प्रज्ञा सातव यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना नेमके कोणते प्रलोभन दिले हे माहित नाही. मात्र भाजपा कडून सातत्याने दुसऱ्या पक्षातील लोकांना फोडण्यासाठी पैशांचे व पदांचे प्रलोभन दिले जाते, हे लपून राहिलेले नाही. भाजपाला सत्तेचा प्रचंड माज आला आहे. या पक्षाला लोकशाही मान्य नाही. अशा …
Read More »काँग्रेस नेते स्व.राजीव सातव यांच्या पत्नी आ. प्रज्ञा सातव, दिलीप माने यांचा भाजपा मध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत
हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या माजी आमदार प्रज्ञा सातव आणि सोलापूर दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी, ज्येष्ठ नेते कृपाशंकर …
Read More »वर्षा गायकवाड यांचा विश्वास, मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाची विजयी पताका फडकवू मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मुंबईच्या प्रश्नावर लढणार
मुंबई महानगरपालिका निवडणूकीची घोषणा झाली असून काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी तयार आहे. महानगरपालिकेत भाजपा महायुतीने प्रशासकाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या पैशांवर दरोडा टाकला आहे. लाडके कंत्राटदार व लाडक्या उद्योगपतीला मुंबई विकली जात आहे. मुंबईच्या विकासासाठी व मुंबईकरांच्या भविष्यासाठी काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणूक लढवून काँग्रेस विजयी पताका फडकवेल, असा निर्धार मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, मोदींनी जाहीर माफी मागावी महानगरपालिका निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर
नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा आहे. केवळ सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांना बदनाम करण्यासाठी रचलेले एक कुंभाड असल्याचे आज उघड झाले. ईडी सारख्या सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा भाजपाचा अजेंडा आहे. न्यायालयाच्या निर्णयाने दूध का दूध पाणी का पाणी झाले …
Read More »जयंत पाटील यांचा टोला, ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ ते ‘महाराष्ट्रात हे कधी थांबणार’ चा प्रवास राज्यात महागाई, बेरोजगार, कायदा सुव्यवस्थेची स्थिती पण सरकार म्हणतंय… बाकी सब ठीक है
१९५३ साली झालेल्या करारानुसार विदर्भातील जनतेला आम्ही वचन दिलेलं की, विदर्भातील प्रश्न मांडण्यासाठी दरवर्षी सहा आठवड्याचे अधिवेशन घेऊ. आता सहा आठवड्याचे अधिवेशन एक आठवड्यावर आले आहे. त्यात किमान एक दिवस तरी विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली. हा विदर्भाच्या जनतेचा अवमान असल्याचा आरोप जंयत पाटील यांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू करा
राज्याला लाभलेला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, निर्माणाधीन वाढवण बंदर आणि सागरी क्षेत्रातील अपार संधी लक्षात घेता २०२६ मध्ये देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधान भवन स्थित मंत्रीपरिषद सभागृहात आयोजित बैठकीत बंदरे विकास विभागाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. यावेळी मत्स्यव्यवसाय …
Read More »मतचोरीवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात खडाजंगी राहुल गांधी यांचे चर्चेचे खुले आव्हान, तर अमित शाह यांचा काँग्रेसवर मतचोरीचा आरोप
काँग्रेस खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात मतचोरीच्या मुद्यावरून लोकसभेत जोरदार खडाजंगी झाली. राहुल गांधी यांनी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांमधील मुद्यांवर खुल्या चर्चेचे आव्हान अमित शाह यांना दिले. तर अमित शाह यांनी काँग्रेसवरच मतचोरीचा आरोप केला. अमित शाह… है हिम्मत ❓ pic.twitter.com/kbNNlJxhnQ — Congress …
Read More »वंदे मातरम राष्ट्रगान वरून प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा पंतप्रधान मोदींच्या दाव्यातील हवा काढून घेतली
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जवाहरलाल नेहरू यांनी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेल्या पत्रात वंदे मातरमची उत्पत्ती मुस्लिमांना भडकावू शकते असा दावा फेटाळून लावला. पंतप्रधानांनी लोकसभेत त्यांच्या भाषणादरम्यान पत्रातील निवडक उद्धृत केले होते, असे म्हटले आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेल्या …
Read More »महाविकास आघाडीचा चहापानावर बहिष्कार, पत्राद्वारे सरकारला दिला इशारा हिवाळी अधिवेशानाला सोमवारपासून सुरुवात
राज्य विधिमंडशळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला सोमवारी ८ तारखेपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी अर्थात महाविकास आघाडीने बहिष्कार टाकत असल्याची घोषणा राज्य सरकारला पाठविलेल्या पत्राद्वारे केली. तसेच राज्य सरकारच्या कारभारावरून टीका केली. महाविकास आघाडीने सरकारला लिहिलेले पत्र खालीलप्रमाणे… प्रति. मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल, इंदू मिलमधील डॉ आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण का होत नाही? स्मारकाच्या कामावरून सरकारला केला सवाल
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी अभिवादन केले. त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य स्मारक बनवण्याकरिता इंदू मिलची …
Read More »
Marathi e-Batmya