राजकारण

शरद पवार म्हणाले, पाकिस्तानमध्ये आपले बांधव राहतात पाकिस्तानातील सामान्य नागरिक भारताचे शत्रु नाहीत

मागील काही वर्षात पाकिस्तानचा बागुलबुवा करून देशातील काही राजकिय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर राजकारण करत निवडणूका जिंकल्या. तसेच देशातील मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानचा मुद्दाही उपस्थित करण्यात येतो. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठे विधान केले असून पाकिस्तानातील सामान्य नागरिक भारताचे शत्रु नसल्याचे वक्तव्य करत तेथे आपले बांधव राहतात. …

Read More »

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, बदल गरजेचे; कामाची पध्दतही बदलली पाहिजे नवसंकल्प चिंतन शिबिरात मार्गदर्शन करताना केली सूचना

काही महिन्यांपूर्वी देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर आणि प्रसिध्द रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा पक्ष प्रवेश होता होता राहिल्यानंतर काँग्रेसच्या नवसंकल्प चिंतन शिबिरात मार्गदर्शन करताना काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सूचना करत कान पिचक्या दिल्या. यावेळी सोनिया गांधींनी पक्षात बदल गरजेचे असून …

Read More »

अखेर मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या सुरक्षेत राज्य सरकारने केली वाढ आता एक ठाणे अंमलदार आणि पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती वाढविली

काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना धमकी देणारे पत्र मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या कार्यालयात आले. त्यानंतर नांदगावकर यांनी यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेत राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली. त्यातच काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही राज ठाकरे यांना अयोध्येत …

Read More »

पवारसाहेब, ऊस गाळपाचे नियोजन करा, मग कविता वाचनाचे कार्यक्रम खुशाल करा भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे यांचा घणाघात

सलग दहा वर्षे देशाचे कृषीमंत्रीपद आणि अनेक वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवूनही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेतकरी कल्याणाच्या केवळ गप्पा मारल्या. त्यांनी त्यावेळीच शेतकऱ्यातला देव शोधला असता तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे माजी कृषीमंत्री डॉ. अनिल …

Read More »

अजित पवार म्हणाले, चंद्रकांत पाटलांचे म्हणणे खरे, पण पटोलेंचे ते विधान चुकीचे शेतकऱ्यांनो घाबरू नका...आणि टोकाचा निर्णय घेऊ नका... सरकार तुमच्या पाठीशी आहे

भाजपाचा तो केविलवाणा प्रयत्न आहे. पवारसाहेबांचे भाषण नीट ऐका. एका कवीचा दाखला त्यांनी दिला आहे. पण ते न दाखवता वेगळंच दाखवलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शरद पवार हे एकटे राष्ट्रवादी चालवतात असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे .बहुतेक ठिकाणी तीच परिस्थिती असते. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे चालवत …

Read More »

संजय राऊत म्हणाले, अशी पत्रे शिवसेना भवनात शेकड्याने येतात मात्र… त्या पत्रावरून मनसेवर साधला निशाणा

काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना धमकीचं पत्र आल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेवून राज ठाकरे यांना सुरक्षा पुरविण्याची मागणी केली. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणा की, अशी पत्रे शिवसेना भवनात आम्हाला रोज शेकड्याने येत असतात असा …

Read More »

राज्यसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर, हे खासदार झाले निवृत्त १० जून २०२२ रोजी मतदान तर त्याच दिवशी मतमोजणी होवून निकाल जाहीर

राज्यसभेतील महाराष्ट्रातील ६ जागांसह रिक्त होत असलेल्या ५७ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर झालाय. भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक जारी केले आहे. यानुसार १० जून २०२२ रोजी या ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांचा समावेश असून यात शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापासून ते राष्ट्रवादी …

Read More »

शरद पवार म्हणाले, राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा, चुकलं तर अक्कलही शिकवतात डॉ.आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळे देश एकसंध

देशातील विद्यमान राजकिय परिस्थितीबाबत बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हणाले, आम्हा राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा असून आमचं चुकलं तर अक्कल शिकवतात आणि दुरुस्त करायला पुढे काही आलं तर त्याला संधी देतात असे सांगत देश एकसंध राहिला तो केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटनेमुळे असेही सांगितले. गुरुवारी १२ …

Read More »

ते पत्र जाहिर करत पटोले म्हणाले,… याला पाठीत खंजीर खुपसणे म्हणायचे नाही तर काय ? माझ्यावर टीका करून सत्य झाकता येणार नाही

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे. याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? असा सवाल करून माझी पार्श्वभूमी संपूर्ण देशाला आणि राज्याला माहित आहे. आम्ही जे काही करतो …

Read More »

संभाजीराजेंनी सोडले भाजपाला, केल्या या दोन घोषणा 'स्वराज्य' संघटनेची स्थापना, स्वतंत्र राजकिय वाटचाल करणार

भाजपाचे सहयोगी सदस्य म्हणून राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त केलेले माजी खासदार संभाजी राजे यांनी आज मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसल्याचे सांगत स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापना केल्याचे जाहीर करत या संघटनेच्या माध्यमातून राजकारणात उतरणार असल्याचे जाहीर केले. काही दिवसांपूर्वी खासदार संभाजी राजे यांनी १२ मे रोजी आपली भूमिका …

Read More »