरेश धस आणि धनंजय …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, भ्रष्ट मंत्री माणिकराव कोकाटे व धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा सरकार भ्रष्ट मंत्र्यांची टोळी बनलीय
भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार भ्रष्ट मंत्र्यांची टोळी बनली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार करताना सर्व मर्यादा सोडल्याचे उघड झाले आहे. आता माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या दोघांना मंत्रीमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी …
Read More »सतेज बंटी पाटील यांचा इशारा, शक्तीपीठ महामार्ग विरोधात १२ मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा शक्तीपीठ बाबत सरकारची दुटप्पी भूमिका, शक्तीपीठ विरोधात न्यायालया ऐवजी रस्त्यावरची लढाई लढू
शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असून, हा महामार्ग रद्द व्हावा या मागणी करिता १२ मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढणार असल्याचं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज बंटी पाटील यांनी जाहीर केलं. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत ते बोलत होते. शक्तीपीठ महामार्ग बाधित १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक, विधान परिषदेतील …
Read More »केंद्रीय मंत्री डॉ विरेंद्र कुमार यांची मुंबई विद्यापाठातील डॉ आंबेडकर अध्यासनातील पदांना मान्यता दोन वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासही मान्यता
मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात प्राध्यापक आणि संशोधक पदांना मान्यता दिली जाणार आहे. तसेच कलिना संकुलात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दोन स्वतंत्र वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी मुंबई विद्यापीठात केली. मुंबई विद्यापीठात आयोजित संविधान …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार रामसिंगची कोठी असलेल्या जागेचे अधिग्रहण करणार
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आले होते ती सध्याच्या मीनाबाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा येथे केली. यासंदर्भात आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही यावेळी …
Read More »राज्याची विजेची गरज जर्मनीपेक्षा अधिक होणार, ऊर्जा परिवर्तनासाठी महाराष्ट्र सज्ज ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांचे प्रतिपादन
आर्थिक प्रगतीमुळे २०३० पर्यंत महाराष्ट्र राज्याची विजेची गरज युरोपातील जर्मनी, स्पेन, इटली अशा प्रगत देशांपेक्षा जास्त असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ३.३ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा राज्याचा ऊर्जा परिवर्तन आराखडा तयार करण्यात आला असून भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे, असे प्रतिपादन अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी गुरुवारी मुंबईत केले. …
Read More »
Marathi e-Batmya