राष्ट्रवादीचे( शरद पवार ) नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्याचा जागी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या कार्यक्रमामध्ये त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले पोस्टर फाडले. त्यांच्या या कृतीचा वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून जाहीर निषेध केला. वंचित बहुजन आघाडीने आपल्या एक्सवर पुढे म्हणाले की, …
Read More »राहुल गांधी यांनी उडविली पंतप्रधान मोदी यांच्या महात्मा गांधी यांच्यावरील त्या वक्तव्याची टिंगल महात्मा गांधी यांना जाणून घेण्यासाठी एन्टायर पॉलिटीकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना पिक्चर बघण्याची गरज
लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अचाट वक्तव्यावरून सातत्याने कोणता ना कोणता तरी वाद निर्माण होत आहे. त्यातच नुकत्याच एका खाजगी वृत्त वाहिनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधी यांना कोणी ओळखत नव्हते असे धांदात बुध्दीची किव करणारे वक्तव्य …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पैसे वाटल्याच्या लेखातून आरोपावरून नोटीस बजावली
काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारच्या सामना या दैनिकात लेख लिहून लोकसभा निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगणित पैसा खर्च केल्याचा आरोप त्या लेखातून केला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेत चुकीची प्रतिमा निर्माण झाल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नोटीस पाठवित एकतर …
Read More »लोकसभा निवडणूकीचा प्रचार संपल्यानंतर नरेंद्र मोदी चिंतनासाठी कन्याकुमारीत ३० तारखेपासून ४ जूनच्या संध्याकाळ पर्यंत करणार चिंतन
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवस आध्यात्मिक आराम घेणार आहेत. ४ जून रोजी मतदानाच्या निकालापूर्वी चिंतन करण्यासाठी ते तामिळनाडूमधील कन्याकुमारीला भेट देणार असून तेथील विवेकानंद मेमोरियल मध्ये ध्यान साधना करणार असल्याची माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. ३० मे रोजी सायंकाळपासून ते १ जूनच्या संध्याकाळपर्यंत ते ध्यान मंडपममध्ये ध्यान …
Read More »पंतप्रधान मोदी उतरलेल्या हॉटेलचे थकीत बीलः वसुलीसाठी कायदेशीर मार्ग वापरणार कर्नाटक सरकारने अखेर दाखविली बिल भरण्याची तयारी
५० वर्षाच्या टायगर प्रोजेक्टच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हैसुर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरले होते. मात्र एक वर्ष झाला तरी पंतप्रधान मोदी हे उतरलेल्या हॉटेलचे बिल सरकारकडून दिले गेले नाही. त्यामुळे या हॉटेलच्या प्रशासनाने यासंदर्भात कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा देताच पंतप्रधान मोदी यांचे बिल कर्नाटक सरकारने भरण्याची …
Read More »राज्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीसाठी प्रदेश काँग्रेसच्या विभागनिहाय समित्या काँग्रेसच्या समित्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून विभागीय आयुक्तांना निवदेन देणार
राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्यांची मोठी समस्या असून रोजगारही मिळत नाहीत. राज्यातील महाभ्रष्टयुती सरकारला दुष्काळाची चिंता नाही. जनता दुष्काळाने होरपळ असताना महायुती राजकीय साठमारीत व्यस्त आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागनिहाय दुष्काळ पाहणी समित्यांची स्थापन केली …
Read More »अरविंद केजरीवाल यांच्या जामिन मुदतवाढ प्रकरणी याचिका लिंस्टींग करण्यास न्यायालयाचा नकार सुट्टीकालीन द्विसदस्यीय खंडपीठाचा निर्णय, सरन्यायाधीशांच्या बेंचकडे करा
मद्य धोरण ‘घोटाळा’शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनासाठी सात दिवसांची मुदतवाढ मिळावी यासाठी दाखल केलेल्या अर्जाचा समावेश लिस्टींग मध्ये करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने नकार दिला. न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि के.व्ही. विश्वनाथन यांनी २८ मे रोजी सांगितले की, ते न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठाने आधीच निकालासाठी राखून ठेवलेल्या …
Read More »नाना पटोले यांची मागणी, पुणे अपघात प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करा गुन्हेगारांना वाचवण्याचा फडणविसांचा प्रयत्न
राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करुन सर्वसामान्य लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत. नागपूर, जळगाव व पुण्यात अशा घटना घडल्या पण अत्यंत संताप आणण्याचा प्रकार म्हणजे यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले. पुण्याच्या प्रकरणात गर्भश्रीमंत व्यक्तींना …
Read More »१ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जी गैरहजर जाहिर सभेत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची माहिती
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सांगितले की त्या १ जून रोजी दिल्लीत होणाऱ्या इंडिया ब्लॉकच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत. कारण त्या राज्यातील निवडणुकांमध्ये आणि चक्रीवादळ रेमालमुळे व्यस्त असतील. कोलकाता येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बँनर्जी म्हणाल्य़ा की, “इंडिया गटाने आधी सांगितले होते की …
Read More »प्रचारासाठी गेलेल्या राहुल गांधी यांचा सभे दरम्यानच दोन वेळा स्टेज खचला बिहारच्या पाटलीपुत्र येथील घटना
लोकसभा निवडणूकीच्या ७ व्या अर्थात अखेरच्या टप्प्यातील प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे बिहार येथील प्रचार सभेसाठी गेले होते. मात्र स्टेज प्रचारासाठी उभारण्यात आलेला स्टेज दोन वेळा खचल्याची घटना घडली. या घटनेत कोणाला ईजा झाली नाही. मात्र प्रचारसभा तशीच पुढे सुरु ठेवण्यात आली आणि राहुल गांधी यांनी सभेत सभाही घेतली. …
Read More »
Marathi e-Batmya