राजकारण

राज्यात गणेशोत्सवाचेच नियम नवरात्र उत्सवाला का? भाजपा नेते आशिष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी गणेशोत्सवापूर्वी मुर्तीकारांना शासन निर्णयाची माहिती दिली गेली नाही. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. आता नवरात्रोत्सवाची तयारी झाली असल्याने देवीच्या मुर्ती तयार होण्यापूर्वी शासन निर्णय जाहीर केल्यास त्यांचे संभावित आर्थिक नुकसा होणार नाही. त्यामुळे नवरात्र उत्सवालाही गणेशोत्सवाचे नियम लागू आहेत का? असा सवाल करत यासंदर्भात बैठक घेवून …

Read More »

राज ठाकरेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना इशारा…अन्यथा आदेश झुगारून मंदिर प्रवेश मंदिरावर अवलंबून असलेली छोट्या अर्थव्यवस्थेचा तरी विचार करण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी राज्यात अनेक मंदिर आहेत. मात्र या मंदिरावर फक्त पुजाऱ्यांची उपजिविका अवलंबून नाही तर मंदिरावर अवलंबून असलेले गुरव आणि त्याच्याशी निगडीत असलेली तेथील गावाची किंवा छोट्या व्यापाऱ्यांची अर्थ व्यवस्था अवलंबून आहे. त्याचबरोबर अनलॉकच्या नावाखाली जनजीवन सुरळित करण्याचे प्रयत्न सुरु असताना सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे असा सवाल …

Read More »

राज्यातील १० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या रजनीश सेठ एसीबी महासंचालक पदी नियुक्ती

मुंबई: प्रतिनिधी पोलिस दलातील बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी झाला असून यशस्वी यादव यांची विशेष महानिरिक्षक सागरी सुरक्षा व विशेष सुरक्षा विभागातूनसह पोलिस आयुक्त मुंबई शहर या पदावर करण्यात आली. तर मधुकर पाण्डे यांची वाहतूक विभागाच्या सह आयुक्त पदावरून सागरी व विशेष सुरक्षेच्या विशेष महानिरिक्षक पदावर नियुक्त केली. विशेष सुरक्षा विनयकुमार …

Read More »

“मी पुन्हा येणार” गोष्टआवडली कि नाही याचा शोध घेतोय भाजपा नेते एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका

जळगांव : प्रतिनिधी निव्वळ मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का ? कोणत्या कारणासाठी ? याचा शोध मी घेत असल्याचा उपरोधिक टोला भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावत मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपाचं एकट्याच्या बळावर …

Read More »

तो आदेश रद्द केल्याने आता गावाकडील घराच्या मालमत्तेवर कर्ज मिळणार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या एका आदेशान्वये ग्रामस्थांच्या मालकीहक्क दर्शविणाऱ्या मालमत्ता कर आकारणी पत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात आली होती. पण आता हा आदेश रद्द करण्यात येत असून त्यामुळे ग्रामस्थांना …

Read More »

राज्यात चाचण्या वाढविल्या पण मुंबईत मात्र कमीच ४२ टक्के वाढविताना मुंबईत केवळ १४ टक्के चाचण्या-फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होत असताना, मुंबईतील चाचण्या वाढवा असा सातत्याने आग्रह करीत असताना सुद्धा मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ १४ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत ४२ टक्के आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा …

Read More »

या बँका देणार शासकिय अधिकाऱ्यांना वेतन खात्याबरोबर अपघात विम्याचे कवच राज्य सरकारकडे बँकांनी सादर केले प्रस्ताव

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राष्ट्रीयकृत बँकामधील आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच काही बँकामधील गंगाजळी कमी झाल्याचे चर्चा ऐकायला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील चार बँकांनी आपल्या बँकातील आर्थिक व्यवहार वाढविण्याच्यादृष्टीने शासकिय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बँकांमध्ये पगाराची खाती उघडल्यास अपघात विम्याचा मोफऱत लाभ देण्याची घोषणा केली. तसेच त्यासंदर्भातचा एक …

Read More »

यंदाचा शिक्षक दिन साजरा होणार सोशल माध्यमांवर “Thanks A Teacher “ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले, रविद्रनाथ टागोर यांच्यासह माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या शिक्षक दिनानिमित्त यंदा “Thanks A Teacher” हे अभियान सोशल मिडियाच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला आहे. …

Read More »

माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांचे निधन वयाच्या ८४ व्या वर्षी रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे संकट मोचक तथा देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया या महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळण्यास सुरुवात झाली. त्यातच ते कोमात गेले. कोमातून बाहेर आणण्यासाठी त्यांच्यावर अनेक उपचार करण्यात आले. परंतु ते कोमातून …

Read More »

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा आणि निकाल दोन्ही ऑक्टोंबरमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षेला सुरूवात तर महिना अखेरला निकाल- उदय सामंत

मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालयातील अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने विचार करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी  घराबाहेर न जाता घरी बसूनच परीक्षा देता यावी अशा परीक्षा पद्धतीचे नियोजन करण्यात येत आहे. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. आज मंत्रालयात उच्च व तंत्र …

Read More »