मुंबई: प्रतिनिधी भाजपशासित राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या दडवली जात असून गुजरातमध्ये तर चाचण्याच केल्या जात नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. उच्च न्यायालयानेच गुजरातमधील आरोग्य यंत्रणेची पोलखोल करत तेथील रुग्णालये हे अंधार कोठडीपेक्षा भयानक असून गुजरातची तुलना बुडत्या टायटॅनिक जहाजाशी केली. गुजरातमध्ये चाचण्याच केल्या जात नाहीत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये …
Read More »सरकार म्हणते ८ लाख तर रेल्वे म्हणते १५ लाख कामगारांना घरी सोडले स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्याच्या आकडेवारीवरून गोंधळ
मुंबई : प्रतिनिधी राज्यात विशेषत: मुंबई महानगरातील स्थलांतरीत कामगारांना बिहार, उत्तर प्रदेशमधील स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या घरी पोहोचविण्यावरून रेल्वे गाड्या उपलब्ध असणे-नसण्यावरून केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकाबाजूला या कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमापर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वेबरोबरच एसटीने ७ ते ८ लाख जणांना पोहोचविल्याचे राज्य …
Read More »राज्य सरकार म्हणते, विमानाबरोबर आता दैनदिंन रेल्वे सेवाही सुरु होणार केंद्र सरकार टप्प्याटप्याने रेल्वे सेवा सुरु करणार असल्याचे राज्याची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील अर्थचक्राला गती देण्याच्या उद्देशाने आणि लॉकडाऊनमुळे थांबलेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारने देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर राज्यातंर्गत रेल्वे सेवाही टप्याटप्याने सुरु करण्याचा विचार केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती राज्य सरकारने आज जाहीर केल्याने दैनदिन रेल्वेसेवा लवकरच सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र याबाबतची …
Read More »अंदमानातील तुरूंगवासानंतरचे वीर सावरकर, चार खंडातील पुस्तकांचे लवकरच प्रकाशन हिंदी भाषेत प्रकाशित होणार असल्याची बीमा मंडीचे संस्थापक प्रशांत करूलकर यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी स्वातंत्र्यावीर वि.दा.सावरकर यांच्या अंदमान येथील तुरुगांनंतरच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या हिंदी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होणार असून या पुस्तकाचे चार खंड प्रकाशित होणार आहेत. रत्नागिरी पर्व, हिंदू महासभा पर्व, अखंड हिंदूस्थान संघर्ष पर्व आणि अंतिम पर्व अशा चार खंडातील हिंदी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन सावरकरांच्या १३७ व्या जयंतीदिनी होणार असल्याची …
Read More »शाररीक अंतर पाळत १५ जूनपासून शाळा सुरु? शिक्षण विभागाची तयारी तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे स्पष्ट संकेत
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. मात्र राज्यातील कोरोनाची संख्या तरीही वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनासोबत जगण्याचा भाग म्हणून रेड झोन वगळता राज्याच्या इतर भागातील शाळा १५ जून पासून सुरु करण्याचा विचार शालेय शिक्षण विभागाकडून गांभीर्याने करण्यात येत असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे …
Read More »मुख्यमंत्री म्हणाले, अडचणीच्यावेळी राजकारण करण्याचे संस्कार आमचे नाहीत पोकळ घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रभावी योजना राबविण्यावर भर राहणार असल्याचा फडणवीस-भाजपाला टोला
मुंबई: प्रतिनिधी राज्यावर कोरोनाचे संकट असून या संकटावर मात करण्यासाठी सर्वचजण प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र काहीजण राजकारण करत आहेत. तुम्हाला हवे ते बोला, मात्र मी राजकारण करणार नाही. माझ्यावर महाराष्ट्राचा विश्वास आणि जबाबदारी आहे. तसेच अडचणीच्या, संकटाच्या काळात राजकारण करण्याचे संस्कार आमचे नसून महाराष्ट्राच्या नीतीमत्तेतही नसल्याचे सांगत विरोधी पक्षनेते …
Read More »भुजबळ म्हणाले, आमचे ओबीसींचे २७ टक्के आरक्षण द्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय कोट्यामध्ये ओबीसींना नियमानुसार २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक असुनही केंद्रिय वैद्यकीय प्रवेश समितीने देशभरातील १७७ वैद्यकीय महाविद्यालयांमधील केंद्राच्या राखीव जागांमधील १५ टक्के केंद्रीय कोट्यातून केवळ ३.८ टक्केच आरक्षण ओबीसींना दिले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून न डावलता त्यांना राष्ट्रीय कोट्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी हक्काचे २७ टक्के …
Read More »भाजपाने १५ दिवसात अख्खा महाराष्ट्र सहभागी झाल्याचा दावा केला असता प्रत्येक प्रसिध्दीपत्रकासोबत मोफत हाजमोला गोळ्या वाटण्याचा काँग्रेस प्रवक्ते सावंत यांचा खोचक सल्ला
मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शुक्रवारी केलेले आंदोलन साफ फसले असतानाही लाखो कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा करण्यासाठी दोनदा प्रेसनोट काढण्याची नामुष्की ओढवली तसेच आंदोलन यशस्वी झाल्याचे दाखवण्यासाठी त्यांचा संख्या वाढीचा वेग पाहता १५ दिवसात अख्खा महाराष्ट्रच सहभागी झाल्याचे दिसले असते. भाजपाच्या या हास्यास्पद दाव्याची पोलखोल …
Read More »आणि मुख्यमंत्र्यांची छाती अभिमानाने फुलली….केला सलाम कोविड योद्ध्यांना मुख्यमंत्री ठाकरेंकडून वैयक्तिक पत्र लिहून केले कौतुक
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले असून प्रत्येक कोविड योद्ध्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे, असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री आपल्या पत्रात म्हणतात की, आपल्या सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहिताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी …
Read More »“माझे आंगण, रणांगण” मतदारसंघ सोडून फडणवीस, प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे आंदोलन अडीच लाख कार्यकर्त्यांनी केले आंदोलन
मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारच्या निष्क्रीय काराभाराच्या विरोधात भाजपाने पुकारलेल्या माझे आंगण, रणांगण आंदोलनात भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी आपला पुणे येथील मतदारसंघाऐवजी कोल्हापूरात फलक धरून आंदोलन केले. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला नागपूरचा मतदारसंघ सोडून मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री विनोद …
Read More »
Marathi e-Batmya