Tag Archives: congress

मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपाची ‘बुस्टर सभा’ पुरोगामी महाराष्ट्रातील जात्यांध्य व धार्मिक विचार थांबवा !: नाना पटोले

महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. हा पुरोगामी विचारच राज्याला प्रगतीपथावर घेऊन गेला व तोच विचार राज्याच्या हिताचा आहे परंतु मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात जात्यांध्य व धार्मिक विचाराला पुढे करून राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम केले जात आहे, हा जात्यांध विचार थांबवण्याची गरज …

Read More »

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनो अडचणी आहेत का? मग ही बातमी वाचाच अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर संवाद दिनाचे आयोजन

मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर ‘संवाद दिन’ आयोजित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या माध्यमातून त्यांच्या अडचणी स्थानिक पातळीवर आणि तातडीने सोडविणे शक्य होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. शालेय शिक्षण विभागाअंतर्गत मान्यताप्राप्त खासगी अनुदानित/ विनाअनुदानित/ अंशत: अनुदानित शाळेतील …

Read More »

भाजपाची ‘बी’ टीम असलेल्या एमआयएमने काँग्रेसबद्दल बोलू नये खा. इम्तियाज जलील स्वल्पविरामाएवढ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष-अतुल लोंढे

काँग्रेस संपलेला पक्ष आहे अशा वल्गना करणारे नेते व पक्ष यांच्याच अस्तित्वाचा प्रश्न आहे. काँग्रेसला संपवणारे संपले, पण काँग्रेस संपलेली नाही आणि संपणारही नाही. एमआयएम ही भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचे सर्वज्ञात आहे. त्यामुळे एमआयएमने काँग्रेसची चिंता करू नये स्वतःच्या पक्षाची चिंता करावी, असा टोला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व …

Read More »

अखेर प्रशांत किशोर यांचा काँग्रेसला नकारच, ट्विट करत दिले “हे” कारण काँग्रेसकडून ट्विट करत दिली माहिती

मागील काही दिवसांपासून आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रसिध्द रणनीतीकार प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. तसेच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटही घेतली. मात्र आज अखेर प्रशांत किशोर यांनी आपण काँग्रेससोबत काम करणार नसल्याचे स्पष्ट केले. सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर प्रशांत किशोर यांनी प्रदीर्घ …

Read More »

किरीट सोमय्यांच्या दंडेलशाहीला राज्य सरकारने चाप लावावा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी

भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या हे राज्यातील शांतता भंग करण्याचे काम करत असून बुनबुडाचे, बेछुट आरोप करून मुंबई पोलिसांनाही बदनाम करण्याचा सुरु केलेला उद्योग त्यांनी थांबवावा. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. नौटंकीबाज सोमय्या हे वारंवार राज्य सरकार, पोलीस व प्रशासनाच्या कामात अडथळे आणून अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत अरेरावीही करत आहेत. सोमय्यांची ही …

Read More »

शरद पवार म्हणाले, येणार म्हणून घोषणा केली पण आले नाहीत म्हणून अस्वस्थ माझेही सरकार बरखास्त केले होते पण मी किक्रेट सामन्याचा आनंद लुटला

राज्यात सध्या हनुमान चालिसावरुन राजकारण चांगलेच तापलेले असताना राणा दांम्पत्यांनी केलेल्या राजकिय नाट्यानंतर भाजपाच्या नेत्याकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपासह, राणा दांम्पत्यांवर चांगलाच निशाणा साधला. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सत्ता गेल्यानतंर लोक अस्वस्थ होतात. सगळे काय …

Read More »

बाळासाहेब थोरात म्हणाले, राणाने रंग दाखविण्यास सुरुवात केलीय ‘हनुमान चालीसा’ राजकीय मुद्दा बनवून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा भाजपाचा प्रयत्न -बाळासाहेब थोरात

निवडणूकीच्या काळात महाविकास आघाडीने राणा दांम्पत्याला पाठिंबा दिला. मात्र निवडणूकीच्या विजयानंतर राणा दांम्पत्याने आपले रंग दाखविण्यास सुरवात केल्याची टीका राज्याचे महसूल मंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांचे नाव न घेता करत ती आघाडीची चूक होती असेही ते म्हणाले. केंद्रातील भाजपाचे सरकार …

Read More »

भाजपा म्हणते, दिल्लीसह देशभरातील १९ ठिकाणच्या रामनवमी दंगली मागे काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी लिखित केला आरोप

१० एप्रिल रोजी रामनवमी दिनाच्या दिवशी नवी दिल्लीसह देशभरातील १९ ठिकाणी जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यावरून काँग्रेससह सर्व विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवित या हिंसाचारावर पंतप्रधान गप्प का? असा सवाल उपस्थित केला. यापार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी खुले पत्र लिहीत या हिंसाचारामागे देशातील इतिहास जमा होत असलेला …

Read More »

विरोधकांच्या “त्या” वक्तव्यावरील टीकेनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, जर मी… नाना लढले तर तुम्हाला फेस आला जर मी लढलो असतो तर

कोल्हापूरातील पोट निवडणूकीत काहीही करून काँग्रेसच्या ताब्यातील जागा हिसकावून घ्यायचीच असा चंग बांधून कोल्हापूरात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे ठाण मांडून बसले होते. तरीही भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सध्या चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्याची चर्चा सुरु झाली असून त्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आता हिमालयात जा अशी उपरोधिक …

Read More »

मंत्री थोरात म्हणाले, भाजपाला सतेज बंटी पाटील पुरून उरले कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने भाजपच्या धर्मांध राजकारणाला नाकारले

कोल्हापूर मधील स्वाभिमानी मतदारांनी भारतीय जनता पक्षाची दहशत, दडपशाही, प्रलोभनांना व धार्मिक ध्रुवीकरणाच्या अजेंड्याला न जुमानता महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना विजयी केले. हा विजय जनतेचा महाविकास आघाडीवर असलेला विश्वास अधोरेखित करतो, असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर …

Read More »