राजकारण

विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षांसाठी कुलगुरूंची समिती स्थापन विद्यापीठात टेस्टिंग लॅब सुरू करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सूचना

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलले. मात्र राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ यासाठी कोरोना आजाराचा अंदाज घेणे आणि सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठित करण्यात आल्याची माहिती उच्च …

Read More »

पंतप्रधान मोदींनी मराठा महासंघाच्या या प्रश्नांची उत्तरे द्यावीत जनतेचा अपमान करत असल्याचा खेडेकर यांचा आरोप

मुंबई-चिखली: प्रतिनिधी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. तरीही राज्यघटनेने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील राज्य सरकारांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेवून जनतेचा अपमान करत असल्याचा आरोप मराठा महासंघाचे नेते पुरुषोत्तम खेडेकर यांनी करत त्यांना जाहीररित्या प्रश्न विचारून याची उत्तरे …

Read More »

दोनच आव्हानं, कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं सर्वांच्या सहकार्याने मात करणार असल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

मुंबई : प्रतिनिधी कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनच आजच्या घडीला राज्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नऊ वाजता दिवे …

Read More »

आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करत चाचणीचे दर निश्चित करा भाजप नेते आमदार अँड आशिष शेलार यांची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी खाजगी दवाखाने व रुग्णालयात साधा ताप, खोकला अशा रुग्णांना उपचार करण्यात येत नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून खाजगी रुग्णालयातील कोरोना चाचणीचे दर निश्चित करा, कोरोना चाचणी आरोग्य विम्यातून करण्याची परवानगी द्या, राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा (Disaster Management Act) लागू करा, अशी मागणी भाजपा नेते अँड.आशिष शेलार यांनी …

Read More »

‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबाला ५० लाखांचे अनुदान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पोलिस दल ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवानं मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला …

Read More »

अजित पवार म्हणाले, कोरोना पासूनच्या बचावासाठी फक्त दोनच उपाय स्वेच्छेनं क्वारंटाईन होवून स्वत:ला आणि कुटुंबाला वाचविण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी ‘कोरोना’पासून बचावासाठी ‘होम क्वारंटाईन्‌’ किंवा ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्‌’ हे दोनंच पर्याय आज उपलब्ध आहेत. ‘कोरोना’ संसर्गानं ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्‌’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनं ‘होम क्वारंटाईन्‌’ व्हावं, स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. ‘कोरोना’बाबत काहींच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढतेय, भाजी बाजारातल्या गर्दीमुळे ‘कोरोना’ तुमच्या घरात पोहचण्याचा …

Read More »

परिस्थिती पाहूनच १५ एप्रिलनंतर लॉकडाऊन टप्याटप्याने शिथिल करा मुख्यमंत्र्यांच्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत पंतप्रधानांची सूचना

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संर्व राज्यांनी लॉकडाऊन केले. तर केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केले. या लॉकडाऊनची मुदत १५ एप्रिल २०२० रोजी संपत असली तरी त्या त्या राज्यातील परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन एकदम न उठवता ती टप्याटप्याने शिथिल करावी अशी सूचना करत राज्यातीळ स्थितीनुसार टप्य्याटप्य्याने याचे नियोजन करावे …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंच्या सूचनेची पंतप्रधान मोदींकडून तात्काळ अंमलबजावणी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकी दरम्यान आवाहन

मुंबई: प्रतिनिधी सर्व धर्माच्या प्रमुख गुरू व धार्मिक नेत्यांना विनंती करून कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही तसेच सामाजिक अंतर पाळले जाणे गरजेचे असून तसे आवाहन सर्व धर्मगुरूंना करणे आवश्यक असल्याची सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली. या सूचनेची तात्काळ दखल घेत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी यानुसार सर्व …

Read More »

आमदारानेच बांधली मशीन पाठीवर, अन् केली निर्जंतुकीकरणाची फवारणी जनतेच्या सुरक्षेसाठी पारनेरचे आमदार निलेश लंके उतरले रस्त्यावर

अहमदनगर: प्रतिनिधी जनतेला निव्वळ सूचना न करता ज्या जनतेने आपल्या पाठीवर आशिर्वादाचा हात ठेवला त्या जनतेचं उत्तरदायित्व फेडण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आपल्या मतदारसंघात रस्त्यावर उतरले. जनतेच्या सुरक्षेसाठी स्वत: पाठीवर मशीन बांधून निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यास सुरुवात केली. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता आपली जनता सुरक्षित राहिली पाहिजे हीच भावना …

Read More »

ग्रामीण भागातील २ लाख ७३ हजार कर्मचाऱ्यांना २५ लाखाच्या विम्याचे संरक्षण अंगणवाडी, आशा वर्कर आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसाठी निर्णय: ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी सध्या करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतस्तरावर जोखीम पत्करून काम करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती यांना मिळणाऱ्या नियमित वेतन, मानधनाव्यतिरिक्त त्यांना १ हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम आणि २५ लाख रकमेच्या विमा संरक्षणाचे कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन …

Read More »