भारतीय हवामान खात्याने मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. सर्व प्रशासनाने सतर्क राहावे, हवामान खात्याकडून तसेच …
Read More »पुण्याच्या बैठकीला अजित पवार, शरद पवार हजर, सुप्रिया सुळे-शेळके वाद, कौतुक सुळेंच्या सूचनेचे पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार एकत्रित हजर
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजनची आज बैठक पार पडली. या बैठकीला खासदार शरद पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली. पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे एकत्रित हजर राहणार असल्याने या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु या …
Read More »बाळासाहेब थोरात यांचा आरोप, भ्रष्ट मार्गाने बनलेल्या सरकारचा कारभारही भ्रष्टच शिंदे सरकारने ‘लाडका मित्र’ योजनेतून अदानीला मुंबईतील किती कंत्राटे दिली – खासदार वर्षा गायकवाड
मुंबईसह राज्यातील गुन्हेगारीमध्ये मागील दोन वर्षात प्रचंड वाढली असून अमली पदार्थांचा काळाधंदाही फोफावला आहे. ड्रग्जच्या धंद्यामागे कोण आहेत त्याच्या मुळाशी जाऊन रॅकेट उद्ध्वस्थ केले पाहिजे. महायुती सरकारच्या काळात सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. पहिल्यात पावसात मुंबईतील रस्त्यांची अवस्था वाईट झाली, नालेसफाईच्या कामातही प्रचंड भ्रष्टाचार झाला. आमदारांच्या किमती ठरवून घोडेबाजार बनवला …
Read More »माकपचा सवाल, तिसऱ्या आघाडीचे गाजर कशाला दाखवता? राजू शेट्टी यांचा विधानसभेसाठी तिसरी आघाडी करण्याचा मनोदय
देशाच्या आणि राज्याच्या आजच्या परिस्थितीत तिसरी आघाडी ही धूर्त आणि मतलबी खेळी आहे. राज्यातील जनतेला महायुतीच्या भ्रष्ट आणि अनैतिक राजवटीच्या कचाट्यातून सोडवणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजपा-प्रणित महायुतीस भक्कम पर्याय ही आणि हीच मराठी जनतेची मागणी आहे, आणि तिने तसा स्पष्ट कौल लोकसभा निवडणुकीत दिला असल्याचे माकप राज्य सचिव डॉ उदय …
Read More »शरद पवार यांचा खोचक टोला,… शहाण्यांनी आता याची नोंद घ्यावी ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून जनतेचे प्रश्न सुटले नाहीत स्पष्ट दिसतंय
अनेकांना अनेक वर्ष संधी देऊनसुद्धा काही ठिकाणचे प्रश्न शिल्लक आहेत, त्याची पूर्तता करण्यासाठी सत्ता पाहिजे. ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत हे स्वच्छ दिसतंय. त्यावर उत्तर शोधावं लागेल. ते उत्तर म्हणजे महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांचे प्रश्न सोडवणं हा एक कलमी कार्यक्रम असल्याची भूमिका असे राष्ट्रवादी …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, मुंबईतील सर्व जमिनींचे अधिकार अदानीला देण्याचा प्रयत्न मुंबईसह महाराष्ट्र गुजरातला विकण्याचा प्रयत्न काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही
धारावीची सर्व जमीन अदानीला देण्याचा सरकारचा निर्णय आहेच पण वरळीतील दुध डेअरीची कोट्यवधी रुपयांची जमीनही स्वस्तात देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईतील सर्व जमिनीचे अधिकारच अदानीला देण्याचे निर्देश नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला येतात व महाभ्रष्ट युती सरकार त्याचे पालन करत आहे. पण कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र व महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातला …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल, ओबीसींचे आरक्षण काढून मराठा समाजाला देणार का? महाविकासच्या जाहीरनाम्यात आश्वासन देणार का? महाविकास आघाडीचे नेते खोटारडे
ओबीसींच्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देणार का हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर करावे तसेच आपल्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात महाविकास आघाडीने असे लेखी आश्वासन द्यावे, मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे, निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आ. …
Read More »उद्धव ठाकरे यांचा टोला, उद्या मुंबईचे नाव बदलून अदानी स्मार्ट सिटी करतील… लाडक्या मित्राचे टेंडर रद्द करा, नव्याने निविदा काढा
राज्यातील महायुती सरकारने आल्यानंतर त्यांच्या नेत्याला खुश करण्यासाठी धारावीच्या पुनर्विकासाची निविदा त्यांच्या लाडक्या मित्राला देण्यात आले. मात्र त्यांच्या लाडक्या मित्रासाठी सध्या विविध सरकारच्या जमिनी आणि प्रकल्पाच्या जमिनी अधिग्रहीत करून देण्याचा सपाटा ज्या पध्दतीने राज्य सरकारकडून सुरु करण्यात आला आहे. त्यावरून सध्या प्रश्ननिर्माण होत आहे की, धारावीचा पुनर्विकास करायचाय की, मुंबईत …
Read More »रावसाहेब दानवे यांचे आवाहन, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ‘मविआ’ कार्यकर्त्यांकडे नको योजनेचे फॉर्म सरकारी यंत्रणेकडेच द्या
लाडकी बहीण योजनेचा वापर करून महायुती सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याने महिलांनी या योजनेचे फॉर्म विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडे न देता थेट सरकारी यंत्रणेकडे द्यावेत, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केले. आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढणार …
Read More »नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाले?
विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरु झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच महाविकास आघाची बैठक आयोजित केली जाईल व त्या बैठकीत जागा वाटपाची चर्चा केली जाईल. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच होईल असे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी …
Read More »
Marathi e-Batmya