Editor

जिओ फायनान्सिअल सर्व्हिसेस रिलायन्ससोबत करणार ३६ हजार कोटींचा करार इलेक्ट्रॉनिक वस्तु आणि जागांसाठी करार करण्याचा विचार

जिओ फायनान्सिअल सर्व्हिसेस Jio Financial Services (JFS) ची रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) च्या शाखे सोबत ३६,००० कोटी रुपयांच्या करारावर लक्ष आहे, कारण कंपनीच्या पोस्टल बॅलेट नोटिसनुसार, डिव्हाइस लीजिंग व्यवसायात पाऊल टाकण्याची त्यांची योजना आहे. प्रस्तावानुसार, JFS चे एक युनिट, जिओ लीजिंग सर्व्हिसेस, राउटर आणि सेल फोनसह दूरसंचार उपकरणे आणि उपकरणे विकत …

Read More »

अश्नीर ग्रोव्हर आणि त्याच्या पत्नीला ८० कोटी रूपयांची सिक्युरिटी ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश अश्नीर ग्रोव्हर भारत पे सहसंस्थापक

दिल्ली उच्च न्यायालयाने भारत पे चे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर यांना अमेरिकेला जाण्यापूर्वी ८० कोटी रुपयांची सुरक्षा ठेव देण्यास सांगितले आहे. ही सुरक्षा मालमत्तेच्या स्वरूपात असणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यासोबतच, या जोडप्याला परदेशी नागरिकांना ‘गोल्डन व्हिसा’ मिळाल्यामुळे युनायटेड अरब अमिराती (UAE) मध्ये कोणत्याही …

Read More »

व्ही के सक्सेना यांनी दाखल केलेल्या खटल्यात मेधा पाटकर दोषी दिल्ली न्यायालयाने ठरविले दोषी

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना व्ही के सक्सेना यांनी २००१ मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात शुक्रवारी दिल्ली न्यायालयाने दोषी ठरवले. व्हीके सक्सेना सध्या दिल्लीचे नायब राज्यपाल आहेत. साकेत न्यायालयाचे महानगर दंडाधिकारी राघव शर्मा यांनी पाटकर यांना भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम ५०० अंतर्गत गुन्हेगारी …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल,… गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे का नाही? देवेंद्र फडणविसांच्या सत्ताकाळात महाराष्ट्र, राज्यातील जनता व कायद्याचे रक्षकही असुरक्षित

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. २०१४ पासून गृहमंत्रालय सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याला लाभलेले सर्वात निष्क्रीय व बेजबाबदार गृहमंत्री आहेत. पुण्यात दोन तरुणांना कारखाली चिरडून मारले जाते, जळगावातही तसाच प्रकार घडतो आणि आता कायद्याचे रक्षक असलेले तहसिलदार यांच्यावर भरदिवसा हल्ला होतो, गृहविभाग काय करतो, …

Read More »

डोंबिवली स्फोटातील मृतांची संख्या १० वर, मालकाला अटक अपघातस्थळावरून आणखी तीन मृत्यू सापडले

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील रासायनिक कारखान्यात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या १० वर पोहोचली असून अपघातस्थळावरून आणखी तीन मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. डोंबिवली बॉयलर स्फोट प्रकरणी पोलिसांनी अमुदान केमिकल्सच्या मालक – मालती प्रदीप मेहता, मलय प्रदीप मेहता यांच्यासह कंपनीचे संचालक, प्रशासक आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा इशारा,… मनुस्मृतीचा भाग वगळा अन्यथा रस्त्यावर उतरू शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा प्रकार म्हणजे जुने बुरसटलेले विचार व वर्णभेदाचा पुरस्कार

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न म्हणजे जुने बुरसटलेले विचार व वर्ण भेदाला पुरस्कृत करण्याचा प्रकार आहे. भाजपाला देशाच्या भवितव्याची चिंता नसून मनुवादी विचारांच्या ऱ्हासाची चिंता आहे म्हणूनच शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचे घाटत आहे. राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा (SCERT) ने जाहीर केला आहे. यात मनुस्मृतीचा समावेश आहे. हा …

Read More »

प्रवरा नदीपात्रात बचाव कार्य करताना बचाव दलाच्या तीन जणांना वीर मरण प्रवरा नदीत दोन मुलांचा बचाव करताना निधन

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुगाव बु. येथे प्रवरा नदीपात्रामध्ये दोन मुले बुडाली असल्यामुळे महसूल व वनविभाग मंत्रालय यांचे आदेशान्वये घटना स्थळावर शोध व बचाव कार्य करण्यासाठी राज्य राखीव पोलीस बलाचे अंतर्गत असलेले राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथील एक बचाव तुकडी २२.०५.२०२४ रोजी १९.४४ वाजता रवाना करण्यात आली होती. ही …

Read More »

शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीची नवी तारीख जाहिर आता विधान परिषदेसाठी २६ जून रोजी द्वैवार्षिक निवडणूक

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांसाठी निवडणूक होत असून सोमवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण …

Read More »

शरद पवार यांचा इशारा, सरकारला जागं करतोय, अन्यथा आम्हाला इतर पर्याय… पाणी साठा सर्वात कमी

राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्याचे नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यातील महायुती सरकारवर केला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत आज बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यामध्ये पावसाची स्थिती …

Read More »

बीडमध्ये बोगस मतदानाचे २०० व्हिडिओ, पुर्नमतदान घ्या राष्ट्रवादीची मागणी शरद पवार यांच्या उपस्थितीतच केली मागणी

नुकतेच लोकसभा निवडणूका पार पडल्या त्यात बीड लोकसभा मतदारसंघात ४ थ्या टप्प्यात मतदान पार पडले. मात्र मतदानाच्या दिवशी बीड जिल्ह्यातील परळी आणि इतर काही भागात बोगस मतदान करण्यात आल्याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले. या पार्श्वभूमीवर बीडमधील बोगस मतदानाची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच बोगस मतदान झालेल्या ठिकाणी पुर्नमतदान …

Read More »