Tag Archives: नरेंद्र मोदी

भाजपाकडून मुख्यमंत्री पदासाठी महिला आमदाराच्या नावाची चर्चा तर शिंदे यांना विरोध करण्यासाठी मुख्यमंत्री पद डोंबिवलीतील आमदाराकडे

राज्यातील विधानसभा निवडणूकीत संशयातीत पाशवी बहुमत महायुतीला मिळाले. विधानसभेचा निकाल जाहिर होऊन आज जवळपास चार दिवस झाले. परंतु भाजपा आणि महायुतीकडून अद्याप मुख्यमंत्री पदासाठी कोणाचेही नाव अधिकृतरित्या जाहिर करण्यात आले नाही. तर अनेक राजकिय जाणकारांच्या मते मुख्यमंत्री पदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र वास्तविक पाहता …

Read More »

नाना पटोले यांचे सूचक विधान, मुंबईला लुटणाऱ्या उद्योगपती अदानीला…. नरेंद्र मोदींच्या मदतीने देशाला लुटणाऱ्या अदानीला अटक करण्याची राहुल गांधींची मागणी योग्यच

उद्योगपती गौतम अदानी यांनी कंत्राटे मिळवण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची लाच दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. ही केंद्रातील सरकारसाठी लाजिरवाणी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने गौतम अदानींना देश विदेशात मोठ्या प्रमाणात कंत्राटे मिळवून देशाला लुटले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करून कोणतीही चौकशी न करता मोदी सरकारने …

Read More »

अमेरिकन न्यायालयाच्या अटक वॉरंटनंतर राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधानांचे संरक्षण अदानीला चौकशी सर्वांची झाली पाहिजे पण त्याची सुरुवात अदानीपासून

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील सरकारी वकिलांनी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केल्याने गुरुवारी राजकीय वादळ उठले, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या तात्काळ अटकेची मागणी केली आणि आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाचखोर आहेत. त्याचे “संरक्षण” अदानीला आहे . सोमवारपासून सुरू …

Read More »

राहुल गांधी यांचा खोचक सवाल, मोदीजी ५ कोटी कुणाच्या सेफमधून निघाले? भाजपाचे विनोद तावडे यांच्या पैसे वाटपाच्या मुद्यावरुन राहुल गांधी यांचा सवाल

विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना भाजपाचे केंद्रीय महामंत्री अर्थात महासचिव विनोद तावडे यांच्याकडून नालासोपाऱ्यातील विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रूपयांचे वाटप करण्यात येत असल्याच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यातच पाच कोटी वाटपाचे प्रकरणाची कुणकुण लागताच बहुजन विकास आघाडीचे प्रमुख …

Read More »

राहुल गांधी यांची एक्सवर पोस्ट म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येतेय… शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियाबाबत सहवेदना, पुण्यतिथी निमित्त केले अभिवादन

राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीचा माहोल सध्या सुरु असून निवडणूकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांचे उट्टे काढण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच भाजपाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या आव्हानाची पूर्तता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पूर्ण करत भाजपाला प्रति आव्हान दिले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख …

Read More »

मोदी आणि शाह यांनी दिलेलं आव्हान प्रियांका गांधी-वड्रा यांनी पूर्ण करत दिलं नवं आव्हान बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल दोन चांगले शब्द बोलण्याचे दिले होतं आव्हान

राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर आणि विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरील उट्टे काढण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूनी होताना दिसत आहेत. त्यातच भाजपाच्या नेत्यांनी टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाविकास आघाडीवर शरसंधान साधत आव्हानही दिली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही भाजपा आणि पंतप्रधान मोदी, अमित शाह यांना काही …

Read More »

पंतप्रधान मोदी शनिवारी भाजपाच्या बूथ प्रमुखांशी संवाद साधणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीच्या ‘माझा बूथ सर्वात मजबूत ‘ या उपक्रमाद्वारे राज्यातील पक्षाच्या १ लाख बूथ प्रमुखांशी नमो ॲपच्या माध्यमातून आणि ऑनलाइन संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे बूथ पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होईल आणि पक्षाच्या विजयाच्या दिशेने आणखी एक पाऊल पडेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे …

Read More »

भाजपावाले म्हणतात महाराष्ट्राच्या विकासासाठी मात्र प्रत्यक्षात राज्याचे प्रकल्प आणि पैसा केंद्राने घेतले राज्य सरकारचे रेल्वे प्रकल्प आणि पैसा केंद्राने घेतले काढून

सध्या राज्यात विधानसभा निवडणूकांचा माहोल असून निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदानही पार पडणार आहे. तसेच सध्या राज्यात प्रचाराची राळही उडत आहे. या प्रचारात भाजपाचे केंद्रातील मंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी हे सातत्याने महाराष्ट्रात प्रचारसभा घेत आहेत. तसेच डबल इंजनचे सरकार महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावत असल्याचे छातीठोकपणे सांगत आहे. या …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची ग्वाही भाजपाचे संकल्पपत्र ही महाराष्ट्राच्या विकासाची पंचवार्षिक गॅरंटी चिमूर येथील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

भाजपाच्या संकल्पपत्राद्वारे महाराष्ट्राचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी आम्ही अनेक योजना आखल्या आहेत. येत्या पाच वर्षाकरिता हे संकल्पपत्र म्हणजे विकासाची गॅरंटी आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी चिमूर येथील जाहीर प्रचारसभेत बोलताना दिली. गेल्या अडीच वर्षांत डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकासाचा दुप्पट वेग महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवला आहे, प्रत्येक विकास योजनेत …

Read More »

नाना पटोले यांचे भाकित, ….मविआ जिंकली तर मोदींची सत्ताही जाणार जाती-धर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा युतीला सत्तेतून तडीपार करा

विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला पराभव दिसू लागल्याने ते हिंदू-मुस्लीम करत आहे. भाजपाचे नेते भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांच्याबद्दल बोलत नाहीत. ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, च्या घोषणा देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, त्याला बळी पडू नका. जातीधर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा युतीला सत्तेतून तडीपार करा, असे आवाहन करत मविआ …

Read More »