हिंजवडीमधील ३७ आयटी कंपन्याच्या स्थलांतराला राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे. हे सरकार केवळ घरं फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात व्यस्त आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केला. पुण्यातील सारसबागे समोरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला सुप्रियाताई सुळे यांनी …
Read More »पाण्यासाठी दिल्ली सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव, हरियाणा, उत्तर प्रदेशला आदेश द्या सध्या दिल्लीतील अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा
मागील काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरणात उष्म्यात चांगलीच वाढ होत आहे. त्यातच दिल्लीला पाण्याचा भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच दिल्लीला पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. यापार्श्वभूमीवर शेजारील राज्य असलेल्या हरियाणाने दिल्लीला महिनाभरासाठी पाणी सोडावे या मागणीसाठी दिल्लीतील आप सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली …
Read More »केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती, राज्यातील आचारसंहिता सध्या शिथिल नाहीच नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम
सद्यःस्थिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता अद्यापपर्यंत सुरु असून त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. आचार …
Read More »महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिर केले सुधारीत परिक्षेचे वेळापत्रक राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर
राज्य सरकारच्या विविध विभागातील ५२४ रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ रविवार, २१ जुलै, २०२४ रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाकडून ३० मे, २०२४ रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक …
Read More »सहाव्या टप्प्यातील प्रचार थंडावला, पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला रवाना पोहोचताच विवेकानंद मेमोरियल मध्ये पूजा अर्चेला सुरुवात
लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्याचा प्रचार आज थंडावला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथील प्रसिद्ध विवेकानंद रॉक मेमोरियल येथे आपल्या नियोजित अध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रवाना झाले. विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेमोरियल मधील देवतांचे पूजन केले. त्यानंतर आता ४५ तासांचे ध्यान सत्र सुरू करतील, असे …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, दाभाडे यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा दाभाडे कुटुंबियांची विजय वडेट्टीवार यांनी घेतली भेट
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. पिंपळखुंटा या गावातील विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेती गहाण ठेऊन काढलेल्या कर्जाचे बँक पैसे देत नाही. बँक मॅनेजरने कर्जाचे पैसे खात्यात जमा करायला टाळाटाळ केल्यामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा हा गंभीर आरोप आहे. या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली …
Read More »डॉ मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदींना फटकारले, पंतप्रधान कार्यालयाची प्रतिष्ठा कमी केली हेट स्पीच वापरून कार्यालयाची प्रतिष्ठा कमी केली
लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडत आली आहे. आतापर्यंत लोकसभा निवडणूकीचे ६ टप्पे पार पडले असून ७ वा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. मात्र भाजपाच्या आणि स्वतःच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशभरात प्रचार सभा घेतल्या. यातील अनेक सभा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, जनता दुष्काळाने होरपळत असताना मुख्यमंत्री मात्र सुट्टीवर पुणे अपघातप्रकरणी एसआयटी चौकशी दिशाभूल करणारी; बगलबच्च्यांना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न
राज्यात दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे, अनेक भागात १५ ते २० दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. राज्यातील ७५ टक्के भागात कोरडा दुष्काळ असून परिस्थिती अत्यंत भयावह आहे. राज्यातील जनता दुष्काळाने होरळपत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र सुट्टीवर गेले आहेत पण काँग्रेस पक्ष जनतेला न्याय देण्यासाठी दुष्काळ पाहणी दौऱ्यावर जात असून प्रत्येक …
Read More »डॉ आंबेडकर यांची प्रतिमा फाडून अपमान करणार्या भगेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते उमेश पाटील यांची मागणी
मनुस्मृती जाळण्याच्या नावाखाली भगेंद्र (जितेंद्र) आव्हाड यांनी डॉ आंबेडकर यांची प्रतिमा फाडली आणि ती पायदळी तुडवली त्यामुळे भगेंद्र आव्हाडांवर राज्यसरकारने तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली. महाड येथे मनुस्मृती जाळण्याचा स्टंट करून देशातील आणि राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याला जितेंद्र आव्हाड …
Read More »विधान परिषद शिक्षक, पदवीधर आणि राज्यसभेसाठी २५ आणि २६ जूनला मतदान विधान परिषदेच्या चार जागांसाठी तर राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून सोमवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेबाबत काही सूचना असल्यास राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी दि.३० मे …
Read More »
Marathi e-Batmya