राजकारण

मंत्री उदय सामंत यांची माहिती, नियम व अटी पूर्ण केल्यासच गुंठेवारी प्रस्तावांना मंजुरी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

गुंठेवारी नियमितीकरणासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींची पूर्तता करणे आवश्यक असून संबंधित निकष पूर्ण करणाऱ्या प्रस्तावांनाच मंजुरी दिली जाते. आवश्यक कागदपत्रे व तांत्रिक अटी पूर्ण न झाल्यास संबंधित प्रस्ताव नाकारले जातात. त्यामुळे गुंठेवारी विकास नियमित करण्यासाठी सर्व निकषांची पूर्तता करणे गरजेचे असल्याचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत …

Read More »

प्रकाश आबिटकर यांचे आवाहन, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने विकास कामे करा हुडको अंतर्गत राज्यभर सुरु असलेली बांधकामे आणि सुविधांचा घेतला आढावा

सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत सुरु असलेली बांधकामे व इतर आरोग्य सुविधांची कामे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने करावीत असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज दिले. राज्याच्या विविध भागातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मंत्रालयातील समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हुडको अंतर्गत राज्यभर सुरु असलेली बांधकामे व इतर आरोग्य सुविधांचा आढावा …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, ई-रिक्षा व ई-बाईकसाठीही परवाना (परमिट) बंधनकारक करण्याचा निर्णय ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठीही परवाना बंधनकारक करणार असल्याची माहिती दिली

राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व ई-बाईकना यापुढे मोटार वाहन विभागाकडे रितसर नोंदणी करुन परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, आतापर्यंत …

Read More »

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्यभर नियंत्रण कक्ष- जिल्हास्तरीय समित्या स्थापन अन्न व नागरी पुरवठा विभआगाकडून गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध

इराण – इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर सुरळीत पुरवठयाबाबत राज्य शासन  विविध उपाययोजना राबवत आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यामध्ये एलपीजी …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात आधुनिक ‘बसपोर्ट’ एसटी डेपोच्या विकासाला गती मिळणार असल्याचा केला दावा

गुजरातच्या धर्तीवर राज्यात आधुनिक ‘बसपोर्ट’ उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून  एसटी महामंडळाच्या डेपो आणि बसस्थानकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नवीन धोरण आखण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली. नियम ९२ अन्वये विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी  याविषयी विधान परिषदेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली. परिवहन मंत्री …

Read More »

गणेश नाईक यांची स्पष्टोक्ती, कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांवर कारवाई होणार मुंबई परिसरात समुद्रकिनाऱ्यावरी कांदळवन हे पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे

मुंबईच्या किनारपट्टीवरील कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांबाबत गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य संजय उपाध्याय यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य मनिषा चौधरी यांनी सहभाग घेतला. लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक …

Read More »

आकाश फुंडकर यांचे निर्देश, संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर घ्या टेक्नो क्राफ्ट इंडस्ट्रीजच्या गारमेंट विभागातील संपाबाबत सूचना

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि. ठाणे) या कंपनीच्या  गारमेंट विभागातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कंपनी व्यवस्थापनाने संपावर तोडगा काढून निलंबित कामगारांना कामावर घ्यावे. तसेच या परिसरात औद्योगिक शांतता कायम  ठेवावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, विधानभवनात बॉम्बची अफवा ही ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा परिणाम विधानभवनही सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय

इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला भाजपा सरकारचे चुकीचे धोरण व नाकर्तेपणामुळे झाला आहे. आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्याचे भाजपा सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला भासत आहे. इंग्रजांनी मीठावर कर आकारला त्यावेळी महात्मा गांधी यांनी आजच्याच दिवशी १९३० …

Read More »

मुंबईतील विधानभवनासह महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी विधानभवन केले रिकामे, प्रशासनात खळबळ

आंतरराष्ट्रीयस्तरावर अमेरिका आणि इस्रायलने इराण देशाच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर होत आहे. त्या परिणामातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच संसदेचे आणि महाराष्ट्रात विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु आहे. मात्र या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ अधिवेशऩाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सगळी कडेकोट सुरक्षा असताना मुंबईतील विधानभवनासाह सार्वजनिक …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२९ पर्यंत ‘ट्रिलियन डॉलर’ची महाराष्ट्र हे देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले राज्य होणार

राज्याच्या विकासासाठी आर्थिक शिस्त राखणे गरजेचे आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक वाठविण्यात आली आहे. महाराष्ट्र देशात आर्थिकदृष्ट्या मजबूत राज्य म्हणून उभे राहत असल्याचे सांगून पुढील काही वर्षांत महाराष्ट्र हे देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले राज्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र जगभरात एक नव्हे तर …

Read More »