सत्तेचा मलिदा चाखण्यासाठी भाजपाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडून महायुतीचे सरकार स्थापन केले असा थेट घणाघाती हल्ला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपावर करत काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने काढलेल्या जनसन्मान यात्रेत भाजपाने काळे झेंडे दाखविले. तर भाजपाचे …
Read More »रामदास कदम म्हणाले, भाजपाचे मंत्री ‘निरुपयोगी’, भाजपाचा पलटवार उपमुख्यमंत्री फडणवीस, रविंद्र चव्हाण यांचा पलटवार
शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी मुंबई-गोवा महामार्गावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांना निरुपयोगी मंत्री असल्याची टीका केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांच्या टीकेला प्रत्तुत्तर देताना म्हणाले की, महायुतीच्या तत्त्वांशी सुसंगत आहे का, असा सवाल करत गेली ४० वर्षे मंत्री …
Read More »नाना पटोले यांची टीका, जरांगे पाटलांचे… आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांचाच अडथळा भाजपाला इक्बाल मिर्चीशी संबंध असलेला व्यक्ती चालतो मग नवाब मलिक का चालत नाही?
“मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांचा अडथळा आहे.” या मनोज जरांगे पाटील यांच्या विधानात तथ्य आहे. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राणे आयोग नियुक्त करुन मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण त्या आरक्षणाविरोधात फडणवीसांच्या जवळचे लोकच कोर्टात गेले होते. मराठा आरक्षणप्रश्नी कोर्टात बाजू मांडू नका, असे फडणवीस …
Read More »उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता
“माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठे योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे-जे करता येईल ते करेन. आमची ताकद जस-जशी वाढत जाईल, तशी आर्थिक मदतही वाढवली जाईल,”असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच रक्षाबंधनापूर्वी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतील दोन हप्ते जमा करण्याचा निर्धारही पूर्ण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. …
Read More »राज्यपालांच्या निर्णयाविरोधात मुख्यमंत्री सिद्धरामय्या अखेर न्यायालयात चौकशीच्या प्रस्तावास मान्यता दिल्याच्या विरोधात न्यायालयाचा दिलासा
म्हैसुरू स्थित मुडा MUDA जमिन वाटप प्रकरणात घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांने केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधातील चौकशीला परवानगी दिली. याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने सिद्धरामय्या यांना दिलासा देत, मुडा MUDA घोटाळ्याप्रकरणी सुनावणीची कार्यवाही पुढे ढकलली. सामाजिक कार्यकर्त्या …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर, मुख्यमंत्री शिंदे खरं आहे म्हणाले तर मी राजकीय संन्याय घेईन मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपावर उपमुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणूकीची तारीख अद्याप जाहिर केलेली नसली तरी निवडणूकांचा कालावधी जसजसा जवळ येत चालला आहे, तसतसा राज्यातील राजकिय वातावरण तापू लागले आहे. त्यातच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दररोज आरक्षणाचे आंदोलनकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांच्याकडूनही दररोज मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दररोज आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी, ३५ हजार कोटीची तरतूद पन्नास हजार महिलांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वकांक्षी व क्रांतिकारी योजना असून ही लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा १ हजार ५०० रुपयांची रक्कम वाढवत जावून टप्या-टप्याने …
Read More »राज्यातील पहिल्या सौरग्रामाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण साताऱ्यातील मान्याची वाडी ठरले पहिले सौर ग्राम
राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीजक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना व मागेल त्यांना सौर कृषिपंप योजनेतून दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, … आरक्षण संपवणे हीच मोदींची गॅरंटी आयएएसच्या खाजगी करणाचा प्रयत्न
केंद्रीय गृहमंत्रालयाने काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या प्रशासनातील काही महत्वाच्या पदांवर आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता होती. मात्र या रिक्त आयएएसच्या जागांवर मर्जीतील व्यक्तींची नियुक्ती करण्याच्या अनुषाने एक अध्यादेश काढत, अशा रिक्त पदांवरील व्यक्तींची नियुक्ती मागील दाराने करण्याचा मार्ग मोकळा केला. यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक …
Read More »छगन भुजबळांचे आवाहन, नाशिकचे नाव बदनाम करू नका तणावपूर्व परिस्थिती नियंत्रणात आणली त्याबद्दल पोलिसांचे आभार
मागील काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराज यांच्या द्वेषमुलक वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे नाशिकसह छत्रपती संभाजी नगरात सामाजिक तणाव निर्माण झालेला आहे. त्यातच भाजपाच्या नेत्यांकडून रामगिरी महाराजाची पाठराखण केली आहे. त्यामुळे तणावात आणखीनच भर पडत आहे. यापार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे नाव बदनाम करू नका असे आवाहन नाशिककरांना …
Read More »
Marathi e-Batmya