मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत. राज्यात टाळेबंदीचे काटेकोर पालन यापुढेही सुरु राहील, त्याचबरोबर नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरु व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना …
Read More »फक्त नोंदणीकृत १२ लाख बांधकाम कामगारांना २ हजाराची मदत राज्याच्या कामगार विभागाला आली उशीरा जाग
मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यातील भूमिपूत्र असलेला बांधकाम कामगारावर बेरोजगार होवून भीकेची आणि उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अखेर या बांधकाम कामगार मात्र नोंदणीकृत असलेल्यांना प्रत्येकी २ हजार रूपये देण्याचा निर्णय नुकताच कामगार विभागाने घेतल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री …
Read More »आरोग्य, पोलिस, होमगार्ड यांच्यासह अत्यावश्यक कर्मचाऱ्यांचे वेतन तात्काळ मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील निर्णयाची उपमुख्यमंत्री पवार यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी आरोग्यविषयक कामांची गरज लक्षात घेऊन चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन योजनेचा २५ टक्के निधी आरोग्यविषयक कामांकडे वळवण्यात येणार आहे. तर आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, पोलिस, होमगार्ड व इतर विभागातील अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन-मानधन तात्काळ अदा करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. कोरोनाच्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी स्थापन मंत्रिमंडळ …
Read More »वीजपुरवठा खंडित झाला? मिस कॉल द्या किंवा ‘एसएमएस’ पाठवा ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांचे महावितरण विभागाला आदेश
मुंबई: प्रतिनिधी वीजग्राहकांना जलद व विश्वासार्ह सेवा देण्यास कटिबध्द असलेल्या महावितरणने वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईलद्वारे मिस्ड कॉल व ‘एसएमएस’ अशी सहज सुविधा वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३ मे २०२० पर्यंत ‘लॉकडाऊन’ जाहीर झालेला आहे. त्यामुळे वीजग्राहकांना घरबसल्या वीजपुरवठा खंडित झाल्याची …
Read More »मंत्रालयाचे कामकाज अधिकाऱ्यांच्या तीन तुकड्यांमध्ये सुरू होणार रोटेशन पध्दतीने कर्मचाऱी-अधिकारी उपस्थित राहून काम करणार
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनचा दुसऱ्या टप्प्या ३ मे पर्यत वाढविण्यात आलेला असला तरी केंद्र सरकारने ३५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकिय कार्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याधर्ती राज्यातील शासकिय कामकाज आणि जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी मंत्रालयासह विभागीय मुख्यालये ३५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून २० …
Read More »रात्रो ८ वाजेपर्यत दुकाने चालू ठेवा मात्र तांदूळ वाटा आतापर्यत ४६०३८७ रेशनकार्डधारकांना मोफत तांदळाचे वाटप
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रति महिन्याचे धान्य वाटून प्रति माणसी ५ किलो तांदूळाचे मोफत वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी करण्यात आले आहे. तसेच हे मोफत धान्य वाटप करण्यासाठी सकाळी ८ ते रात्रो ८ वाजेपर्यत धान्य वाटण्याचे आदेश सर्व रेशनिंग अर्थात रास्तभाव …
Read More »शेलार म्हणाले ठाकरेंना कालचा उद्रेक हा प्रीपेड मोबाईलमुळे पत्र लिहून पालकमंत्री आदित्य ठाकरेंचे लक्ष वेधले
मुंबई: प्रतिनिधी काल वांद्रे स्टेशन परिसरात बांधकाम मजूर आणि कामगारांचा जो जमाव गोळा झाला त्यानंतर आज भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी या मजुरांच्या विविध संस्था-संघटना यांच्याशी संवाद साधला.. त्यातून विविध बाबी व त्यांच्या अडचणी समोर आल्या त्याबाबत आज पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून हे मुद्दे सरकारच्या लक्षात …
Read More »प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा …अन्यथा वांद्रे सारखा उद्रेक देशभर होईल
पुणे: प्रतिनिधी लॉक डाऊनला विरोध करण्यास आता सुरुवात झाली असून वांद्रे येथे जमलेली मजुरांची गर्दी हे त्याचे उदाहरण आहे. लॉक डाऊन वाढविल्याने हातावर पोट असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येईल असे त्यांना वाटू लागल्याने, त्यांनी आपला विरोध दर्शविला. शासनाकडे अन्नधान्याचा साठा असूनही त्याचे मोफत वाटप झाले नाही म्हणून त्याचा उद्रेक वांद्रे …
Read More »एनआयएने डॉ. तेलतुंबडे, नवलखा यांना घेतले ताब्यात कार्यालयात जावून स्वत: राहीले हजर
मुंबई: प्रतिनिधी पुणे येथील एल्गार परिषद आयोजित केल्याप्रकरणी विचारवंत तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नात जावई डॉ. आनंद तेलतुंबडे आणि नवलखा यांना एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले. या दोन्ही विचारवंताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत आज संपत आल्याने त्यांनी अखेर शरणागती पत्करली. या गुन्ह्यात डॉ.तुलतुंबडे यांच्यावर माओवादी नक्षलवाद्याशी संबध असल्याचा आरोप …
Read More »रानावनातच उपाशी राहायची वेळ आलीय, मुख्यमंत्री साहेब मदत करा यशवंत सेनेची उध्दव ठाकरेंना पत्राद्वारे साद
मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या विविध भागात शेळ्या-मेढ्यांना जगविण्यासाठी मेंढपाळ-धनगर एका भागातून दुसऱ्या भागात जात असतात. मात्र आता कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे आम्हा मेंढपाळ-धनगरांना गावात प्रवेश नाकारण्यात येत असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून याकालावधीत आपण आम्हाला मदतीचा हात द्यावा अशी मागणी यशवंत सेनेचे प्रमुख राजू झंजे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना …
Read More »
Marathi e-Batmya