भारतीय जनता पक्ष आणि महायुती पराभवाच्या भितीने मोठ्या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर करत असून भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई विरार मध्ये मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले आहे. विनोद तावडे यांनी पाच कोटी रुपये वाटल्याचे आरोप केले जात आहेत त्यामुळे तावडे यांना तात्काळ अटक केली पाहिजे अशी मागणी …
Read More »आधी हिंतेंद्र ठाकूरांचे विनोद तावडेंवर आरोप नंतर ठाकूरांनीच तावडेना बाहेर काढले विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांची पत्रकार परिषद रद्द
विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना भाजपाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे हे विरारमधील विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रूपये वाटत असल्याचे प्रकरण बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितीज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांनीच उघडकीस आणले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर विनोद तावडे भाजपामधील एका बड्या नेत्याच्या …
Read More »बविआने पैशासोबत पकडल्यानंतर विनोद तावडे यांचा खुलासा, मी कार्यकर्त्यांना…. विवांता हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी आलो होतो
बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांनी भाजपाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांना पैशाच्या बॅगेसह आणि पाकिटासह विवांता हॉटेलमध्ये पकडल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर पुढील कारवाई होण्याआधीच विनोद तावडे यांनी एका प्रसारमाध्यमाला खुलासा केला. विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो असे स्पष्टीकरण …
Read More »बहुजन विकास आघाडीने विनोद तावडे यांना ५ कोटी आणि नावाच्या डायरीसह पकडले विवांता हॉटेलमध्ये झाला राडा
राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचार थंडावल्यानंतर निवडणूक आयोगाने पुढील ४८ तास सर्वच राजकिय पक्षांना मतदारांना प्रलोभने दाखविण्यापासून ते छुपा प्रचार करण्यापासून रोखणारा आदेश जारी केला. आम्ही कायद्याने चालणारी आणि मतदारांना कोणतेही प्रलोभने दाखवत नसल्याचा कांगावा करणाऱ्या भाजपाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांना विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितीज ठाकूर आणि …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांचे आवाहन, ५० खोकेवाल्या गद्दारांना धडा शिकवा, भाजपाचाही सुपडा साफ करा काँग्रेस मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंची वसईत प्रचारसभा
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केले. आता विधानसभा निवडणुतही ५० खोकेवाल्या गद्दारांना धडा शिकवून भारतीय जनता पक्षाचा सुपडासाफ करा आणि महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केले आहे. काँग्रेस मविआच्या उमेदवारांसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची वसई येथे …
Read More »आदित्य ठाकरे यांची टीका, त्यांच मन आणि हृदय रिकामं होतं… मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागात घोटाळा, सरकार आल्यावर चौकशी करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी करत २६-१२-२०२२ एमएमआरडीए MMRDAचे दोन पत्र यावेळी दाखविले. मेट्रोच्या लाइनचे गर्डर टाकण्याआधीच रंग काम केलं जातय . मेट्रो २अ आणि मेट्रो ७च्या रंगरंगोटीसाठीचा एमएमआरडीए MMRDAने एक पत्र दिलं आहे, त्यानंतर ४ ऑक्टोबर निविदा काढण्यात आली …
Read More »नितीन गडकरी म्हणाले, राहुल गांधी यांना कोणी गांभीर्याने घेत नाही पंतप्रधान मोदी-बायडनच्या तुलनेवर नितीन गडकरी यांचे वक्तव्य
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच अमेरिकेचे माजी अध्यक्ष ज्यो बायडन आणि पंतप्रधान मोदी यांची तुलना करणाऱे वक्तव्य केले. त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ही तुलनाच चुकीची असून लोकांनी राहुल गांधी यांचे वक्तव्य गांभीर्याने घेऊ नये. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नितीन …
Read More »शरद पवार यांचा इशारा, रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे अजित पवार यांच्यासह सोडून गेलेल्या आमदारांना दिला इशारा
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा खऱ्या अर्थाने सुपर संडे, उद्या संध्याकाळी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची सांगता होईल आणि ४८ तासानंतर प्रत्यक्ष मतदानाचा दिवस अर्थात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीतील काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांच्यात कोण कोणावर मात करणार याचा फैसलाही या निवडणूकीच्या निमित्ताने बारामतीत होणार आहे. …
Read More »द साबरमती रिपोर्टवर चित्रपटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, बनावट… एका युजरच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली प्रतिक्रिया
गुजरातमधील ग्रोधा हत्याकांड आणि साबरमती येथील दंगलीच्या घटनांवर तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान पंतप्रधान नरेंदर मोदी यांच्यासह अन्य नेत्यांवरील आरोपावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यानंतर या घटनांवर आधारीत द साबरमती रिपोर्ट नामक एक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या अनुषंगाने एका युजरने नुकतेच पंतप्रधान मोदी यांना टॅग करत विचारले. त्यावर पंतप्रधान मोदी …
Read More »प्रियांका गांधी यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदींच्या राजवटीत…फक्त उद्योगपती अदानीच सेफ काँग्रेस सरकारने भेदभाव न करता सर्व राज्यांचा विकास केला, भाजपा सरकारकडून मात्र महाराष्ट्राशी भेदभाव
विधानसभेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हैं तो सेफ हैं चा नारा देत आहेत. सेफ म्हणजे सुरक्षित पण नरेंद्र मोदींच्या ११ वर्षातील राजवटीत देशातील शेतकरी, कामगार, महिला, वा तरूण कोणाही सेफ नाही जर कोणी सेफ असेल तर ते फक्त उद्योगपती गौतम अदानीच आहेत, असा हल्लाबोल अखिल …
Read More »
Marathi e-Batmya