शासनाने राज्यात सन २०२० ची पोलीस शिपाई संवर्गातील ७२३१ रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिलीप …
Read More »राज्यपाल कोश्यारींनी पत्र पाठवित विचारला मविआला जाब; माहिती सादर करण्याचे दिले आदेश विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या पत्राची दखल
शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावित शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना घेऊन आसामची राजधानी गुवाहाटी गाठली. त्यानंतर राज्य सरकारच्या अनेक विभागाकडून मोठ्या प्रमाणावर शासकिय आदेश, निधी वाटपाचे आदेश जारी केले. त्यामुळे हे सारे आदेश कोणत्या आणि कशासाठी …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा बंडखोर आणि शिवसेनेला समान धक्का १६ आमदारांना बाजू मांडण्यासाठी १२ जुलैपर्यंतची मुदत
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बंडखोर १६ आमदारांना बजाविलेल्या नोटीसी आणि शिवसेनेच्या गटनेते पदी शिवडीचे आमदार अजय चौधऱी यांची नियुक्ती केल्याच्या विरोधात बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आपली बाजू मांडली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दोन्हीकडी बाजू ऐकून घेत बंडखोर आमदारांना १२ जुलैपर्यंतची मुदत दिली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने …
Read More »अस्थिर वातावरणातही मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक दिले ‘हे’ निर्देश राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्य कारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या …
Read More »मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, फक्त एकदा समोर येवून सांगा…; वाचा नेमके काय म्हणाले दुसरा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असेल तर मला आनंदच लगेच खुर्ची सोडतो
मागील काही दिवसांपासून शिवसेनेतील दुसऱ्या नंबरचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून आणि शिवसेनेकडून हे बंड संपुष्टात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र काही केल्या बंड संपुष्टात येण्याची कोणतीही चिन्हे दिसेनात. अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ऑनलाईन पध्दतीने शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील …
Read More »एकनाथ शिंदे यांच्यामुळे मविआ सरकार अडचणीत मात्र किमान आठवभराचे जीवदान ? बहुमत सिध्द करण्यासाठी राज्यपाल सांगणार की सरकारच अधिवेशन बोलविणार
राज्यातील शिवसेनेतील दोन नंबरचे नेते एकनाथ शिंदे यांनी २२ आमदारांना सोबत घेत शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बंडाळी केली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. मात्र सध्या विधानसभेचे अधिवेशन चालू नसल्याने याबाबत लगेच कोणत्याही घडामोडी होतील अशी शक्यता दिसून येत नसली तरी याबाबत …
Read More »सर्वोच्च न्यायालयाकडूनही अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पदरी निराशा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला
राज्यसभा निवडणूकीत मतदान करण्यास परवानगी मिळाली नाही किमान विधान परिषदेच्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी तात्पुरता जामिन मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही मलिक आणि देशमुख यांना कोणत्याही स्वरूपाचा दिलासा देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधी …
Read More »या शहरांमध्ये उभे राहणार इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन; कोटा जाहिर इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन क्षेत्रात महावितरणची आघाडी
पर्यावरण पुरक आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीला पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांना मोठ्या प्रमाणात स्विकारल्या जात आहे. चालू दशकाच्या अखेरपर्यंत देशात विकल्या जाणा-या एकूण वाहनापैकी ३० टक्के ही इलेक्ट्रीक वाहने असणार आहेत. या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहन धारकांना त्यांच्या वाहनांच्या चार्जींगची व्यवस्था सहजतेने उपलब्ध व्हावी, यासाठी पुढाकार घेत महावितणने …
Read More »मंगळवारचा दिवस मोठा राहणार पृथ्वीचे दक्षिणायण सुरु होणार
आपणा सर्वांना माहित आहे की १२ तासाचा दिवस आणि १२ तासाची रात्र असते. मात्र वर्षातील एक दिवस असा असतो की त्या दिवशी दिवस हा १२ तासापेक्षा जास्त मोठा तर रात्र ही १२ तासापेक्षा लहान असते. साधारणत: पृथ्वीचे भ्रमण हे उत्तरायणाकडून दक्षिणेकडे अर्था पृथ्वीचे दक्षिणायन सुरु झाले की त्याच्या पहिला दिवस …
Read More »तरूणांच्या आंदोलनासमोर केंद्राची थोडीशी माघार; अग्निपथ योजनेत आता या सवलती देशातील तरूणांकडून माघार नाहीच
लष्कराच्या तिन्ही दलातील भरतीसाठी केंद्र सरकारने जाहिर केलेल्या अग्निपथ योजनेला तरूणांचा वाढता विरोध काही केल्या कमी होण्यास तयार नाही. मागील तीन दिवसांपासून उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमधील तरूणांकडून या योजनेच्या विरोधात रेल्वे स्टेशन्सवर दगडफेक, जाळपोळीच्या घटना आदी घडताना दिसत आहे. त्यातच आज काही राज्यांमध्ये या तरूणांकडून …
Read More »
Marathi e-Batmya