राजकारण

पोलिस, होमगार्ड, अंगणवाडी, रोजदांरी, कंत्राटीसह सर्वांना ५० लाखाचे विमा संरक्षण कोरोनाविरुद्धच्या लढाईत यापूर्वी मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचे अनुदान देणार - अजित पवार

मुंबई: प्रतिनिधी कोरोना साथप्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधित कर्तव्ये पार पाडणाऱ्या शासकीय, खाजगी, कंत्राटी, बाह्यस्त्रोतांद्वारे घेतलेले कर्मचारी, मानसेवी, तदर्थ कर्मचारी अशा सर्व कर्मचारी बांधवांना ५० लाख रुपयांचे विमासंरक्षण पुरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्य बजावणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना …

Read More »

वारी होणार पण, या तीनपैकी एका पर्यायाचा वापर करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरील बैठकीत चर्चा

मुंबई: प्रतिनिधी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे वैभव आणि परंपरा म्हणून गणलेल्या गेलेल्या पंढरीच्या आषाढी वारी पायी करण्यास परवानगी नकारण्यात आलेली असली तरी वारी व्हावी या उद्देशाने वारकरी संप्रदायाच्या प्रमुख ७ पालख्यांसमोर तीन पर्याय ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार संताच्या पादुका निवडक लोकांच्या संगतीत वाहनाद्वारे, विमानाने किंवा हेलिकॉप्टरने पंढरपूरात आणण्याचा पर्याय देण्यात …

Read More »

आशिष शेलार म्हणाले, ‘उपेक्षित’ सचिन सावंत हे तर खोटे बोलण्याची फँक्टरी स्थलांतरित मजुरांसाठीच्या रेल्वेचा ८५ टक्के खर्च हा केंद्राकडूनच भाजपाचा दावा

मुंबई: प्रतिनिधी मजुरांचे ८५ टक्के रेल्वेभाडे केंद्र सरकार भरते, हा भाजपाचा खोटारडेपणा उघडकीस आला, असा दावा करणारे एक प्रसिद्धीपत्रक काँग्रेसचे उपेक्षित प्रवक्ते सचिन सावंत यांनी काढले आहे. कुठल्याही अभ्यासाअभावी केवळ प्रेसनोटच्या भरोशावर जिवंत असलेल्या सचिन सावंत यांचे नाव सर्वाधिक खोटारडी प्रेसनोट काढणार्‍यांच्या यादीत आता अव्वल क्रमांकावर येत आहे. खोटे बोलण्याची …

Read More »

सॉलिसीटर जनरल म्हणाले, मजुरांच्या प्रवासाचा खर्च केंद्राने नव्हे तर राज्यांनी केला केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्यांचा खोटरडेपणा उघडकीस- चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी : काँग्रेसची मागणी

मुंबई: प्रतिनिधी स्थलांतरीत मजुरांना गृहराज्यात पाठवण्यासाठी चालवण्यात येत असलेल्या रेल्वेच्या प्रवाशी भाड्यात ८५ टक्के खर्च केंद्र सरकार करत असल्याच्या भाजपाच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे. या प्रवाशांच्या तिकीटाचा सर्व खर्च हा राज्य सरकारांनीच केल्याचे केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. यातून भाजपाचा खोटारडेपणा उघड …

Read More »

गुजरात सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीशांची योगायोगाने बदली न्यायाधीशांच्या बदलांतील तथाकथीत योगायोग चिंता वाढवणारा : सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी मागील सहा वर्षात अनेक न्यायाधीशांच्या तडकफडकी बदल्या झाल्या. यातील बहुतांश न्यायाधीश हे अत्यंत संवेदनशील प्रकरणे हाताळत होते किंवा त्यांनी दिलेले निवाडे आणि टिप्पण्या या भाजपशासित सरकारच्या विरोधात होत्या. मात्र या बदल्या रुटीन असल्याची सांगण्यात आले‌. परंतु हा तथाकथीत वाढलेला योगायोग चिंताजनक असून दोनच दिवसापूर्वी ज्या गुजरात उच्च न्यायालयाच्या …

Read More »

मंत्री राऊत अधिकाऱ्यांना म्हणाले, ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करा ; अन्यथा कारवाई विदर्भ- मराठवाड्याच्या आढावा बैठकीत दिला इशारा

नागपूर : प्रतिनिधी वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा  देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे करा. वीज जाण्याची पूर्वसूचना ग्राहकांना मिळालीच पाहिजे. यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवा. तसेच ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची अकार्यक्षमता दिसून येत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आढावा बैठकीत दिले. …

Read More »

‘स्पीक अप इंडिया’ मोहिमेला राज्यभरातून उदंड प्रतिसाद काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणुच्या संकटामुळे सर्वात जास्त अडचणीत सापडलेल्या गरीब, कामगार, स्थलांतरीत मजूर, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी काँग्रेस पक्षाने देशव्यापी चालवलेल्या ऑनलाईन मोहीम ‘स्पीक अप इंडिया’ला महाराष्ट्रातही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र सरकारपर्यंत या समाजघटकांचा आवाज नक्कीच पोहचला असून झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारने आतातरी जागे व्हावे आणि …

Read More »

“त्या” पुराला अलमट्टी नव्हे तर अतिवृष्टी आणि अतिक्रमण, बांधकामे जबाबदार वडनेरे समितीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सादर

मुंबई : प्रतिनिधी गेल्यावर्षी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील काही भाग आलेला पूर हा कर्नाटकातील अलमट्टी आणि हिपरग्गा जलाशयामुळे आलेला नसल्याचा अहवाल वडनेरे समितीने दिला असून या पुरास प्रामुख्याने नदीच्या परिसरातील पात्राचे संकुचिकरण, अतिवृष्टी याबरोबरच नागरीकरण, अतिक्रमण आणि बांधकामे जबाबदार असल्याचा ठपका या समितीने ठेवला. सदर अहवाल भविष्यकालीन उपायोजनासाठी नक्कीच उपयोगी …

Read More »

ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी खुषखबर शहरापासून १० किमी अंतरावरील विद्यार्थ्यांनाही मिळणार लाभ: सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही प्रवेश न मिळू शकलेल्या ११ वी व त्यापुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणारी स्वाधार योजना मोठी शहरे, महानगरपालिका, जिल्ह्याचे ठिकाण यापूरती मर्यादित न ठेवता आता तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक …

Read More »

विचार करावाच लागेल.. हिरे व्यवसायातलं कौशल्य एका दिवसात कसे मिळेल विरोधी पक्षनेते फडणवीसांचे जयंत पाटलांना उत्तर

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्राच्या भूमिपूत्रांना स्थलांतरितांच्या जागेवर रोजगार मिळणार असेल तर त्याचे आपण स्वागतच केले आहे. पण, हे स्वागत करीत असताना त्यांना कौशल्ययुक्त करावे लागेल, ही गरज मी मांडली. उदाहरणार्थ बंगालचा कामगार हा मोठ्या प्रमाणात हिर्‍यांच्या व्यवसायात काम करतो. ते कौशल्य एक दिवसांत दुसर्‍याला मिळणार नाही, ते त्यांना शिकवावे लागेल, असे …

Read More »