Tag Archives: काँग्रेस

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबईकरांची जीवघेण्या प्रवासातून सुटका करण्यासाठी काय केले? लोकसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केंद्राला केला सवाल

मुंबईची उपनगरीय रेल्वे ही लाईफलाईन आहे. परंतु दररोज होणारे अपघात आणि असुरक्षित प्रवासाने ती डेथलाईन बनली. लोकलने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रेल्वे विभाग व सरकारकडे सातत्याने लोकल सेवेबद्दल तक्रार करूनही त्यात काही फरक पडलेला नाही. मुंबईतील लोकल सेवेसाठी सरकारने काय काय उपाययोजना केल्या, असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष …

Read More »

आयकर अपीलीय न्यायाधिकारणाकडून १९९ कोटी कर प्रकरणी काँग्रेसला दिलासा नाहीच आयकरासंदर्भात काँग्रेसचे अपील फेटाळून लावले

कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला, आयकर अपीलीय न्यायाधिकरण (ITAT) ने २०१७-१८ या वर्षाच्या कर मागणीविरुद्धचे त्यांचे अपील फेटाळून लावले. पक्षाने आयकर विभागाच्या नोटीसला विरोध केला होता, ज्यामध्ये १९९ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर कर भरण्यास सांगितले होते. काँग्रेसने दावा केला होता की ही रक्कम देणग्यांमधून आली आहे आणि ती करमुक्त असावी. …

Read More »

जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्या नेमके कारण काय? आरोग्य की अन्य न्यायमूर्ती यशवंत वर्मा, ऑपेरेशन सिंदूर आणि निवडणूक आयोगाचे बिहारमधील निवडणूकीसंदर्भातील कृती

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. अपेक्षेप्रमाणे वादळी, विरोधी पक्ष सरकारवर हल्ला करत होते. तथापि, दुसरीकडे कुठेतरी अनपेक्षित वादळ निर्माण होत होते, असे विरोधी पक्ष नेत्यांचे वक्तव्य आणि दिवसातील घडामोडी उघड करा. यावरून असे दिसून येते की उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे अनपेक्षित वादळाच्या समोर होते आणि त्यांनी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, ‘सरकार भिकारी आहे’ मंत्रीच म्हणत… हा असंवेदनशिलतेचा कळस कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिम्मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाही का?

महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा व संस्कृती लाभलेली आहे पण तीच धुळीस मिळवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उचलला आहे काय? असा प्रश्न पडला आहे. फडणविसांच्या मंत्रिमंडळात एक एक नमुने म्हणजे माणिक, मोती अशी रत्नेच शोभावी अशी आहेत. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर कहरच केला आहे. आता तर …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, सत्ताधारी पक्षातील आमदारच नाही तर मंत्री व पदाधिकारीही माजले दररोज ६ शेतकरी आत्महत्या होत असताना कृषी मंत्री रमीत रमतो, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लाज कशी वाटत नाही?

राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत असताना राज्याचा कृषी मंत्री विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतो हे चित्र महाराष्ट्राची लाज वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. मंत्र्यांना कशाचेच भान नाही आणि आमदार व पदाधिकारी गुंड, मवाली बनलेत परंतु मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या माजलेल्या लोकांना वेसन घालू शकत नाहीत. कारवाई फक्त विरोधी पक्षांवर करण्याची …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी यांना सवाल देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार

मे महिन्यात भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान “पाच जेट विमान पाडण्यात आले” असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. त्यापाठोपाठ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यांनीही शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न याबाबत विचारत म्हणाले की, देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. राहुल गांधी यांनी पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मोदीजी, …

Read More »

वर्षा गायकवाड म्हणाल्या, उत्तर भारतीय समाजाला जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ अभियान उत्तर भारतीयांच्या विकासात काँग्रेसचे योगदान

उत्तर भारतीय समाज, मुंबई व काँग्रेस पक्ष यांचे एक घट्ट नाते आहे. मुंबईत आलेल्या उत्तर भारतीय समाजाला काँग्रेस हा मोठा आधार राहिलेला आहे. आजही काही लोक उत्तर भारतीयांविरोध आग ओकत असताना काँग्रेस मात्र या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि आगामी काळात उत्तर भारतीय समाजाला काँग्रेस पक्षाशी मजबूतपणे जोडण्याचे काम …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, काँग्रेसमध्ये लोक कामगिरी करतात, तर भाजपात फक्त बोलतात साधना समावेशा कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भाजपावर टीका

१९ जुलै रोजी म्हैसूर येथे साधना समवेशा कार्यक्रमाला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, काँग्रेस पक्षात लोक कामगिरी करतात, तर मोदींच्या भाजपामध्ये लोक फक्त बोलतात. मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संविधानाचा ‘खून’ केल्याचा आरोप केला आणि असे प्रतिपादन केले की भारतातील लोक भाजपा आणि आरएसएसला त्यात बदल …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, मारामारीचे प्रायश्चित म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांनी राजानीमा द्यावा पावसाळी अधिवेशनात शेतकरी, कष्टकरी, महिला, बेरोजगारांच्या प्रश्नांना सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असेच म्हणावे लागेल. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, महिला सुरक्षित नाहीत, ड्रग्जचा सुळसुळाट जोरात सुरु आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीकविमा, बेरोजगारी यातील एकाही प्रश्नावर ना सविस्तर चर्चा झाली ना काही निर्णय. हे अधिवेशन लक्षात राहिल …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, महाराष्ट्र २० टक्के कमिशनचे राज्य झाले काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची अंतिम आठवडा प्रस्तावात सरकारवर टीका

पुण्यात कोयत्या गँगने धुमाकुळ घातला होता, पण दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची टॉवेल बनियन गँग आता कार्यरत झाली आहे. त्यांच्या मनासारखे नाही झाले की ते ठोसे देतात. जेवण चांगले मिळाले नाही म्हणून मारहाण केली असेच गळकी एसटी बघून परिवहन मंत्र्यांचे काय करायचं? निकृष्ट बांधकाम करणाऱ्या मंत्र्यांचे, दवाखान्यात औषध नाही मिळाले की आरोग्य मंत्र्याला …

Read More »