Breaking News

खडसेंची स्पष्टोक्ती, मी देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष सोडला बाकी पक्षनेतृत्वाबद्दल माझी कोणतीही तक्रार नसल्याचा खुलासा

मुक्ताईनगर: प्रतिनिधी भाजपाच्या केंद्रातील असेल किंवा राज्यातील पक्षनेतृत्व करणाऱ्यांच्या विरोधात माझ्या मनात कोणतीही नाराजी नाही. मात्र आज भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहे. ते केवळ देवेंद्र फडणवीस या व्यक्तीमुळे असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. मी मंत्री पदावर असताना राज्याच्या विधिमंडळात किंवा बाहेर कोणत्याही राजकिय पक्षाने माझ्या राजीनाम्याची …

Read More »

खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. नाथाभाऊ ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील एकनाथ खडसे यांच्या …

Read More »

अखेर नाराज खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याची घोषणा राष्ट्रवादीकडून २३ तारखेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची प्रदेशाध्यक्ष पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी गेल्या चार वर्षापासून माझ्यावर अन्याय होत असल्याची भावना वेळोवेळी जाहीरपणे बोलून दाखविणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर आज सका‌ळी भाजपाला सोडचिठ्ठी देत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दुपारी दिली. एकनाथ खडसे यांच्यावर भाजपामध्ये अन्याय झाला …

Read More »

मास्कच्या किंमतीचा शासन निर्णय जाहीर: चढ्या किंमतीविरोधात येथे तक्रार करा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून  योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले आहे. राज्यात आता एन ९५ मास्क १९ ते ४९ रुपयांपर्यंत तर दुपदरी आणि तिनपदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार आहे. आज …

Read More »

पीक विमा कंपन्यांसमवेत तातडीने बैठक आयोजित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश केळी पीकाची नुकसान भरपाई मिळत नसल्याने सरकारचा पुढाकार

मुंबई : प्रतिनिधी केळी पिकासाठी लागू केलेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांना लाभ न मिळता विमा कंपन्यांना फायदा होणार आहे या तक्रारींची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी विभागाने तातडीने संबंधीत पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करून निकष तसेच नुकसानभरपाई संदर्भात मार्ग काढण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री केंद्राला पत्र देखील लिहीणार …

Read More »

कोरोना: मुंबई, ठाण्यातली संख्या घटली तर कालच्या तुलनेत राज्यात वाढ ८ हजार १५१ नवे बाधित, ७ हजार ४२९ बरे झाले तर २१३ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल ५९०० इतकी बाधितांची नोंद झालेली असतानाही मुंबईत मात्र १ हजाराहून अधिक बाधित रूग्ण आढळून आले होते. मात्र आज मुंबईत १ हजार बाधित रूग्ण आढळून आले तर ठाणे जिल्ह्यात ९९ तर शहरात २०२ रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आज या दोन्ही प्रमुख शहरात कमी रूग्णांची नोंद झाल्याचे …

Read More »

महाविकास आघाडी सरकार केंद्राच्या कामगार कायद्यातही बदल करणार कामगार संघटनांना सूचना पाठविण्याचे कामगार मंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी केंद्र शासनाने कामगार विभागाअंतर्गत विविध २९ कामगार कायदे एकत्रित करून वेतन संहिता २०१९, औद्योगिक संबंध संहिता २०२०, सामाजिक सुरक्षा संहिता २०२०, व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्यस्थळ परिस्थिती संहिता २०२० विधेयके २३ सप्टेंबर रोजी पारित केली आहेत. या नवीन संहितेबाबत विविध कामगार संघटनांनी लेखी सूचना कळवाव्यात, असे कामगार मंत्री दिलीप वळसे -पाटील …

Read More »

राज्यात एकाचवेळी १०६१ पोलीस अंमलदार झाले पोलीस उप निरीक्षक गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील १०६१ पोलीस अंमलदार यांची पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. नवीन पदावर अधिक जोमाने कार्यरत रहा, तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आहे, अशा शुभेच्छा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदोन्नत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील १०६१ पोलीस अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक या पदावर पदोन्नती …

Read More »

पंतप्रधान मोदींनी जनतेला इशारा देत हात जोडून केली ही विनंती कोरोनावरील औषध आल्याशिवाय ढिलेपणा चालणार नाही

मुंबई : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीयस्तराचा विचार केला तर भारतात दर १० लाख लोकांमागे ५ हजार नागरीक कोरोनाग्रस्त आहेत. तर याच दर पाच हजारजणा मागे ८३ जणांचा मृत्यू होत असून ही संख्या तशी कमी आहे. कारण आपण खबरदारी म्हणून खुप काळजी घेत आहोत. मात्र आता सणासुदीचे दिवस असल्याने बाजारात आणि इतर ठिकाणी …

Read More »

अखेर महिलांना लोकल प्रवास करण्यास रेल्वेमंत्र्यांनी दिली मान्यता पियुष गोयल यांची ट्विटरवरून मान्यता

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगरातील चाकरमानी असलेल्या महिलांना लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारने दिल्यानंतर त्यावर रेल्वे विभागाने रेल्वे बोर्डाच्या मान्यतेचा प्रश्न पुढे करत महिलांना प्रवास करण्यास परवानगी नाकारली होती. अखेर त्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आपली चुप्पी तोडत लोकल रेल्वेने प्रवास करण्यास मान्यता देण्याचे आज जाहीर करत महिलांना उद्यापासून …

Read More »