विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. नार्वेकर यांचे वर्तन आक्षेपार्ह व आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांच्या कार्यालयातील तब्बल ७० अधिकारी व कर्मचारी नार्वेकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रीय भाग घेत आहेत, या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा टीका, आता रेशिमबाग नाहीतर अदानी अंबानी चालवणार भाजपा काँग्रेसमुक्त वल्गणा करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून दुसऱ्या पक्षातील आयत्यावेळी आलेल्यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. भाजपामध्ये ही नाराजी राज्यभर सर्वदूर दिसत असून ‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्याची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्तामुक्त भाजपा’ झाला आहे, असा घणाघाती …
Read More »अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. चिखलदरा येथील सुमारे साडे सात एकर जमीन १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध …
Read More »रामदास आठवले यांच्या रिपाईकडून ३९ उमेदवारांची यादी जाहिर; प्रविण दरेकर भेटणार आठवलेंना मुख्यमंत्री फडणवीस रामदास आठवले यांची नाराजी दूर करणार
नुकतेच मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने रिपाईचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीबाबत जागा वाटपाच्या संदर्भात नाराजी व्यक्त करत भाजपाकडे किमान १६ जागा मागितल्या. परंतु भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर यांनी रामदास आठवले यांची नाराजी दूर करणार असल्याचे जाहिर केले. मात्र आज रामदास आठवले यांनी त्यांच्या पक्षाच्यावतीने ३९ …
Read More »उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन ‘बेटी बचाओ’ ही भाजपाची पोकळ घोषणा, बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी भाजपा उभा
उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा न्यायालयाने निलंबित केल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्नावसारख्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला दिलासा देणारी व्यवस्था भाजपच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. ‘बेटी बचाओ’ ही केवळ घोषणा असून प्रत्यक्षात भाजप बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. अशा सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर …
Read More »रविंद्र चव्हाण म्हणाले, विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला दणदणीत यश देऊन मतदारांनी विकास, सेवा, सुशासनला कौल दिला आहे. १२५ पेक्षा अधिक जागांवर भाजपाचा विजय आणि ११०० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून दिले आहेत. भाजपावर मोठा विश्वास दाखविल्याबद्दल जनतेचे आभार मानतो असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी रविवारी केले. भाजपा …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने निवडणूक आयोगाचा गोंधळी कारभार, बोगस मतदान, पैसा व सत्तेचा निवडणुकीत प्रचंड गैरवापर
नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार अधिरेखीत झाला आहे. मतदान प्रक्रियेचा पुरता गोंधळ घातला गेला, तारिख पे तारिख चा खेळ केला. ही निवडणूक फ्रि अँड फेअर अशी झाली नाही. सत्ताधारी पक्षाकडून साम, दाम, दंड, भेद या नितीचा मुक्तपणे वापर करण्यात आला. निवडणुकीत बोगस मतदार, दडपशाही, सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा …
Read More »काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची मनरेगा कायद्यातील दुरुस्तीवरून मोदींवर टीका काळा कायदा म्हणून वर्णन केलेल्याच्या विरोधात लढा देणार
ग्रामीण रोजगार योजनेतील बदलांवरून काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर तीव्र हल्ला चढवला आणि त्यांनी सांगितले की त्यांनी पूर्वी गरिबांच्या हक्कांसाठी लढा दिला होता आणि “काळा कायदा” म्हणून वर्णन केलेल्याच्या विरोधात पुन्हा लढेन असा इशारा काँग्रेस नेत्या तथा माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, दि. बा. पाटील यांच्या नावाशिवाय दुसरे नाव खपवून घेणार नाही सातारा ड्रग्स कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्या!
नवी मुंबई विमानतळाला भूमीपुत्र दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची लोकांची तीव्र भावना आहे, या भावनांचा आदर सरकारने केला पाहिजे. भाजपा महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ करत आहेत, परंतु कोणत्याही परिस्थितीत दुसरे नाव खपवून घेतले जाणार नाही, वेळ प्रसंगी रस्त्यावर …
Read More »सचिन सावंत यांचा आरोप, मंगलप्रभात लोढा भाजपच्या शहरी अन्यायाच्या मॉडेलचे ‘ब्रँड अँबेसडर’ महानगरपालिकेतील बिल्डर–राजकारणी साटेलोट्याची सखोल चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा
मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. बीएमसीतील भ्रष्ट अधिकारी, बिल्डर व सत्ताधारी नेत्यांचे रॅकेट आहे, हे रॅकेट मुंबईला लुटत आहे. सर्वसामान्य मुंबईकरांचे शोषण करून बिल्डरांच्या बेकायदेशीर हितसंबंधांना पाठीशी घालणारे लोढा यांच्यासारखे नेते भाजपाच्या शहरी अन्यायाच्या मॉडेलचे ‘ब्रँड अँबेसडर’ झाले आहेत. मुंबईत बिल्डरांचे नव्हे तर …
Read More »
Marathi e-Batmya