मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून संचारबंदी जाहीर केली. तरीही संचारबंदीत अन्नधान्य, भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरीकांकडून गर्दी करण्यात येत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांना रेशनचे धान्य घरपोच पोहोचवण्यासाठी मुंबई छात्रभारतीचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणुन काम करायला तयार असल्याबाबतचे पत्र मुंबई छात्रभारती संघटनेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहीले आहे. …
Read More »कोरोना लॉकडाऊनमध्ये मुंबईतल्या १० लाख झोपडीधारकांसाठी हवेचे इमले पहिल्याच आठवड्यात बंगल्यातील बैठकीत मंत्र्यांनी घेतला निर्णय
मुंबई: विशेष प्रतिनिधी मुंबईसह राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढू नये यासाठी राज्य सरकारने १५ मार्चपासून लॉकडाऊन करण्याची तयारी सुरु केली. तसेच यासंदर्भात १९ मार्चला अधिकृत आदेशही जारी केले. मात्र विकासकांचे कैवारी म्हणून वावरत असलेल्या एका मंत्र्याने मुंबईतील झोपडपट्टीवासियांसाठी फक्त हवेतल्या इमल्यांची तर विकासकांना दिर्घकालीन मलिद्याची व्यवस्था करणारा निर्णय २० मार्च …
Read More »राज्याचे मुख्य सचिव मेहतांना तीन महिन्यांची मुदतवाढ मुदतवाढीस केंद्राची मान्यता
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या संकटाने सगळ्यांना ग्रासलेले असल्याने आहे. तसेच या संकटाचा सामना करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे प्रशासन काम करत आहे. या आपातकालीन परिस्थितीमुळे त्यांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असल्याने आता मेहता हे ३० जून २०२० रोजी निवृत्त होतील. मुख्य सचिव …
Read More »गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला, किराणा, औषधांच्या गाड्या सोडाव्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एमएमआरमधील नागरीकांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केलेली असली तरी यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली. तसेच शहरातील रस्त्यांवर गर्दी होवू नये यासाठी प्रत्येक सोसायटीत राहणाऱ्या नागरीकांच्या भाजीपाल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. या भाजीपाल्याबरोबरच जर राज्य सरकारने प्रत्येक सोसायटीत, झोपडपट्टीभागात किराणा माल आणि …
Read More »कोरोनाग्रस्तांच्या विलगीकरण कक्षासाठी आदर्श बिल्डींग? रूग्णालयांच्या जागा कमी पडत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोना व्हायरसने प्रभावित झालेल्या रूग्णांच्या संख्येत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच या रूग्णांच्या संपर्कात आलेल्यानाही या आजाराची लागण होत असल्याने विलगीकरण कक्ष निर्माण करण्यासाठी खाजगी हॉटेलची मदत घेण्यात येत आहे. मात्र सरकारच्या जमीनीवर उभ्या असलेल्या ३१ मजली आदर्श इमारतीचा वापर सरकारकडून का करण्यात येत …
Read More »पनवेलमध्ये सर्व बंद तर ठाण्यात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी ठाणे, मीरा-भाईंदर, पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय
पनवेलः प्रतिनिधी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील पनवेल महापालिकेने शहरातील जीवनावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर ठाणे जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असून मीरा भाईंदर येथील सर्व धार्मिकस्थळे बंद करण्याचा निर्णय या तिन्ही महापालिकांच्या आयुक्तांनी आज घेतला. पनवेलमधील अत्यावश्यक …
Read More »सरकार स्वतःहून निर्णय घेवू शकते, मात्र मुंबईकरांनाे घराबाहेर पडणे टाळा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नागरिकांना इशारा
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील परिस्थिती चिंताजनक नाही. मात्र काळजी करण्यासारखी नक्कीच आहे. त्यामुळे आता ज्याप्रमाणात गर्दी ओसरली आहे. त्यापेक्षा आणखी कमी झाली पाहिजे मी म्हणतो की बंदच झाली पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मांडत लोकल, बसेस आदी गोष्टी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकार घेवू शकते मात्र नागरिकांनी स्वतःहूनच …
Read More »अपार्टमेंटचा वाद आता उपनिंबधक आणि सहकार न्यायालयात सुटणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील मुंबईसह लहान-मोठ्या शहरांमध्ये वाढत्या नागरीकरणांमुळे अपार्टमेंट अर्थात गृहनिर्माण सोसायट्यांची निर्मिती झाली. मात्र अपार्टमेंट विकासक आणि रहिवाशांमधील वाद सोडविण्यासाठी तक्रार निवारण कक्षच नव्हते. मात्र आता त्यासाठी कायदेशीर स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप अॅक्ट १९७० या …
Read More »कोरोना इम्पॅक्टः पुणे आणि मुंबईला येणाऱ्या-जाणाऱ्या २३ गाड्या बंद मध्य रेल्वेचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईहून पुणेला जाणाऱ्या आणि पुणेहून पुढे लांब जाणाऱ्या रेल्वे एक्सप्रेस, मेल गाड्या बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्याचबरोबर मुंबईला येणाऱ्या २३ गाड्याही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले. या सर्व गाड्या १९ मार्च ते ३१ मार्चपर्यंत …
Read More »कोरोना इम्पॅक्टः मंत्रालयात बायोमेट्रीक हजेरी बंद, स्वच्छतेवर भर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याच्या कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील कर्मचारी- अधिकाऱ्यांचा कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याच्या उद्देशाने बायोमेट्रीक हजेरी आजपासून बंद करण्याचा निर्णय घेत दर एक तासाला स्वयंचलित पायऱ्या (इस्केलेटर) , काचेच्या भिंती, फरश्यांची स्वच्छता आदी गोष्टींवर प्रशासनाने भर देण्यास सुरु केली आहे. मुंबईसह, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर आदी भागात कोरोनाचे रूग्ण …
Read More »
Marathi e-Batmya