Breaking News

माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील पुन्हा एकदा संशयाच्या फेऱ्यात पत्नीची भागीदारी असलेल्या कंपनीवर मेहेरनजर

मुंबईः प्रतिनिधी एसआरएचे सीईओ म्हणून कार्यरत असताना आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील हे पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचे उघडकीस आले आहे. त्या अनुषंगाने त्यांच्यावर संशयाची सुई आली असून सदर प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबई उपनगराचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून विश्वास पाटील हे …

Read More »

पंतप्रधान मोदी सरकारच्या कामामुळे व नेतृत्वामुळे भाजपाचा विजय प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षात केलेले काम जनतेसमोर होते. या कामामुळे व मोदीजींच्या नेतृत्वामुळे भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणुकीत जबरदस्त विजय मिळाल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरुवारी केले. निवडणुकीत आशिर्वाद दिल्याबद्दल आपण जनतेचे आभार मानतो आणि यशाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असे …

Read More »

लोकांचा निर्णय राष्ट्रवादी, काँग्रेस महाआघाडीला मान्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी आज जो निकाल आलाय त्यापेक्षा आमची अपेक्षा वेगळी होती. मात्र लोकांनी निर्णय दिला तो राष्ट्रवादी, काँग्रेस महाआघाडीला मान्य आहे. महाआघाडीने जो प्रयत्न केला त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार… कार्यकर्त्यांना धन्यवाद… आणि लोकांनी जो निर्णय दिला तो आम्ही स्वीकारतो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद …

Read More »

जनतेचा कौल मान्य! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने स्वीकारत असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून पराभवाची जबाबदारी मी स्वीकारत असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले. काँग्रेस पक्षाने मागील पाच वर्षे सातत्याने लोकांचे प्रश्न मांडले. रस्त्यावर उतरून संघर्ष केला. त्याआधारे लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलो. परंतु, काँग्रेसला यश मिळू शकले …

Read More »

शिवसेनेच्या धैर्यशील मानेंचा “नशीबवान विजय” अत्यंत कमी खर्चात मिळविले निवडणूकीत यश

हातकणंगलेः प्रतिनिधी निवडणूका म्हटल्या की विजय मिळविण्यासाठी वारे-माप खर्च करणे आले. मग तो कधी कायदेशीर तर कधी बेकायदेशीर पध्दतीने खर्च करण्यासाठी कोणत्याही राजकिय पक्षाचा उमेदवार मागे पुढे पहात नाही. मात्र हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने हे विजयी झाले असून त्यांच्या या विजयाची चर्चा सबंध मतदारसंघात रंगू लागल्याने त्यांचा …

Read More »

“अरे लाव तो व्हीडीओ” फँक्टरचा प्रभाव ? मनसेचे इंजिन लावूनही हात-घड्याळ काही चालताना दिसेना

मुंबईः प्रतिनिधी राज्यात भाजपा-शिवसेनेला रोखण्यासाठी ऐन निवडणूकीत लाव रे तो व्हीडीओ फँक्टर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आणला. तसेच मोदी-शाह यांना सोडून कोणालाही मतदान करण्याचे आवाहन केले. परंतु दुपारपर्यंत निवडणूकीचे निकाल पाहता मनसेचा अरे लाव तो व्हीडीओचा प्रभाव काही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करत नसल्याचे चित्र निकालात पाह्यला मिळत आहे. मनसेप्रमुख …

Read More »

काटे की टक्कर सुरु असलेले मतदारसंघ वंचित परिणाम होत असलेले मतदार संघ

माढा- संजय शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस- २ लाख २८ हजार ४३१ मते रणजितसंह निंबाळकर, भाजपा- २ लाख ३९ हजार ९९ मते विजयराव मोरे, वंचित आघाडी- २२ हजार २७७ मते अमरावती आनंदराव अडसूळ, शिवसेना- २ लाख ५४६ मते नवनीत राणा, अपक्ष-रा.काँ.पुरस्कृत-२ लाख ६ हजार ९७४ मते गुणवंत देवपारे, वंचित आघाडी-२४ हजार ५७२ मते …

Read More »

वंचित आघाडीमुळे राज्यात युतीचीच आघाडी ४४ लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना तर औरंगाबादेत वंचित आघाडी पुढे

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली. मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत राज्यातील ४८ जागांपैकी जवळपास ४४ जागांवर वंचित आघाडीच्या मत विभागणी धोरणामुळे भाजप-शिवसेना युतीने आघाडी घेतली आहे. तर एकट्या औरंगाबादेत वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाची हमी देणारी मावळ, शिरूर, अहमदनगर, …

Read More »

पहिल्यांदाच राष्ट्रवादी सर्वाधिक जागा जिंकेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा विश्वास

मुंबईः प्रतिनिधी मागच्यावेळी शिवसेना- भाजपा ४२ जागा जिंकली होती. परंतु यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस २२ जागांच्यावर विजय मिळवेलच पण पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच महाराष्ट्रात राष्ट्रवादी सर्वाधिक जागा जिंकेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. सध्या येणारे एक्झिट पोल ठिक आहेत. ते आपापल्या परीने …

Read More »

एक्झीट पोल काहीही म्हणोत आम्हीच सर्व जागा जिंकणार अँड.प्रकाश आंबेडकर यांचा विश्वास

अकोलाः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला उद्या मतमोजणी होत असून तत्पूर्वी जाहीर झालेले एक्झीट पोल काहीही म्हणोत वंचित आघाडी महाराष्ट्रात सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकू शकते असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी एक्झिट पोलवर भाष्य करणं टाळलं. ज्यांना एक्झिट पोल द्यायचे होते त्यांनी …

Read More »