Tag Archives: bjp

अल्प मदत जाहीर करून राज्य सरकारने केली पूरग्रस्तांची थट्टा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे टीकास्त्र

चंद्रपूरः प्रतिनिधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी आघाडी सरकारने जाहीर केलेले ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक असून राज्य सरकारने या पद्धतीने पूरग्रस्तांची थट्टा करू नये, अशी जळजळीत टीका भाजपा ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील …

Read More »

टीका करण्यापेक्षा पालकमंत्री म्हणून आपली जबाबदारी पार पाडा प्रविण दरेकर यांचा नवाब मलिकांना टोला

मुंबई: प्रतिनिधी मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दौऱ्यावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांवर टीका केली. या टीकेवरून भाजपा नेते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मलिक यांच्यावर पलटवार केला. राज्यपालांनी जिल्ह्यांचे दौरे केले तर यात काय गैर आहे?  त्यांच्या दौऱ्यामुळे इतरांच्या पोटात दुखण्याचे …

Read More »

खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची घणाघाती टिका

नंदुरबार: प्रतिनिधी राज्यातल्या जनहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष करत असलेल्या सरकारच वर्णन ‘खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार’  असंच कराव लागेल अशी अहिराणी भाषेत टीका आज भाजप नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज येथे केली. आमदार अॅड आशिष शेलार आजपासून तीन दिवसाच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून नंदुरबार जिल्हा दौऱ्यात …

Read More »

निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पुणेः प्रतिनिधी लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही लोकांनी घराबाहेर पडायचे नाही का, किती दिवस जनजीवन बंद ठेवणार, असे संतप्त सवाल महाविकास आघाडी सरकारला करतानाच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा असेल असे जाहीर केले. चंद्रकांत पाटील सोमवारी पुण्यात पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य नेणारे वाहन रवाना …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी थप्पडबाजीची भाषा करणं दुर्दैवी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली खंत

मुंबई: प्रतिनिधी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख जरी असले तरी ते या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा आहे. विरोधकांकडून टीका करण्यात आली असली तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून थप्पडबाजीची भाषा करणं योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा वापरणे म्हणजे महाराष्ट्रासाठी यापेक्षा दुर्दैवी काही नसल्याची प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त …

Read More »

भारतमातेचे नाव घेऊन सत्ता मिळवणारेच भारतमातेला विकायला निघाले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भाजपावर खोचक टीका

पुणे : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे कोणतेही योगदान नाही ते लोक इतिहासाची मोडतोड करून चुकीचा इतिहास मांडून लोकांची दिशाभूल करत आहेत. ज्यांनी भारतमातेचे नाव घेऊन सत्ता मिळवली तेच आता भारतमातेला विकायला निघाले आहेत, असा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रदेश काँग्रेसच्या वतीने ‘व्यर्थ …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना दबंग स्टाईलमध्ये उत्तर, “थप्पड…….झापड” बीडीडी चाळकऱ्यांचे घराचे काम वेगाने पूर्ण करण्याची दिली ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी भाजपाच्या एका नेत्याने नुकतेच प्रसंगी शिवसेनाभवनची तोडफोड करण्याची चिथावणी खोर वक्तव्य केले त्याचाच धागा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सतेजजी आपण घराबाबत ‘डबल सिट’ या चित्रपटाचा उल्लेख केलात, पण आपली तर ट्रिपल सिट आहे. हे ट्रिपल सिट सरकार आहे, हे मुद्दामून बोलतो कारण आतापर्यंत टीका अनेकांनी …

Read More »

राऊत कधी पाण्यात उतरलात का? महाराष्ट्राची जनता पाहतेय, आम्ही रिकामटेकडा दौरा करतोय की टीका-प्रविण दरेकरांचा पलटवार

मुंबई: प्रतिनिधी केवळ मीडियात येऊन अश्रू पुसणे आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन त्यांचे दु:ख जाणून घेणे वेगळे आहे. निसर्ग चक्रीवादळ असो किंवा तौक्ते वादळ आम्ही घटनास्थळी गेलो. आताही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेलो. त्यामुळे आम्ही रिकामटेकडा दौरा करत आहोत की फक्त टीका करत आहोत हे महाराष्ट्राची जनता पाहत असल्याचा पलटवार आज विधान परिषदेचे …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना आज भेटलो पुन्हा मुंबईत भेटणार कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार

कोल्हापूर : प्रतिनिधी पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीत राजकारण नको. मी स्वत: आज शाहूपुरी येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आणि बोललो. मुंबईत आम्ही परत एकदा सर्वाना बोलावून पुर परिस्थितीत सर्वांना कशी मदत करता येईल ते पाहू अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत दिली. मी इथे आलो …

Read More »

शालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक पालकांची पुन्हा फसवणूक करण्याचा सरकारचा डाव- आ. अतुल भातखळकर यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी शालेय फी मध्ये १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय हा माझ्या व पालक संघटनांच्या न्यायालयीन लढ्यानंतर महाविकास आघाडी सरकारला उशिरा आलेली जाग असली तरीही, अध्यादेश काढून कायद्यात सुधारणा न करता केवळ अधिसूचना काढणार असल्याची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक असून यातून पालकांची पुन्हा फसवणूक करण्याचा राज्य …

Read More »