महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाची अंमलबाजवणी, प्रचंड वाढलेली महागाई व महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. महिलांचे हे तीन ज्वलंत प्रश्न घेऊन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत २९ जुलै रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात देशभरातील महिला काँग्रेस कार्यकर्त्या मोठ्या संख्येने भाग घेणार …
Read More »पंतप्रधान मोदी यांची ग्वाही, राज्यांच्या एकत्रित प्रयत्नातून विकसित भारत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची पंतप्रधानासोबतच्या बैठकीला मात्र दांडी
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर देशाची पुढील आर्थिक दिशा ठरविण्यासाठी निती आयोगाची बैठक आज बोलविण्यात आली होती. या बैठकीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला बहुतांश भाजपा शासित राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक उपस्थित होते. मात्र बिहारसाठी १५ हजार कोटी रूपयांचे विशेष …
Read More »प्रकाश आंबेडकर म्हणाले, वंचित शिवाय कुणीही आरक्षणावर भूमिका घ्यायला तयार नाही राजकीय पक्षांनी भूमिका घ्यायला पाहिजेत
वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा कोणताही पक्ष आरक्षणाच्या प्रश्नावर राजकीय भूमिका घ्यायला तयार नसल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगली जिल्ह्यातील रांजणी येथील सभेला संबोधित करताना व्यक्त केले. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, आरक्षणाच्या प्रश्नावरून लोकांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत. यावर एकच उपाय आहे तो …
Read More »शरद पवार यांचा पलटवार, तो दिवा महाराष्ट्राच्या तुरुंगात… आरक्षणावर तात्काळ तोडगा निघावा ही आमच्या पक्षाची भूमिका
पुणे येथे काही दिवसांपूर्वी भाजपाच्या राज्य कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीच्या समारोपाच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर देशातील भ्रष्टाचाराचे सरदार असल्याची टीका केली होती. अमित शाह यांच्या या टीकेला शरद पवार यांनी आज या टीकेची परतफेड करत तो दिवा …
Read More »मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निती आयोगाच्या बैठकीत, मात्र बहिष्कार टाकत बाहेर पडल्या बोलण्याची संधी नाकारली, पक्षपाती धोरण असल्याचा आरोप
नवी दिल्ली येथे आज झालेल्या NITI आयोगाच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या अर्थात इंडिया आघाडीच्या घटक पक्ष असतानाही या बैठकीला उपस्थित राहिलेल्या एकमेव विरोधी नेत्या. मात्र निती आयोगाच्या बैठकीतून त्या मध्येच बाहेर पडल्या. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेला वित्तविभागाचा विरोध… वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित;प्रसारमाध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे
काही प्रसारमाध्यमांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेला वित्तविभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसारमाध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ‘एक्स’ वर ट्वीट करत केले. दरम्यान राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण, निवारा केंद्रांमध्ये सुविधा द्या 'अलमट्टी'तील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करा
कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बचाव कार्याची आवश्यकता वाटल्यास तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास सेनादलाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी …
Read More »सुप्रिया सुळे यांचा आरोप, पुण्यातील पूर परिस्थितीला प्रशासनच जबाबदार पुणेकरांवर भयानक संकट, कपडे आणि ब्लँकेटची मदत करा
पुण्यातील सिंहगड परिसरातील एकतानगर आणि निंबजनगरला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. अतिवृष्टी आणि पूरामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. लोकांचे संसार उघड्यावर आले आहे. नागिरकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिसरात अजूनही वीज पूरवठा पूर्ववत झालेला नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. येथील नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. ते …
Read More »नारायण राणे यांचा टोला… विरोधकांची टीका अज्ञानातून अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतूद
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अर्थसंकल्पाबाबत महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेल्या भरघोस निधीचा थांगपत्ताच त्यांना नसल्याने राजकीय स्वार्थासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून होत आहे. त्यांनी अर्थसंकल्पाबाबतचे तुटपुंजे ज्ञान पाजळू …
Read More »देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शरदचंद्र पवार गटाकडून ओबीसी महिला कार्ड काँग्रेससोबत विधानसभा मतदारसंघ अदलाबदली करणार
लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या समाधानकारक यशानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभेसाठी आपला टक्का वाढविण्यासाठी व्यूहरचना केलेली आहे यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नागपुरातून ओबीसी आणि महिला कार्ड त्यांच्याकडून वापरले जाण्याची शक्यता आहे . लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने १० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते त्यापैकी …
Read More »
Marathi e-Batmya