Tag Archives: भाजपा

अजित पवार यांची माहिती, महाराष्ट्राचा विकास हाच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा राष्ट्रवादी काँग्रेसचा २६ वा वर्धापन दिन पुण्यात थाटात साजरा...

महाराष्ट्राचा विकास हाच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा राहणार आहे असे जाहीर करतानाच याअगोदरही राज्य आणि देशासाठी काम करत होतो आणि यापुढेही करत राहू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६ व्या वर्धापन दिनाच्या भव्य कार्यक्रमात दिले. अजित पवार पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी …

Read More »

अमित शाह यांची घोषणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल मध्ये २०२५ मध्ये सरकार स्थापन करणार भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचा कार्यकर्त्यांसमोर केला विश्वास

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी ८ जून २०२५ असे प्रतिपादन केले की एनडीए तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करेल. द्रमुकच्या भ्रष्ट राजवटीचा तामिळनाडूतील गरीब, महिला आणि मुलांवर परिणाम झाला आहे, असा आरोप शाह यांनी केला आणि त्यांच्या पक्षाच्या सदस्यांना स्टॅलिनच्या नेतृत्वाखालील द्रविड पक्षाच्या सरकारला सत्तेच्या खुर्च्यावरून उलथवून टाकण्याचा …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये ‘बटेंगे तो कटेंगे’वाल्या देवेंद्र फडणविसांनी ‘भारत जोडो’वर बोलू नये, भाजपाची विचारसरणीच विभाजनवादी

भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या संगनमताने विधानसभा निवडणुकीत गडबड घोटाळा केला आहे. बोगस मतदार याद्या बनवूण, मतांची चोरी करून भाजपा सत्तेत आली आहे. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर लगेच काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह हा घोटाळा कसा केला गेला याची मांडणी केली आहे पण निवडणूक आयोग समाधानकारक उत्तरे देत …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची खोचक टीका, राहुल गांधी… फडणवीस यांचा लेख हास्यास्पद राहुल गांधी यांच्या प्रश्नांना भाजपा का उत्तर देतेय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या चोरीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लेख लिहून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पण त्याची मिरची मात्र भाजपाला लागली. प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले आहेत, त्याची उत्तरे त्यांनी देणे अपेक्षित असताना भाजपा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहून उत्तरे दिली आहेत. फडणवीस यांचा लेख …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, घोटाळा नाही तर चौकशी का नाही ? भाजपा नेत्यांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा राहुलजींनी उचलेले मुद्दे खोडून काढावेत

लोकसभा निवडणुकीत घवघवीत विजय मिळवलेल्या महाविकास आघाडीचा पाच महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव होतो हे अनाकलनीय आहे. रात्रीच्या अंधारात मतांवर दरोडा टाकून भाजपा युती निवडणूक आयोगाच्या मदतीने विजयी झाली आहे. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोग पुराव्यासह खुलासा का करत नाही, असा संतप्त सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, महाराष्ट्रात विधान सभेची झालेली निवडणूक ही मॅच फिक्सिंग राज्यातील महाराष्ट्र विरोधी सरकार घालवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्यांचे स्वागत

महाराष्ट्रात झालेली विधानसभा निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती, या निवडणुकीत नेमकी काय झालं याचं सत्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मांडले आहे. दम असेल तर यावर खुलासा करावा असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. विजय वडेट्टीवार म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रात निवडणुकीत झालेले मतदान, …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, विधानसभा निवडणुकीतील फिक्सिंगची चौकशी का करत नाही? निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भाजपाचे अमित शाह व देवेंद्र फडणवीस का देतात? निवडणूक आयोग गप्प का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदानाची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. अचानक वाढलेले मतदान हे अनौरस, बोगस असल्याने काँग्रेस पक्षाने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली पण चौकशी काही केली जात नाही. राहुल गांधी यांनी संसदेत व संसदेबाहेरही हा प्रश्न लावून धरला आहे. आज देशभरातील प्रमुख …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या मुख्यमंत्री योगींनी माफी मागावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा राज्यात नंगानाच, या विकृत प्रवृत्तींचा कडेलोट करा

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात सर्वच जाती धर्मांच्या लोकांना समान स्थान होते. सर्वधर्मसमभावाची हीच संकल्पना संविधानात आहे, शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटले जाते. पण महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींचा आज महाराष्ट्रात नंगानाच सुरु आहे. भाजपाचे सरकार असतानाच या प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. या प्रवृत्तीचा आतापर्यंत समूळ नायनाट …

Read More »

भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मोजणीदारांचे काम बंद आंदोलन मागे

राज्य शासन गतिमान आणि पारदर्शकपणे काम करीत आहे. यामध्ये महसूल विभागाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. भूमी अभिलेख विभागातील मोजणीदारांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोजणीदार संघटनांसमवेत झालेल्या बैठकीत सांगितले. या बैठकीनंतर संघटनांच्या प्रतिनिधींनी तत्काळ कामावर रुजू होत …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, ट्रम्प यांचा फोन आला, नरेंद्र मोदींनी आत्मसमर्पण केले युद्धबंदीवरून राहुल गांधी यांची खोचक टिका

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आणि असा दावा केला की ऑपरेशन सिंदूर दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोनवरून त्यांनी आत्मसमर्पण केले. काँग्रेसच्या संघटना सर्जन अभियानादरम्यान गांधी भोपाळमध्ये बोलत होते, जिथे त्यांनी काँग्रेससाठी खरोखर लढू इच्छिणाऱ्या परंतु त्यांचे ऐकले जात नसलेल्या पक्ष नेत्यांच्या निराशेची …

Read More »