मुंबई

स्थानिक भाजपा आमदारच अनधिकृत बांधकामाला संरक्षण देतोय जिल्हादंडाधिकाऱ्यांनी आदेश देवूनही फौजदारी गुन्हा बिल्डरवर दाखल होईना

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. या रणधुमाळीत सत्ताधारी पक्षाकडून गतीमान सरकार आणि पारदर्शक सरकार पाच वर्षात दिल्याचा दावा करत आहे. मात्र मुंबईपासून हाकेच्या अंतावर असलेल्या मीरा-भाईंदर शहरात अनधिकृत इमारत उभारल्याप्रकरणी ठाणे जिल्हादंडाधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश देवूनही केवळ स्थानिक भाजपाच्या आमदाराच्या दबावामुळे फौजदारी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करण्यात येत …

Read More »

राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना दिवाळीपूर्वीच वेतन मुख्य सचिवांचे संघटनेला आश्वासन

मुंबईः प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणूकीच्या कामकाजासाठी अनेक कर्मचारी, अधिकारी गुंतलेले असल्याने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी-अधिकारी आणि शिक्षकांना वेतन देणार नसल्याचे राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आले होते. मात्र याप्रश्नी सरकारी कर्मचारी संघटनेने कठोर भूमिका घेत पगार दिवाळीपूर्वीच मिळावी अशी मागणी केली. या मागणीला राज्याचे मुख्य सचिव अजोय महेता यांनी सकारात्मक प्रतिसाद देत …

Read More »

भिवंडी मेट्रो कारशेडसाठी जागा पाहिजे तर बाजार भावाप्रमाणे मोबदला द्या कोन-गोवे संघर्ष समितीची मागणीमुळे भिवंडीतील मेट्रोचा मुद्दा चिघळणार

ठाणेः प्रतिनिधी भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडसाठी सरकारी जमिनीऐवजी आमच्या खासगी जमिनी संपादीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लोकहिताचा प्रकल्प असल्यामुळे जमिनी देण्यास आमचा विरोध नाही. परंतु सरकारने आम्हाला बाजार भावाप्रमाणे जमिनीचा चांगला मोबदला द्यावा, अशी मागणी कोन-गोवे संघर्ष समितीने शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत दिली. बाजार भावाप्रमाणे जमिनीचा मोबदला देणार नसाल तर …

Read More »

पीएमसी बँक खातेदारांची भाजपा कार्यालयाबाहेर निदर्शने बँकप्रकरणी आरबीआयशी बोलण्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आश्वासन

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई दौऱ्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पीएमसी बँक खातेदारांच्या नाराजीचा सामना करावा लागला असून भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर या खातेदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खातेदारांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी खातेदारांचे म्हणणे ऐकून घेत याप्रश्नी रिझर्व्ह बँकेशी बोलणार असल्याचे आश्वासन दिले. खातेदारांच्या घोषणेमुळे यापरिसरात काही काळ तणाव …

Read More »

मुंबईत सर्वाधिक उमेदवार वरळी आणि मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात ५ उमेदवारांनी घेतली माघार एकूण उमेदवार ८९ रिंगणात

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूक-२०१९ मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत १० विधानसभा मतदार संघात सर्वाधिक उमेदवार वरळी आणि मुंबादेवी मतदारसंघात आहेत. यातील वरळी विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत. तर मुंबईदेवी विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी ३ मतदारसंघातून ५ उमेदवारांनी माघार घेतली. उमेदवारी अर्ज …

Read More »

“ईडी” ने ( पवार ) “पीडा” सध्यातरी टाळली सध्या येण्याची गरज नसल्याचे ईडीने कळविल्याची राष्ट्रवादीची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्य शिखर बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या विरोधात ईडी (सक्तवसुली संचालनालय) कार्यालयाने गुन्हा दाखल केला. या गुन्हा नोंदण्याची माहिती मिळताच शरद पवार हे स्वतः आज २७ सप्टेंबरला दुपारी त्यांच्या कार्यालयात जाणार होते. परंतु पवार पोहोचण्यापूर्वीच ईडी कार्यालयाकडून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची गरज नसल्याचा ईमेल …

Read More »

मतदानामुळे २१ आणि २२ ऑक्टोंबर रोजीच्या परिक्षांचे फेरनियोजन मुंबई विद्यापीठाकडून प्रसिध्दी पत्रक जारी

मुंबई : प्रतिनिधी २१ ऑक्टोबर, २०१९ रोजीची विधानसभा निवडणूक मतदान लक्षात घेता परीक्षा विभाग मुंबई विद्यापीठाने दि.२१ व २२ ऑक्टोबर या दोन तारखांच्या नियोजित परीक्षांचे फेरनियोजन केले आहे. जेणेकरून मतदान प्रक्रिया व परीक्षांचे वेळापत्रक या दोन्ही जबाबदारी विद्यार्थ्यांना वेळेचे योग्य नियोजन करून पार पडता येतील. २१ व २२ ऑक्टोबर या …

Read More »

निवडणूक कामावर हजर होण्यासाठी जाणाऱ्या मंत्रालयातील कर्मचाऱ्याचा मृत्यू आयोगाने गंभीर दखल घेण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी निवडणूकीच्या कालावधीत अनेक शासकिय कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना निवडणूक कामाकरीता तात्पुरत्या स्वरूपात आयोगाच्या अखत्यारीत नियुक्ती केली जाते. ही नियुक्ती रद्द करण्यासाठी अनेक अधिकारी-कर्मचारी कधी आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या तर कधी काम करत असलेल्या अधिकाऱ्यांना मिनतवाऱ्या करतात. परंतु निवडणूक कामासाठी नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी जाताना मंत्रालयातील एका वरिष्ठ लिपिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना …

Read More »

राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी खाजगीकरणाच्या विरोधात करणार आंदोलन सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, आझाद मैदानावर आंदोलन करणार

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारच्या सर्व विभागातील २५ टक्के पदे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने आगामी २-३ वर्षात सरकारी सेवेतील चतुर्थश्रेणीची पदेच नष्ट होणार आहेत. त्यातच शिपाई प्रवर्गासाठी खाजगी संस्थेकडून मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत असल्याने राज्य सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या खाजगीकरणाच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये आणि मुंबईत आझाद मैदानावर १९ …

Read More »

महाजनादेश यात्रा झाली शासकिय यात्रा ? मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयातून भाजपाच्या यात्रेची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दैनंदिन शासकिय कार्यक्रम प्रसारमाध्यमांना कळावेत यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयातून त्याची माहिती देण्यात येते. मात्र शासकिय मुख्यमंत्र्यांचे शासकिय कार्यक्रम- बैठकांची माहिती देण्याऐवजी भाजपच्या राजकिय असलेल्या महाजनादेश यात्रेची माहिती मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसारमाध्यमांना कळविण्यात येत असल्याने महाजनादेश यात्रा …

Read More »