राज्यातील रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि राज्याच्या ‘एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था’ या उद्दिष्टाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या प्रकल्पांसाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक (एआयआयबी) आणि न्यू डेव्हलपमेंट बँक (एनडीबी) यांच्याकडून प्रत्येकी १ अब्ज अमेरिकी डॉलर्सचे अर्थसहाय्य दोन टप्प्यांत …
Read More »मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँककडून सरकारला अर्थसहाय्य टप्पा-३ ला गती ३५०० किलोमीटर रस्त्यांसाठी ६ हजार कोटींना मंजुरी
राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ अंतर्गत आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) च्या अर्थसहाय्याने सुमारे ३,५०० किलोमीटर लांबीचे रस्ते व पुलांच्या कामांसाठी ६,४२९ कोटी रुपयांच्या तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या योजनेसाठी एआयआयबीकडून सुमारे ५०० दशलक्ष अमेरिकी …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एअर इंडिया इमारत करारनाम्याचे हस्तांतरण एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात करारनाम्याचे हस्तांतरण
मंत्रालयाजवळील एअर इंडिया इमारत राज्य शासनाने खरेदी केली आहे. एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनी आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील करारनाम्यांचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पर्यटन मंत्री …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, रायगडावरील सुविधांची सामूहिक पाहणी करून व्यापक आराखडा ठरविणार रायगड किल्ल्याचे जतन व संवर्धन आणि रायगड विकास प्राधिकरणाच्या कार्य प्रणालीचा सर्वकष आढावा
रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, रायगड किल्ल्याचे जतन व संवर्धन तसेच रायगड विकास प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी संयुक्त स्थळ पाहणी करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले. रायगड किल्ला विकास पर्यटन आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी …
Read More »सीबीएसई म्हणते, संकेतस्थळावर सायबर हल्ल्याचे प्रयत्न दोन मिनिटात १५ लाख हिट्स एक्सवर पोस्ट करत दिली माहिती
सीबीएसईने एक्सवर केलेल्या पोस्टनुसार, मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सीबीएसई CBSE पुनर्मूल्यांकन पोर्टलद्वारे १६,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते, त्याचवेळी या प्लॅटफॉर्मवर अनेक सायबर हल्ल्यांचे प्रयत्न झाले. त्याच वेळी, या प्लॅटफॉर्मवर कथितरित्या सायबर हल्ल्यांची मालिका सुरु झाली. त्या अनुशंगाने सीबीएसईने जारी केलेल्या निवेदनानुसार, ताज्या घटनेत डिनायल-ऑफ-सर्व्हिस (DoS) हल्ल्याचा प्रयत्न …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार, कांदा उत्पादक शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहणार कांद्याला हमी भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचा विराट क्रांती महामोर्चा, पुणे नाशिक महामार्ग रोखला
शेतक-यांनी रक्ताचे पाणी करून मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा कवडीमोल दराने विकावा लागत आहे. कांद्याला प्रति किलो दोन रुपयेही दर मिळत नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव व शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष व महाविकास संघर्ष करत राहील …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती ७८ हजार वृक्ष लागवड आणि इंधन बचतीची व्यापक मोहीम स्वच्छ, हरित आणि सक्षम एसटी घडवण्याचा संकल्प; एसटीचा ७८ वा वर्धापन दिन
महाराष्ट्राच्या जनमानसाशी अतूट नाळ जुळलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण एसटी परिवाराने ‘स्वच्छ एसटी, हरित एसटी आणि बचत करणारी सक्षम एसटी’ घडविण्याचा निर्धार करावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात मंत्री प्रताप सरनाईक …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा नीट-युजी परिक्षा संगणक आधारीत घेण्यास नकार एनटीएच्या प्रस्तावावर न्यायालयाची भूमिका
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (१ जून, २०२६) राष्ट्रीय चाचणी संस्थेला (NTA) NEET-UG २०२६ ची फेरपरीक्षा सध्याच्या लेखी परीक्षेऐवजी संगणक-आधारित चाचणी (CBT) स्वरूपात घेण्याचे निर्देश देण्यास नकार दिला. परीक्षेच्या या टप्प्यावर पद्धतीत बदल केल्यास व्यावहारिक अडचणी निर्माण होतील, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. मूळतः ३ मे रोजी होणारी नीट युजी NEET-UG २०२६ परीक्षा, …
Read More »मान्सूनचे भारतात आगमन उशीराने होणार, कारणं काय उशीर होण्याला हवामान तज्ञांकडून मान्सूनची तारीख तीन वेळा बदलली
भारताचा नैऋत्य मान्सून, जो आतापर्यंत केरळमध्ये दाखल व्हायला हवा होता, तो उशिरा येत आहे आणि ताज्या अंदाजानुसार तो ३ जूनपूर्वी किनारपट्टीवर पोहोचणार नाही, इतकेच नव्हे तर काही हवामान तज्ज्ञांच्या मते यात आणखी विलंब होऊ शकतो. हवामान तज्ज्ञांना ही तारीख पुढे ढकलण्याची ही तिसरी वेळ आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सुरुवातीला …
Read More »राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका, त्यांना आंब्यावर बोलायला वेळ होता सीबीएसईच्या उत्तर पत्रिकांच्या स्कॅनिंगच्या घोळामुळे गोंधळ
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इयत्ता १२वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीसाठीच्या बोर्डाच्या निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सरकार आणि सीबीएसईवर आपला हल्ला अधिक तीव्र केला आहे. व्यावसायिक उपकरणांऐवजी मोबाईल फोन वापरून उत्तरपत्रिका स्कॅन केल्या गेल्याचे नवीन दावे त्यांनी केले आहेत. सीबीएसईच्या पहिल्या डिजिटल मूल्यांकन प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या वादाचा चेहरा बनलेल्या विद्यार्थ्यांशी …
Read More »
Marathi e-Batmya