Breaking News

भाजपाकडून पदवीधर- शिक्षक मतदारसंघ निवडणूकीतील उमेदवारांची यादी जाहीर दिल्लीवरून झाली नावांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी १ डिसेंबर २०२० रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज भाजपा उमेदवारांची नावे घोषित केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी दिली. उमेदवारांची नावे अशी आहेत – १) औरंगाबाद ( पदवीधर ) – शिरीष बोराळकर २) पुणे ( पदवीधर ) …

Read More »

कोरोना : एकूण बाधित आणि नव्या रूग्णाच्या संख्येतील घट कायम ५ हजार ९२ नवे बाधित, ८ हजार २३२ बरे झाले तर ११० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणातील घसरण सातत्याने सुरुच असून मागील २४ तासात ५ हजार ९२ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १७ लाख १९ हजार ८५८ तर ११० जणांच्या मृतकांची नोंद झाली. तर ८ हजार २३२ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या …

Read More »

वाचा : विधानसभेच्या कोणत्या समितीवर कोणा आमदार-मंत्र्यांची प्रमुखपदी नियुक्ती विधान मंडळाकडून समित्यांवरील नियुक्त समिती प्रमुख-सदस्यांची यादी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विधान सभा आणि विधिमंडळाच्या कामकाजाकरिता निवडूण आलेल्या आमदार आणि विद्यमान मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याची अध्यक्ष पदी नियुक्ती करून काही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तसेच या समित्यांवर सर्व पक्षीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. विधिमंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या समित्या आणि समिती प्रमुखांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे…. अंदाज समिती- समिती प्रमुख- …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे जनतेला मंदिरांचे आश्वासन तर विरोधकांना इशारा घट झालीतरी कोविड सेंटर सुरुच ठेवणार: पण विकासकामात खडा टाकू नका

मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची संख्या कमी होत असली तरी ही संख्या कमी करण्यामागे तुम्ही सर्वजण आहात. दिवाळीनंतर पुढील १५ दिवस आपल्या सर्वांच्या कसोटीचे असून युरोपातील परिस्थिती पाहता राज्यात त्याची पुन:रावृत्ती नको म्हणून आणखी सहा महिने कोविड सेंटर आपण असेच सुरु ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी …

Read More »

युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत मात्र कोविड सुविधा काढून टाकू नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाकाळात महाराष्ट्राचा आरोग्य नकाशा या मोहिमेच्या निमित्ताने तयार झाला आहे. मोहिमेत सापडलेल्या सहव्याधी नागरिकांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. त्यांची सातत्याने  चौकशी करा; त्यामुळे दुसरी लाट आली तरी मोठी आपत्ती टाळू शकू, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या फिल्ड हॉस्पिटल किंवा कोविड केअर केंद्राच्या उभारण्यात आलेल्या सुविधा काढून टाकू नका. आपल्याला थोडा …

Read More »

खुषखबर : शाळा सुरु होणार, वाचा मुख्यमंत्री काय म्हणाले योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा आदी उपस्थित …

Read More »

कोरोना : ४५ हजारापार मृत्यू संख्या मात्र अॅक्टीव्ह रूग्ण संख्या १ लाखापेक्षा कमी ३ हजार ९५९ नवे बाधित, ६ हजार ७५९ बरे झाले तर १५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील मार्च ते आज ७ नोव्हेंबर अखेर राज्यात कोरोनामुळे तब्बल ४५ हजार ११५ मृत्यू झाले आहेत. मात्र दररोज बरे होवून घरी जाणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने आहे. मागील २४ तासात ३ हजार ९५९ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख १४ हजार २७३ वर पोहोचली तर …

Read More »

आरेच्या जागेचा व्यावसायिक उपयोग करण्याचाच फडणवीस सरकारचा डाव होता आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकल्प २० हेक्टरऐवजी ६१ हेक्टर जागेत का केला जात होता? भाजपाला सवाल

मुंबई : प्रतिनिधी मेट्रो कार शेडसाठी आरेची जागा ही फडणवीस सरकारने केवळ व्यावसायिक दृष्टीकोनातूनच निवडली होती. कांजूरमार्ग जागेचा प्रस्ताव जाणीवपूर्वक बारगळू दिला. कांजूरमार्गची जागा घेण्याकरीता खाजगी व्यक्तीला पाच हजार कोटी रुपये द्यावे लागतील हा खोटारडेपणा केला गेला हे आता सिद्ध झालेले आहे. आरे कॉलनीतील मेट्रो प्रकल्प २० हेक्टरमध्ये करणे बंधनकारक …

Read More »

शेलार म्हणाले, सचिन सावंत यांनी वेडेपणात सत्य उघड केल्यामुळे त्यांचे आभार! आरेतील भूखंडाचा श्रीखंड खाण्याचा काँग्रेसचा डाव भाजपानेच हाणून पाडला !

मुंबई: प्रतिनिधी आरेच्या जागेचा व्यावसायिक वापर करावा, असा निर्णय तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता, मात्र फडणवीस सरकारने आरेच्या जागेची अंतिम अधिसूचना प्रकाशित करताना आरेच्या जागेच्या व्यावसायिक वापराचा निर्णय रद्द केला. काँग्रेसचा भूखंड खाण्याचा सराईत डाव भाजपाने त्यावेळी हाणून पाडला होता. हे सत्य वेडेपणात, माध्यमातून चमकायच्या नादात सचिन सावंत …

Read More »

दिपावलीचा सण पुढच्या आठवड्यापासून, पण सरकारचे हे नियम पाळायचेत राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : प्रतिनिधी पारंपारीक दिवाळी सण पुढच्या आठवड्यापासून सुरु होत असून या सणामध्ये जनतेने एकत्रित येवून हा सण साजरा करण्याचे टाळावे असे आवाहन करत फटाके विरहीत सण साजरा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. तसेच दिवाळीच्या कार्यकाळात पहाट गाणी सारखे कार्यक्रम आयोजित न करण्याचे आवाहनही राज्य सरकारने नुकतेच एका निर्देशाद्वारे सर्वांना …

Read More »