Editor

उच्च न्यायालयाचा सवाल, टीपू सुलतानच्या जंयतीवर बंदी का ? कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न मिरवणुकीला परवानगी नाकारण्याचे कारण नव्हे

म्हैसूरचा शासक टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी आहे का ? असा प्रश्न उपस्थित करून उच्च न्यायालयाने टिपू सुलतान याच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्याची परवानगी मागणाऱ्या अर्जावर निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिले. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मिरवणुकीला परवानगी नाकारण्याचे कारण असू शकत नाही, अशी टिप्पणीही केली. …

Read More »

उच्च न्यायालयाचा सवाल…तर सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारांचे काय ? पोलीस आणि पालिका प्रशासनाला पुन्हा विचारणा

बेकायदा फेरीवाल्यांनी शहरातील एकही गल्ली किंवा जागा सोडलेली नाही. पदपथावरील बेकायदा फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना एखाद्या दुकानात जाणेही कठीण होऊ बसले आहेत. त्यातील बहुसंख्य फेरीवाले अधिकृत आहेत, तरीही अशा फेरीवाल्यांना त्यांचे मूलभूत असतील, मग पदपथावरून चालणाऱ्या सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारांचे काय?, ते डावलून चालेल का?, अशी विचारणा गुरुवारी उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिका …

Read More »

गॅरी कॅस्पोरोव्हचा विक्रम मोडीत काढत डी गुकेश बनला सर्वात तरूण विश्वविजेता बुद्धीबळ स्पर्धेत विश्वविजेता डिंग लिरेनचा केला पराभव

भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेशने गुरुवारी, १२ डिसेंबर रोजी सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्यातील निर्णायक १४व्या सामन्यात विद्यमान चॅम्पियन डिंग लिरेनचा पराभव करून सर्वात तरुण-तरुण विश्वविजेता बनून इतिहास रचला. अवघ्या १८ व्या वर्षी, गुकेश देखील विश्वनाथन आनंद नंतर, शास्त्रीय बुद्धिबळ विश्व विजेतेपद पटकावणारा दुसरा भारतीय बनला. डी गुकेशने यापूर्वी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, गुंतवणूकदारांना मदतीसाठी “कंट्री डेस्क” विशेष कक्ष जागतिक, प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत गुंतवणूक धोरण तयार करण्यावर भर

देश विदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीकरिता आकर्षित करण्यासाठी राज्य शासनामार्फत आता विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. देशी-विदेशी गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी “कंट्री डेस्क” या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. नवीन गुंतवणूकीसाठी जागतिक व प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री …

Read More »

अजित पवार म्हणाले, १४ ला होऊ शकतो, तर देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती, बर झालं… मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेवरून अद्यापही अनिश्चितता

राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून जवळपास २० होत आले. तर राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा शपथविधी पार पडून सात दिवस झाले. तरीही राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्ताराचा काही मुहुर्त लागताना दिसून येत नाही. त्यामुळे विविध तर्क वितर्कांना उधाण आले असतानाच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, परभणीत संविधानाची विटंबना करणाऱ्यांना कठोर शासन करा परभणीत आगडोंब उसळत असताना भाजपा युती सरकार बेफिकीर, मंत्रीपदे व मलईदार खात्यांसाठी मारामारी

परभणीत भारतीय राज्यघटनेची विटंबना करण्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. हा प्रकार महामानव डॉ बाबासाहेब आंबडेकर व संविधानाला मानणा-या कोट्यवधी लोकांचा घोर अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे, असा संतप्त सवाल करून संविधानाची विटंबना करणा-यांच्या मुसक्या आवळून त्यांना कठोर शासन करा, अशी मागणी …

Read More »

८५ व्या वर्षाच्या तरूणाने दिल्लीच्या वर्तुळात पुन्हा आणले चर्चांचे उधाण निवडणूकीत कमी जागा मिळाल्या तरी राजकीय महत्व दाखविण्यात यश

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच शरद पवार यांचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या रणनीतीला निवडणूकीच्या रणांगणात मोठे महत्व नेहमीच रहात आले आहे. मागील अनेक वर्षापासून शरद पवार यांनी त्यांच्या वाढदिनाच्या दिवशी नेहमीच बारामती किंवा मुंबईत राहणे पसंत केले. इतकेच नव्हे तर महाविकास आघाडीचे सरकार उलथवून महायुतीची सत्ता राज्यात आल्यानंतर शरद पवार यांनी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्राची कान उघडणवीस मोफत रेशनपेक्षा रोजगार निर्मितीवर भर द्या अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत प्रकरणावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे बोल

केंद्र सरकारने गरिबांना फक्त मोफत रेशन देत राहण्यापेक्षा रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची कान उघडणी केली. अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अन्न पुरवठा करण्यासंबंधी एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला खडबोल सुनावले. सर्वोच्च न्यायालय पुढे आपल्या निकाला दरम्यान म्हणाले की, जर राज्यांना मोफत रेशन …

Read More »

रविंद्र वायकर यांच्या खासदारकीबाबत उच्च न्यायालय काय देणार निकाल? कीर्तीकर यांच्या निवडणूक याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने ठेवला राखून

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदरासंघातील एकनाथ शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला शिवसेना गटाचे (उबाठा) उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक याचिकेतून आव्हान दिले. या याचिकेवरील दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून उच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला. अमोल कीर्तीकर यांनी याचिकेत उपस्थित केलेला मुख्य मुद्दा टेंडर मतांशी संबंधित आहे. अमोल …

Read More »

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार सहकुटुंब पोहोचले दिल्लीतल्या घरी अजित पवार यांच्या पक्षाचे इतर नेतेही पोहोचले शरद पवारांच्या घरी

लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने पवार कुटुंबात पडलेल्या राजकिय फूटीच्या पार्श्वभूमीवर विविध तर्क वितर्क लढविले जात होते. तसेच पवार कुटुंबात अंतर्गत कलह वाढला असल्याचेही सांगण्यात येत होते. परंतु शरद पवार यांच्या आज ८५ व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा महाजन, पार्थ पवार आदी सर्वजण शरद …

Read More »