जियोब्लॅकरॉक फ्लेक्सी कॅप फंड, एक ओपन-एंडेड डायनॅमिक इक्विटी स्कीम जी लार्ज-, मिड- आणि स्मॉल-कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करते, आज, ७ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांची नवीन फंड ऑफर (एनएफओ) बंद करत आहे. शक्तिशाली जिओ-ब्लॅकरॉक भागीदारीद्वारे समर्थित, हा फंड जागतिक मालमत्ता व्यवस्थापकाचा भारतातील पहिला सक्रिय इक्विटी ऑफर आहे – जागतिक तंत्रज्ञान, स्थानिक पोहोच …
Read More »सोने-चांदीच्या दरात सलग सातव्या आठवड्यात तेजी दराने विक्रमी उच्चांक गाठले
जगभरामध्ये सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे, सलग सातव्या आठवड्यात तेजी दिसून येत आहे आणि नवीन विक्रमी उच्चांक गाठले आहेत. काही गुंतवणूकदारांना ही गती वाढलेली दिसते का असा प्रश्न पडत असताना, हेलिओस कॅपिटलचे सीईओ दिनशॉ इराणी यांचा असा विश्वास आहे की मौल्यवान धातूंना अजूनही चमकण्यासाठी ‘काही’ जागा आहे. …
Read More »जगभरात पवन आणि सौर ऊर्जेच्या मागणीत वाढ जीवाश्म इंधनाचा वापर पहिल्यांदाच कमी झाला
२०२५ च्या पहिल्या सहामाहीत जागतिक वीज मागणीतील वाढ पूर्णपणे सौर आणि पवन ऊर्जेने पूर्ण केली, जी स्वच्छ ऊर्जेकडे ऐतिहासिक बदल आणि जीवाश्म इंधन निर्मितीमध्ये पहिली नोंद झालेली घट असल्याचे एनर्जी थिंक टँक एम्बरच्या नवीन अहवालात म्हटले आहे. अहवालात असे दिसून आले आहे की सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती इतकी वेगाने …
Read More »सांडपाणी प्रक्रिया, पुनर्वापर धोरण – २०२५ जाहीर चक्रीय अर्थव्यवस्थेस चालना, राज्यातील ४२४ शहरांना लाभ होणार
राज्यातील नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याच्या पुनर्वापराद्वारे चक्रीय अर्थव्यवस्थेस चालना देण्याचे धोरण आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणाच्या अंमजबजावणीसाठी नगरविकास विभाग समन्वयक म्हणून काम करेल. त्यासाठी या विभागाला ५०० कोटी देण्याच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. राज्यात ४२४ नागरी स्थानिक संस्था आहेत. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत
राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामध्ये २९ जिल्हे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त २५३ तालुके आणि २०५९ मंडळांमध्ये मदतीसाठी ६५ मिलीमिटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नुकसानग्रस्त भागातील बळीराजाला पुन्हा उभे करण्यासाठी ३१ हजार …
Read More »मंत्रिमंडळाचा निर्णय, एसआरएतंर्गत या तीन जमिनीवर क्लस्टर रिडेव्हलमेंट राबविणार एसआरएअंतर्गत खासगी, शासकीय, निमशासकीय भुखंडावर योजना राबविणार
मुंबईतील क्षेत्रात मोठ्या खासगी, शासकीय, निमशासकीय भुखंडावरील झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुंबईत झोपड्या व त्याचबरोबर काही जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, बांधकामे, भाडेकरू व्याप्त इमारती, बांधकाम अयोग्य मोकळ्या जागा तसेच काही वस्त्या आहेत. अशा क्षेत्राचा पुनर्विकास नगर …
Read More »वर्षा गायकवाड यांची टीका, सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला न्यायव्यवस्थेला धमकावण्याचा उघड प्रयत्न सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याच्या निषेधार्ह मुंबई काँग्रेसची निषेध रॅली
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयातच एका वकीलाने हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न हा एखाद्या व्यक्तीवरचा किंवा पदावरचा हल्ला नाही, तर तो संविधानावरचा हल्ला आहे. देशात सरन्यायाधीशच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय, असा संतप्त प्रश्न करून सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला न्यायव्यवस्थेला धमकावण्याचा उघड प्रकार आहे. या हल्लेखोरावर रासुका कायद्याखाली करवाई करा जेणेकरून …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी अदानीला घाबरून पंतप्रधानांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देणे टाळले, विमानतळ उद्घाटनानंतर नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी तरी करणार का?
अतिवृष्टी व पुराने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे, खरीप हंगाम तर पूर्ण वाया गेलाच आहे पण रब्बीचा हंगामही हाती लागणार नाही अशी अवस्था आहे. शेतीच्या नुकसानासोबत शेतकऱ्यांचे घर दार संसार उघड्यावर पडले आहेत परंतु भाजपा महायुती सरकारने मात्र नुकसान भरपाईच्या नावाने फसवणूक केली आहे. लाखोंचे नुकसान झाले असताना सरकारने …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती रिक्षा व ई बाईक धोरण नियमावली दोन दिवसात प्रवासी व चालकांना केंद्रस्थानी ठेवून ॲप आधारित टॅक्सी संस्थांनी व्यवसाय करावा
ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सीसाठी समुच्चयक धोरण नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होत असून त्यामध्ये प्रवासी आणि चालकांच्या अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा पुरविणाऱ्या संस्थांनी व्यवसाय करताना प्रवासी व चालकांना केंद्रस्थानी ठेवावे. नफा कमविण्याच्या प्रयत्नात त्यांची आर्थिक लुबाडणूक करून व्यवसाय वृद्धी करु नये, अशा सूचना परिवहन …
Read More »प्रताप सरनाईक यांचे आश्वासन, एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक कामगारांचा भत्ता, घरभाडे, अन्य थकीत भत्ते, दिवाळी अग्रिम निर्णय घेणार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कामगारांच्या विविध मागण्या आहेत. त्या रास्त असून या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कामगार संघटना सोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले. बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र …
Read More »
Marathi e-Batmya