भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी भवन प्रदेश कार्यालय, मुंबई येथे ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या सर्व महापुरुषांना वंदन करुन राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रध्वज फडकवला. आजचा दिवस साजरा करताना जो न्याय दुसऱ्या राज्याला तोच न्याय महाराष्ट्राला मिळावा …
Read More »नाना पटोले यांची सत्ताधाऱ्यांवर टीका, दुरंग्यापासून तिरंगा वाचवण्याचा… लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचा शेतकरी, जवानांबद्दल एक शब्दही नाही केवळ राजकीय भाषण
हजारो शूरविरांच्या बलिदान, त्याग व संघर्षाने देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून तिरंगा डौलाने फडकत आहे. तिरंग्याची शान कायम ठेवत शेतकरी, कामगार, कष्टकरी, देशाच्या सीमांचे रक्षण करणारा जवान यांनी देश उभा केला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात सुईचे उत्पादनही होत नव्हते पण पंडित नेहरुंच्या कणखर व दूरदृष्टी नेतृत्वाने देशात प्रगतीचा पाया रचला …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध विकसित महाराष्ट्रासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी या सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचे काम होत आहे. विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासनाने राबविलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त …
Read More »स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते राहुल गांधी शेवटून दुसऱ्या रांगेत मुख्य पहिल्या रांगेत मात्र सत्ताधारी मंत्री आणि ऑलिंम्पिक विजेते खेळाडू
भारतीय स्वांतत्र्याला आज ७८ वर्षे पूर्ण होत असून या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आतापर्यंत देशाच्या स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजीच्या कार्यक्रमाला आणि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाला सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि विरोधी पक्षातील सन्मानिय सदस्यांची नेहमीच पुढच्या रांगेत आसन …
Read More »पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, देशाला नव्या धर्मनिरपेक्ष नागरीसंहितेची गरज… महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करा
देशात आतापर्यंत नागरीसंहिता अस्तिवात आहे ती धार्मिक स्वरूपातील आहे. मागील ७५ वर्षापासून या धार्मिक नागरी संहितेचे ओझे आपण वहात आलो आहोत. आता देशाला नव्या धर्मनिरपेक्ष नागरी संहितेची (सेक्युलर सिव्हील कोड) गरज आहे. त्यादृष्टीनेच देशात सीसीए कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता देशात नव्या धर्मनिरपेक्ष नागरी संहिता लागू करण्याची गरज …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, गणपती आगमन-विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवा गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही टोलमाफी
राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवापूर्वी राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत त्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा. झाडांच्या फांद्याची छाटणी करावी. कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत असे निर्देश देऊन …
Read More »नाना पटोले यांचा आरोप,…शेतकऱ्यांच्या नावानेही पैसा खाल्ला न्यायालयाने वेळेत निकाल दिला असता तर राज्य सरकारचा निकाल लागला असता: बाळासाहेब थोरात
राहुल गांधी यांच्या भारत जोडो व भारत जोडो न्याय यात्रेमुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले. पण विधानसभेची लढाई सोपी नाही. केंद्रात व राज्यात विरोधकांची सत्ता आहे. धनशक्ती व सत्तेचा गैरवापर करण्यात महायुती कुप्रसिद्ध आहे. त्यामुळे गाफील राहू नका. महाराष्ट्राची निवडणूक देशासाठी महत्वाची असून, राज्यातील सत्ताबदलाचे हादरे दिल्लीलाही …
Read More »महेश तपासे यांची मागणी, सुप्रिया सुळे फोन हॅकप्रकरणी गृहविभागाने खुलासा द्यावा गृहविभागानेच पाळत ठेवल्याचा आरोप
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल व व्हाट्सअप अकाउंट हॅक केल्यावरून चर्चांना उधाण आले, या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर यंत्रणेच्या माध्यमातून पाळत ठेवल्याचा आरोप आरोप भारतीय जनता पार्टी व शिंदे सरकारवर केला. तसेच या पाळत प्रकरणी राज्याच्या गृहविभागाने खुलासा द्यावा अशी मागणी केली. …
Read More »नाना पटोले यांची टीका, भ्रष्ट युती सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा लिलाव काढला विधानसभा निवडणूकीनंतर सर्वसहमतीने मुख्यमंत्री ठरवू
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व त्यांच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र घडला व समृद्ध झाला. परंतु भाजपप्रणित महायुती सरकारने हा समृद्ध महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण, गरीब व सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणे ही काँग्रेसची भूमिका आहे. महाविकास आघाडी म्हणून विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वातंत्र्यदिनी ‘संविधान वाचन’ उपक्रम राबवणार जनसन्मान यात्रेला पाच दिवसात अभूतपूर्व प्रतिसाद ;महिलांची उपस्थिती लक्षणीय...
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वातंत्र्य दिनी ‘संविधान वाचन’ असा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या मुख्य कार्यालयात व प्रत्येक जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणानंतर साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत संविधानाबाबत प्रश्न निर्माण करण्यात आला होता. देशाचे संविधान हा …
Read More »
Marathi e-Batmya