Tag Archives: congress

पंतप्रधान मोदींच्या निवडणूक प्रचारामुळे १३० कोटी जनता रामभरोसे कोरोनाचा देशात उद्रेक असताना पंतप्रधान मोदी मात्र प्रचारसभा घेण्यातच मग्न! : नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी देशभरात कोरोना महामारीचा उद्रेक झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पंजाबमध्ये भयानक स्थिती असताना आता हे संक्रमण देशाच्या इतर भागातही पसरू लागले आहे. देशात आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असताना या महामारीवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३० कोटी जनतेला रामभरोसे सोडले. पंतप्रधानांना जनतेच्या जीवापेक्षा …

Read More »

या दिवसापासून लागू शकतो लॉकडाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून रात्रो ८.३० वाजता अधिकृत घोषणा

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता द्सतुरखुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह सर्वच मंत्री व्यक्त करत आहेत. तसेच या अनुषंगाने वैद्यकिय सुविधा आणि यंत्रणेचा आढावाही घेण्यात आला. यापूर्वीच राज्यात दर आठवड्याला वीकएण्ड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असताना आता सलग १५ दिवसांचा लॉकडाऊन …

Read More »

लसीकरण केंद्रे बंद असताना कसला ‘लस महोत्सव’ साजरा करता? बंद लसीकरण केंद्राबाहेर घंटानाद, थाळीनाद करून केंद्र सरकारचा निषेध करणार-नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या गंभीर संकटात लसीकरण मोहीम महत्वाची असताना केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात नाही. लसीअभावी अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील बहुतांश लसीकरण केंद्रे लस पुरवठ्याअभावी बंद असताना …

Read More »

सर्वपक्षिय बैठकीत काँग्रेसने कोणते मुद्दे मांडले? जाणून घ्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी केल्या सूचना

मुंबई: प्रतिनिधी कोरोना रोखण्यासाठी निर्बंध लावताना समतोल असावा. निर्बंध लागू करताना गरजू घटकांचाही विचार व्हावा. सरकारची भूमिका आणि निर्णयाबाबतचा अपप्रचार व गैरसमज टाळण्यासाठी आणि वस्तुस्थिती अधिकृतपणे लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी निवडक मंत्री नियुक्त करून त्यांनी नियमित ब्रिफिंग करावी अशी सूचना काँग्रेस नेते तथा सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

लसच नाही तर मेडिकल इक्वीपमेंट देण्यातही मोदी सरकारचा महाराष्ट्रावर अन्याय काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट

मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकारकडून महाराष्ट्राला कमी लस पुरवठ्याचे प्रकरण ताजे असतानाच आता कोरोनाच्या लढाईसाठी लागणाऱ्या मेडिकल इक्वीपमेंट देण्यातही केंद्राकडून अन्यात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला दिलेल्या इक्वीपमेंटची माहिती केंद्र सरकारनेच संसदेत दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज एका प्रसिध्दी …

Read More »

फडणवीसांचा पलटवार, लोकांचे लक्ष हटविण्यासाठी लसीकरणावर राजकारण गैरकारभार आणि न्यायालयीन प्रकरणात वाभाडे

मुंबई: प्रतिनिधी विविध प्रकरणांमध्ये महाविकास आघाडी सरकारची होत असलेली नाचक्की आणि स्वत:चा गैरकारभार या दोन्हींपासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच कोरोना लसीकरणावर नाहक राजकारण केले जात असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यातील कोरोना आणि लसीकरण हे महत्त्वाचे प्रश्न आहेतच. परंतू आज व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाहीत, रेमडेसिवीर उपलब्ध नाही, ऑक्सिजन उपलब्ध …

Read More »

केंद्रीय आरोग्य मंत्री व भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी ! काँग्रेसचे 'कोरोनामुक्त महाराष्ट्र' अभियान; २४×७ हेल्पलाईन व जनजागृती मोहिम, रक्तदान शिबिरे- नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी देशात सध्या कोरोनाने थैमान घातलेले असताना कालपर्यंत गायब असलेले देशाच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अतीसक्रिय होत अत्यंत हीन पातळीवर जाऊन असंवेदनशील आणि अशोभनीय भाषेचा वापर करत महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी माणसांचा अपमान केला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे, …

Read More »

“तो” निर्णय घेवून केंद्र सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलतय केंद्राकडून राज्यांना लसीचा अपुरा पुरवठा- नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रौद्ररुप धारण केले आहे. देशात दररोज १ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. वाढत्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही हे आता सप्ष्ट झाले आहे. त्यामुळेच काँग्रेस पक्षाने कोरोना लसीकरणासाठी वयोमर्यादेची अट शिथील करून राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस …

Read More »

राज्य सरकारच्या “ब्रेक दि चेन” अंतर्गत ३० एप्रिलपर्यत या गोष्टी बंद राहणार याप्रमाणे पाळावे लागणार नियम

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी आणि शुक्रवारी रात्रो ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. या निर्णयानुसार राज्यात काय सुरु राहणार काय बंद राहणार जाणून घेवू या… शेतीविषयक कामे सुरु शेती व शेतीविषयक …

Read More »

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय: परिक्षा नाही- मुलांना पुढच्या वर्गात प्रवेश शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी दिवसेंदिवस राज्यातील कोविड बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आता लहान मुलांनाही याची लागण होत आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनत आहे. तसेच ऑनलाईन शिक्षणाच्या पध्दतीतून राज्यातील १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नसल्याने या विद्यार्थ्यांच्या परिक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय आज …

Read More »