महाराष्ट्रातील सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी आढावा बैठक आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पार पडली. या बैठकीत सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी (DEOs), पोलीस अधीक्षक (SPs), महानगरपालिका आयुक्त (MCs), पोलीस आयुक्त (Police Commissioners), आणि निवडणूक निर्णय अधिकारी (ROs) यांनी सहभाग घेतला. या बैठकीत निवडणूक आयोगाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होत निवडणुकीसंदर्भातील …
Read More »२८८ मतदारसंघात ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध: ९ कोटी मतदार मतदान करणार उमेदवारी अर्ज छाननीत ७ हजार उमेदवारांचे अर्ज वैध
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबर २०२४ रोजीपर्यंत राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी ७ हजार ९९४ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन अर्थात उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली असून २८८ मतदारसंघातील एकूण ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्याचप्रमाणे ९२१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती मुख्य …
Read More »भाजपाकडून पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातही हरियाणा पॅटर्नः दिवाळीनंतर जाहिर सभा राज्यात महायुतीच्या पुनरागमनासाठी १०० हून अधिक भाजपा नेत्यांची रॅली
नुकतेच हरियाणा विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणूकीत भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोजक्याच जाहिर सभा घेतल्या. त्याचबरोबर लोकसभा निवडणूकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सततच्या चेहऱ्यामुळे भाजपाच्या ४०० जागांचा नारा उलटला. त्या धर्तीवर हरियाणा विधानसभा निवडणूकांच्या रणधुमाळीत नरेंद्र मोदी यांचा चेहरा कमी दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला. अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील विधानसभेच्या …
Read More »२८८ मतदारसंघासाठी आजपर्यंत १०९०५ उमेदवारांचे अर्ज दाखल ७९९५ उमेदवारांचे १०९०५ नामनिर्देशन पत्र दाखल निवडणूक आयोगाची माहिती
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता आज २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध …
Read More »विधानसभेची निवडणूक राज्यात, राजकिय पक्ष मुंबईत अन् उमेदवार अंतरावली सराटीत विजयाचा लोलक अंतरावली सराटीत स्थिर
आतापर्यंत राज्यातील सत्तेची आणि राजकारणाची फळे चाखण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूरच्या फेऱ्या मारणाऱ्या उमेदवारांना यंदाच्या निवडणूकीत सध्याचे राजकीय केंद्र मुंबई ऐवजी मराठवाड्यात स्थलांतरीत झाल्याचे दिसून येत आहे. तसेच निवडणूकीचे मतदान होण्या आधी आणि निकाल जाहिर होण्यापूर्वीच अनेक उमेदवार स्वतःच्या मतदारसंघातील नागरिकांना भेटण्याआधीच नव्याने राजकीय केंद्र स्थानी आलेल्या मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील …
Read More »राष्ट्रवादीकडून या चार उमेदवारांची तिसरी यादी सुनिल तटकरेंकडून जाहिर आजच्या यादीत गेवराई, फलटण, निफाड, पारनेरचा समावेश...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसने २३ आणि २५ ऑक्टोबर रोजी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि आज ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेली विधानसभा उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे : गेवराई – विजयसिंह पंडित फलटण – सचिन …
Read More »काँग्रेसची १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहिर माणिकराव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी तर प्रवक्ते सचिन सावंत यांना संधी
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून रात्री उशीरा १६ उमेदवारांची यादी जाहिर केली. या उमेदवारी यादीत माजी मंत्री तथा आमदार माणिकराव ठाकरे यांना पुन्हा एकदा विधानसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांना पहिल्यांदा अंधेरीतून उमेदवारी जाहिर करण्यात आली. याशिवाय असिफ झकेरीया, दिलीपकुमार सानंदा यांनाही उमेदवारी जाहिर करण्यात …
Read More »उत्तर भारतीय विकास सेनेकडून लॉरेन्स बिश्नोईला वांद्रे पश्चिम मधून उमेदवारी उमेदवारी अर्ज भरण्याची कागदपत्रेही गुजरातच्या तुरुंगात पाठवली
गुजरातच्या तुरुंगात असतानाही बॉलिवूड स्टार सलमान खान यास सतत धमक्या देणे, त्याच्या घराबाहेर गोळीबार करणे आदी गोष्टी करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईने नुकतेच सलमान खान याचे मित्र तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाब सिद्धीकी यांची हत्या केली. त्यानंतरही कोणत्या तरी उत्तर भारतीय विकास सेना नामक राजकिय पक्षाने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वांद्रे पश्चिम …
Read More »आर्यनलँड निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाचा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर साधला संवाद
आर्यनलँड देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी परिषद सभागृह येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला. जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय राज्यात विधानसभा सार्वत्रिक …
Read More »नाना पटोले यांची टीका, राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नेरेटिव्हचा भाजपाचा प्रयत्न लोकशाही व संविधान वाचवण्यासाठीच राहुल गांधींची लढाई; भाजपाचा मात्र मनुस्मृती लादण्याचा कुटील डाव
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक हारण्याच्या भितीने भारतीय जनता पक्षच सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नेरेटिव्ह पसरवत आहे. भारतीय जनता पक्ष हाच आरक्षण व संविधान विरोधी असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका विधानाची तोडफोड करून फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. …
Read More »
Marathi e-Batmya