नागपूर : प्रतिनिधी राज्यातील विविध जिल्हा सरकारी रूग्णालयात औषधांचा पुरेसा पुरवठा होत नसल्याच्या तारांकित प्रश्नी विधानसभेत चर्चा सुरु होती. त्यावेळी यावरील एका उपप्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देत होते तेव्हा त्यांचा माईक तीन ते चाळ वेळा बंद पडला. नेमका हाच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अध्यक्ष …
Read More »मुसळधार पावसाच्या पाण्याने नागपूरचे झाले तुंबापूर पावसाच्या पाण्यात गेला अधिवेशनाचा दुसरा दिवस
नागपूर : प्रतिनिधी दरवर्षीच्या प्रथेला पहिल्यांदाच फाटा देत यंदाचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे राज्य सरकारकडून घेण्यात येत आहे. मात्र नागपूरात पहिल्यांदाच काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाच्या मनसुब्यावर पाणी फिरविल्याने आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कोणतेही कामकाज होवू शकले नाही. परंतु मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण …
Read More »भावी पिढीसमोर जल,जंगल,जमीन वाचविण्याचे आव्हान १३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेचा शुमारंभावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली चिंता
ठाणे : प्रतिनिधी वृक्षारोपण हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नाही तर ते एक मोठे आंदोलन झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वन विभागाच्या १३ कोटी वृक्षारोपण महामोहीमेची प्रशंसा केली. भावी पिढीसमोर जल,जंगल, जमीन वाचविण्याचे मोठे आव्हान असून त्यादृष्टीने आमच्या सरकारने पर्यावरण संरक्षणासाठी महत्वपूर्ण पाऊले उचलली आहेत असेही ते …
Read More »घरबांधणीसाठी आता म्हाडाही खाजगी विकासकांना पैसे देणार मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जॉईंट व्हेंचर योजनेच्या तयारीसाठी गृहनिर्माण विभागाकडून लगबग
मुंबई : प्रतिनिधी राज्यात परवडणाऱ्या दरातील घरे उभारणीसाठी म्हाडाची राज्य सरकारने स्थापन केली. मुंबईत नव्याने घरांची उभारणी करण्यासाठी जमिन उपलब्ध नसल्याने म्हाडा मार्फतच शहरातील बीडीडी चाळीच्या पुर्नविकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु या पुर्विकासासाठी एकाबाजूला पैसे नसताना दुसऱ्याबाजूला पुन्हा खाजगी जमिन मालकांना अर्थात खाजगी विकासकांना त्यांच्या जमिनीवर घरे उभारणीसाठी पुन्हा …
Read More »महाराष्ट्रातही दुधाच्या भुकटीला ५० रुपये अनुदान द्या कृषी राज्यमंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी राज्यात मान्सूनच्या अनुकूलतेमुळे आगामी काळात दुधाचे उत्पन्न वाढणार असून त्याचा परिणाम दुधाचे आणखी दर घसरण्यावर होणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनेही गुजरात राज्याप्रमाणे दुधाच्या भुकटीवर ५० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गुजरात राज्यामद्ये दूध उत्पादकांना …
Read More »संपूर्ण जलयुक्त शिवार योजनेचे ऑडिट करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करुन जी कामे करण्यात आली ती निकृष्ट दर्जाची झाली असून या जलयुक्त शिवार योजनेचे संपूर्ण ऑडिट करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना केली. ही जलयुक्त शिवार योजना भाजपच्या कार्यकर्त्यांना पोसण्यासाठीच आणण्यात आली असा आरोप करतानाच बीडमध्ये इतक्या …
Read More »सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन वापरणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन (क्लीन फ्युएल) वापरणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धन शक्य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या ९ व्या सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन (CGD)बिडींग राऊण्ड निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. …
Read More »पीक कर्ज वाटप करताना बँकांनी संवेदनशीलता दाखवावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बँकांना आवाहन
मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे याचे भान ठेऊन बँकांनी काम करावे. कर्ज वाटप करताना संवेदनशीलता दाखवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात विविध बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील हायब्रीड ॲन्युईटी रस्त्यांच्या कामाबाबत …
Read More »मुख्यमंत्री तुम्हाला गृह खातं सांभाळता येत नसेल तर चालते व्हा औरंगाबादच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षितेचाही प्रश्न ऐरणीवर नवाब मलिक यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र पोलिस दलातील महिला कर्मचारी सुरक्षित नाहीत. त्यांच्या कुटुंबातील मुली, लोकं सुरक्षित नाहीत. मग राज्यातील महिलांच काय होणार असा सवाल करत मुख्यमंत्री तुम्ही करताय काय ? तुम्हाला खातं सांभाळता येत नसेल तर चालते व्हा असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला. औरंगाबादमधील महिला …
Read More »मुख्यमंत्र्यांनी काढले लोकशाही दिनामध्ये सर्व अर्ज निकाली शुन्य अर्ज प्रलंबित
मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयात मे २०१८ पर्यंत झालेल्या १०७ लोकशाही दिनांमधील एकही अर्ज प्रलंबित नसून १ हजार ४७० तक्रारींवर तोडगा काढण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १०८ वा लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी ११ तक्रारींवर मुख्यमंत्र्यांनी सुनावणी केली. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालयात ऑनलाईन लोकशाही दिन आयोजित केले जाते.आतापर्यंत …
Read More »
Marathi e-Batmya