ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाने मंत्रालयावर काढलेला मोर्चा हे निव्वळ ढोंग आणि नौटंकी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार राज्यात असतानाच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याची सुरुवात झाली आणि त्याला केंद्रातील भाजपा सरकारने साथ दिली हे उघड सत्य आहे, …
Read More »इम्पिरिकल डेटा जूनच्या पहिल्या आठवड्यात न्यायालयात सादर मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणासह घेण्याची परवानगी मध्य प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिली. त्यातच राज्य निवडणूक आयोगाकडून न्यायालयाच्याच आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु केली. यापार्श्वभूमीवर काहीही करून ओबीसी आरक्षणासह निवडणूका घेण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात इंम्पिरियल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ …
Read More »राज्यसभेसाठी शिवसैनिकाचे नाव जाहिर होताच संभाजी राजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक सुरु
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांना उमेदवारी हवी असेल तर त्यांनी शिवबंधन बांधून घ्यावे आणि आपली उमेदवारी घेवून जावी असे आवाहन शिवसेनेकडून केले. तसेच शिवबंधन बांधून घेण्यासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संभाजी राजे यांना फोन करून निमंत्रण दिले. मात्र या निमंत्रणाकडे पाठ फिरवित राजेंनी थेट कोल्हापूर गाठले. परंतु राजेंचा …
Read More »ढोंगी भाजपाला संविधान सोडा पण सावरकरांचा राष्ट्रवाद ही मान्य नाही सबका साथ, सबका विश्वास’ असेल तर भाजपाची मदरशांवर वक्रदृष्टी का? सचिन सावंत
देशात धार्मिक उन्माद वाढवण्याचे भाजपाचे पद्धतशीपणे प्रयत्न सुरु असून मदरशांचा मुद्दाही त्यातील एक भाग आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंता विश्वशर्मा यांनी मदरसे अस्तित्वातच नसावेत असे म्हटले आहे. नव्याने धर्मांतर केलेले अधिक कट्टर असतात अशी म्हण आहेच. याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मदरशांना सरकारी अनुदान देण्यावर बंदी घातली आहे. हा सर्व …
Read More »मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली, राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनुभूती या नव्या उपक्रमास मान्यता सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत करावयाच्या कामांसाठी ८१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत आज सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांसाठी ८१.५७ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला तसेच एकूण २४४.०८७ कोटी रुपयांच्या सुधारित सेवाग्राम आराखड्यास मान्यता देण्यात आली. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत करावयाची कामे ही वेळेत पूर्ण व्हावीत तसेच त्या कामांचा दर्जा उत्कृष्ट …
Read More »फडणवीस यांचा सवाल, पेट्रोल का महाग? उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले सांगा पेट्रोल डिझेल दरवाढ, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी एल्गार पुकारा
महाराष्ट्रात पेट्रोलवर केंद्र सरकारचा कर १९ रुपये प्रतिलीटर तर राज्याचा कर २९ रुपये आहे. आता उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले सांगा, राज्यात पेट्रोल डिझेलची महागाई कोणामुळे आहे, असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या विषयावर आंदोलन करून खोटारड्यांना उघडे पाडण्याचे आवाहन …
Read More »राज ठाकरे यांच्या आरोपानंतर मनसे नेत्यांकडून “तो” फोटो व्हायरल, एक तेल लावलेला पैलवान तर दुसरा.. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून समाजमाध्यमांवर फोटो शेअर करत केला आरोप
अयोध्या दौऱ्यावरून भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मागितली तर त्यांना उत्तर प्रदेशात प्रवेश देवू अन्यथा त्यांना उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला. त्याचबरोबर राज ठाकरें माफी मागता पोलिस काय लष्कर घेवून आले तरी त्यांना उत्तर प्रदेशात घुसू देणार …
Read More »ओबीसींना निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरक्षण लागू झालेले असेल तशी ऑर्डर घेण्याचा सरकारचा प्रयत्न- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
ओबीसी आरक्षणाबाबत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पाठपुरावा करत आहेत. ओबीसींना निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरक्षण लागू झालेले असेल तशी ऑर्डर घेण्याचा प्रयत्न सरकारचा सुरू आहे. ओबीसींना आरक्षण मिळायला हवे हाच प्रयत्न सरकारचा आहे अशी स्पष्ट भूमिका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली. वाचा ओबीसीशिवाय “या” १४ …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावरून फडणवीसांचा टोला, दगडाला सोन्याची नाणी समजा… औरंगाबादेतील जलआक्रोश मोर्चात सोडले टीकास्त्र
काही दिवसांपूर्वी मुंबईतील बीकेसीच्या मैदानात आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संभाजीनगरचे नांमातर करण्याची गरज काय मी म्हणतोय ना असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा धागा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे पाणी मागण्यासाठी गेलं तर काय उत्तर मिळू शकतं? उद्धव ठाकरेंचा शब्द …
Read More »ओबीसीशिवाय “या” १४ महापालिकांच्या आरक्षण सोडत आणि हरकतींचा कार्यक्रम जाहिर ३१ मेला होणार आरक्षणाची सोडत
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागातील अनुसूचित जाती-जमाती आणि महिला आरक्षणाचा कार्यक्रम पूर्ण करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह १४ महापालिकांना आदेश दिले. विशेष म्हणजे अन्य राखीव प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करून येत्या ३१ मे रोजी या राखीव प्रवर्गासाठी सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना दिले. राज्यातील …
Read More »
Marathi e-Batmya