राजकारण

शेखर चन्ने, तुकाराम मुंडे यांच्यासह १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या अण्णासाहेब मिसाळ कोकण विभागाचे नवे विभागीय आयुक्त

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आज प्रमुख १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून यात नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यासह शेखर चन्ने, अण्णासाहेब मिसाळ, लोकेश चंद्रा यांच्यासह अन्यांचा समावेश आहे. नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पदी करण्यात आली आहे. लोकेश चंद्रा यांची बदली जलसंधारण …

Read More »

किमान झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व म्हाडाचे पैसे तरी परत भाजपा आ. अतुल भातखळकर यांची मागणी

मुंबईमधील झोपडपट्टी पुनर्वसनाचे शेकडो प्रकल्प प्रलंबित असताना व हजारो झोपडपट्टी धारकांचे भाडे थकलेले असताना त्यांच्या हक्काचे एक हजार कोटी रुपये चुकीचे निर्णय घेऊन इतरत्र वळविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्याचा आरोप करून अन्य महामंडळाचे नाही तर किमान झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व म्हाडाचे पैसे तरी परत करा अशी मागणी आमदार अतुल भातखळकर …

Read More »

बंदी घातलेले चीनी अॅप वापरतो महाराष्ट्र भाजप ‘गद्दार’ भाजपच्या चीन प्रेमाचा धिक्कार!: सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी मोदी सरकारने चीनी कंपन्यांच्या ऍप्स वापरावर भारतात बंदी घातलेली असताना त्यांचाच भारतीय जनता पक्ष अत्यंत निर्लज्जपणे बंदी घातलेली चीनी ऍप्स आजही वापरत असून भाजपाची ही कृती प्रचंड चिड आणणारी आहे. बंदी घातलेले चीनी ऍप वापरून भाजपाने चीनबद्दल आजही प्रचंड प्रेम असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपच्या बेगडी राष्ट्रप्रेमाचा …

Read More »

राज्यातंर्गत प्रवासावरील निर्बंध हटवा भाजपा उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध काढून टाका अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. या बाबत भांडारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रसार थांबण्यासाठी अनेक अशा उपाययोजना राबवण्यात आलेल्या. त्याअंतर्गतच राज्यातंर्गत प्रवासावरही बंदी घातलेली. मात्र …

Read More »

काँग्रेसमधला नेतृत्व गोंधळ संपला : सोनिया गांधीच, अन्यथा राहुल गांधी अध्यक्ष पदी सोनिया गांधीच राहणार असल्याचा ठराव संमत करून बैठक संपली

नवी दिल्ली- मुंबई: प्रतिनिधी पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्याकडे ठेवायचे कि त्यांच्या ठिकाणी नवा अध्यक्ष निवडीवरून निर्माण झालेला काँग्रेसमधील गोंधळ संपुष्टात आला. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व अर्थात अध्यक्ष पद सोनिया गांधी यांच्याकडे कायम ठेवण्याचा ठराव पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत करण्यात आला असल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्यावतीने एका प्रसिध्दी पत्रकातून देण्यात आली. याविषयीचा ठराव …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा माफी मागा अन्यथा फिरू देणार नाही युवक व क्रिडा मंत्री सुनिल केदार यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी मागील अनेकवर्षापासून काँग्रेस पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्यांनी केले आहे. सध्या पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी या करत असताना त्यांच्याच नेतृत्वाविषयी राज्यातील काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, मुकल वासनिक आणि मिलिंद देवरा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कृत्य लाज वाटण्यासारखे आहे. त्यामुळे या तिन्ही नेत्यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा रस्त्यावर फिरू …

Read More »

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाचे स्वागत काँग्रेसकडून स्वागत सत्याच्या क्षीण आवाजाला ताकद देण्याची जबाबदारी न्यायालयाची आणि सत्यासाठी लढणाऱ्यांची!

मुंबई: प्रतिनिधी देशात संघ विचार पसरवण्याठी आणि भाजपाचा एकछत्री अंमल आणण्यासाठी देशातील सरकारच्या पाठिंब्याने द्वेष आणि तिरस्कार जाणीवपूर्वक पसरवला जात आहे. भाजपा नियंत्रित काही माध्यमे व समाज माध्यमातून असत्याचे कर्णकर्कश्य चित्कार केले जात तर आहेतच, पण सत्येची पाठराखण करणाऱ्या संवैधानिक संस्थाही मोडीत काढल्या जात आहेत. अशा लोकशाहीसाठी अत्यंत कसोटीच्या काळात …

Read More »

अनुकंपा तत्वावरील त्या ५६९ तरुणांना देणार आयटीआयमधून प्रशिक्षण कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये अनुकंपा तत्वावर वायरमन (तारतंत्री) पदाच्या नोकरीसाठी पात्र असलेल्या पण आवश्यक प्रशिक्षणाअभावी नोकरीपासून वंचित राहीलेल्या तरुणांना राज्यातील आयटीआयमधून प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी यंदा विद्युत वितरण कंपनी आणि आयटीआय यांच्यामार्फत राज्यातील पात्र ५६९ विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश देण्यात …

Read More »

अनलॉक ३: आता केंद्रानेही दिली राज्यांतर्गत प्रवासाची मोकळीक केंद्र सरकारने दिली परवानगी एका राज्यतून दुसऱ्या राज्यात जाता येणार

नवी दिल्ली- मुंबई: प्रतिनिधी गणेशोत्सव आणि राज्यातील जनतेला आणखी मोकळीक देण्याच्या उद्देशाने missionbeginagain अंतर्गत राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारने नुकतीच दिली. त्यापाठोपाठ आता राज्यातंर्गत प्रवासास केंद्राने परवानगी अनलॉक-३ अंतर्गत आज परवानगी दिली.त्याचबरोबर त्यासाठी कोणत्याही परवानगीची असलेली अटही काढून टाकण्यात आली. त्यामुळे आता एका राज्पातून दुसऱ्या …

Read More »

गृहमंत्र्यांनी करून दिली गणेशोत्सव आणि मोहरमसाठीच्या नियमावलींची आठवण : वाचा नियम उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी गणेशोत्सव तसेच मोहरम साध्या पदध्तीने  करावेत, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. २२ ऑगस्टपासून राज्यात गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण सुरु होत आहे. गणेशोत्सवासाठी गृहविभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.  १)सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सर्व संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाची …

Read More »