राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्णपणे भारताला धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून स्वीकारतो का आणि त्यांना भारताचा राष्ट्रध्वज मान्य आहे का, ते भारतीय संविधानाशी एकनिष्ठ आहेत का? असे सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि आरएसएस RSS यांच्यावर निशाणा साधत विचारला. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर …
Read More »आरएसएसवरील बंदी केंद्राने हटविलीः जयराम रमेश म्हणाले, अर्ध्या चड्डीत येऊ शकतात १९६६ साली आरएसएसवर घातलेली बंदी ९ जुलै २०२४ रोजी हटविली
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि त्यांच्या कृत्य-कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यास बंदी घालणारा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने नुकताच उठविला. मात्र केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी खोचक शब्दात टीका करत सरकारच्या निर्णयाची खिल्ली …
Read More »जरांगेंनी मराठा समाजाच्या भावनांचा राजकारणासाठी वापर करून घेऊ नये भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे आवाहन
मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आता राजकीय वास यायला लागला आहे. तसे असेल तर त्यांनी खुली राजकीय भुमिका घ्यावी, असे प्रत्युत्तर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिले आहे. तसेच मराठा समाजाच्या भावनांचा राजकारणासाठी वापर करून घेऊ नका, असे आवाहनही दरेकर यांनी जरांगेंना केले आहे. माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, शिंदे-भाजपा सरकारने एससी-एसटीचा निधी इतरत्र वळवला भाजपा - काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू
एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती आणि जमातींच्या कल्याणासाठी असलेला निधी इतरत्र वळवला आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, ते दलित आणि आदिवासी बांधवांच्या विरोधी असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ॲड. प्रकाश आंबेडकर …
Read More »हरियाणात इंटरनेट आणि एसएमएस सेवा २४ तासासाठी निलंबित कावड यात्रा आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारचा निर्णय
हरियाणा सरकारने २१ जुलै रोजी सुरक्षा वाढवली आणि मागील वर्षी हिंसाचार झालेल्या ब्रज मंडळ जलाभिषेक यात्रेपूर्वी २४ तासांसाठी नूह जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट आणि मोठ्या प्रमाणात एसएमएस सेवा निलंबित करण्याचे आदेश दिले. गेल्या वर्षी ३१ जुलै रोजी नुह येथे जमावाने विश्व हिंदू परिषदेची मिरवणूक रोखण्याचा, दगडफेक आणि गाड्या पेटवण्याचा प्रयत्न केल्याने …
Read More »अजित पवार यांची घोषणा, आगामी निवडणूक स्वबळावर पुण्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केली भूमिका स्पष्ट
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कशीबशी रायगडची जागा जिंकता आली. आता विधानसभा निवडणूकीला दोन-अडीच महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलेला असतानाच राज्यातील सर्वच राजकिय पक्षाकडून निवडणूकीची तयारी सुरु केली. त्यातच भाजपाने आज राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यात घेत एकप्रकारे विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजवीत प्रचाराचा शुमारंभही केला. इकडे भाजपाचे अधिवेशन पार …
Read More »अजित पवार यांचा वाढदिवस जनविश्वास सप्ताह म्हणून साजरा करणार मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांची घोषणा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढवसानिमित्त आयोजित ‘जनविश्वास सप्ताहा’च्या माध्यमातून महायुती शासनाच्या लोकप्रिय योजना जनतेपर्यंत पोहचवून “जनविश्वास सप्ताह” जोमाने व उत्साहाने साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, … नेत्यांचा विकास, पण कोकणी माणसाकडे दुर्लक्ष कोकणात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग, जनतेत जा, संघटनेचे काम करा
कोकण हा काँग्रेस विचाराचा आहे, आजही कोकणात अनेक ग्रामपंचायती काँग्रेसच्या आहेत. जनतेच्या मनात काँग्रेस आहे पण त्यांच्यापर्यंत नेत्यांनी गेले पाहिजे. गुंडगिरी किंवा धनशक्तीला जनता भीक घालत नाही व काँग्रेसला त्याचा फरक पडत नाही, आत्मविश्वासाने काम करा. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला जनतेने भरघोस विजय मिळवून दिला आहे. आता विधानसभा निवणुकीसाठी …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान, मराठा आरक्षणप्रश्नी तुमचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आरक्षणप्रश्नी भूमिका स्पष्ट करावी
मागील अनेक वर्षे राज्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार राज्यात होते. तसेच त्यांनी सत्तेत असताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविला नाही. मात्र आपले सरकार २०१४ साली सत्तेत आले आणि मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र पुन्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार राज्यात आले आणि मराठा समाजाचे आऱक्षण …
Read More »अमित शाह यांचा आरोप, शरद पवार भ्रष्टाचाराचे महामेरू, तर उद्धव ठाकरे औरंगजेबचे … भाजपाच्या पुणे अधिवेशनात अमित शाह यांचा आरोप
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अधिवेशन पुण्यात पार पडले. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना अमित शाह यांनी महाविकास आघाडी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, संपूर्ण देशात भ्रष्टाचाराचा मेहामेरू कोणी असेल तर ते म्हणजे …
Read More »
Marathi e-Batmya